Author: अनंत पांगारकर
बुधवार, दि.१७ एप्रिल धुळे, सातारा आदि महत्त्वाच्या मतदारसंघातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी साताऱ्यामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे थोरातांची कोंडी झाली असल्याचे दिसते. तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाटेला गेली आहे. येथून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. साताऱ्याच्या या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. संभाव्य बंडखोरी आणि काँग्रेस मधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे थोरात यांच्यासमोर आव्हान आहे. अशातच सांगलीच्या…
अहमदनगर, बुधवार दि.१७ एप्रिल नगर जिल्हयात जुन ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत झालेली पर्जन्यमानातील तुट तसेच उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षाचा दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री) व 0241-2323844 असा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बुधवार, दि. १७ एप्रिल संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये मंगळवारी रात्री चार चाकी वाहनात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मनोज गोविंद वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, पारनेर) असे या तरुणांचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. साकुरमधील गव्हाळीत एका झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनामध्ये एक तरुण निपचित पडला असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मिळालेल्या माहितीत मनोज गोविंद वाळुंज असं या तरुणाचं नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समोर आले नसले तरी घारगाव पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहे.
शिर्डी लोकसभेत १७०८ मतदान केंद्र : १६ लाख ६० हजार मतदार : ८४२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया – निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची माहिती मंगळवार, दि. १६ एप्रिल सर्व उमेदवार व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व अनुसूचित पध्दतीच्या वापरावर निर्बंध आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे. निवडणूकी कामी नियुक्ती अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अतिशय तत्पर व दक्ष राहत नि:पक्ष पध्दतीने कामकाज करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी आज येथे केल्या. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांची आज राहाता येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या…
मंगळवार, दि. १६ एप्रिल योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत जनतेची माफी मागण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने या दाव्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून ॲलोपॅथी औषधांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी मागितलेल्या बिनशर्त माफीची दखल घेताना सर्वोच्च न्यायालयाने…
मंगळवार दि. १६ एप्रिल अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा २२ जानेवारीला झाल्यानंतर आता संगमनेरात पुन्हा एकदा राम जन्मोत्सवाची व भव्य शोभायात्रेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजता रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रेला नवीन नगर रोड येथील राम मंदिर येथून प्रारंभ होवून बस स्थानक, छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा, चावडी, मेनरोड, तेलीखुंट, नेहरू चौक व चंद्रशेखर चौक येथील राम मंदिर येथे महाआरती होवून सांगता होणार आहे. या मार्गात असणाऱ्या मंदिर व घरांवर विद्युत रोषणाई करून सडा- रांगोळी करावी, शोभा यात्रेवर पुष्पवृष्टी करावी. संगमनेर शहर व तालुक्यातील सर्वांनी या भव्य दिव्य शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग…
मंगळवार, दि. १६ एप्रिल संगमनेरच्या पोलीस निरीक्षकांवर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले असतानाच आता पोलीस उपनिरीक्षकाचे नवे प्रकरण समोर आले आहे. ३३ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून या पोलीस उपनिरीक्षकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातून समोर आलेल्या या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिला जामखेड मधील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचे या युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे…
सोमवार, दि. १५ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी रविवारी संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी व सतीची वाडी या मतदान केंद्राना अचानक भेट दिली. भेटीत त्यांनी गावातील मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पेमरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीत सुमारे तीनशे मतदार आहेत. पेमरेवाडी शिर्डी लोकसभा व अकोले विधानसभा मतदारसंघात येते. पेमरेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. २०२४ च्या निवडणूकीपूर्वी या गावाला जोडणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. अपर…
सोमवार, दि. १५ एप्रिल काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन काही घटक अशा प्रकारचे कृत्य करत आहे, यापासून न्यायव्यवस्था वाचविण्याची गरज असल्याच्या आशयाचे न्यायव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा अशा २१ निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेवर येणारा दबाव थांबवायला हवा. न्यायव्यवस्थेला अवाजवी दबावापासून वाचविण्याची आवश्यकता आहे. राजकीय संबंध, वैयक्तिक फायद्यासाठी काही घटक न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडेल…
सोमवार, दि. १५ एप्रिल देशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता १६ मार्चपासून सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप सुरुवात झाली नसली तरीदेखील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्याची व त्यातील बहुतांशी तक्रारीचे निराकरण केल्याची माहिती आचारसंहिता कक्षाकडून देण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आलेल्या शंभर टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली. अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुती आणि…
