Author: अनंत पांगारकर
शनिवार, दि.२७ एप्रिल काँग्रेसच्या सरकारने अनेकवर्ष राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगले. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली. सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवाराच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्यांय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वामधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे…
शनिवार दि. २७ एप्रिल सध्या देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील, नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अशा ‘त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती पुढील काळात होणार आहे’ असा सज्जड इशारा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉ. डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक…
शनिवार दि.२७ एप्रिल देशाच्या सीमांवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षात ज्या हजारो सैनिकांच्या हत्या झाल्या त्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांना देशासाठी मंगळसूत्र बलिदान कराव लागलं, त्या मंगळसूत्रांचा हिशेब कोण देणार? असा घनाघाती सवाल करत जो महिलांच्या मंगळसूत्राला हात घाल तो ‘भारतीय जनता पक्षच मंगळसूत्र चोरांची टोळी’ असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अमित भांगरे,…
अहमदनगर, शुक्रवार दि.२६ एप्रिल शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी नंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. तर प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननीमध्ये हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), विश्वनाथ श्रीरंग शेळके (अपक्ष), छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) व प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर छाननी नंतर निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे… उमाशंकर श्यांमबाबु यादव (बहुजन…
शिर्डी, दि.२६ एप्रिल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी (२६ एप्रिल) दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज यांची छाननी करण्यात आली. यात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले तर ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बाद ठरविण्यात आले. छाननी नंतर हे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात… भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना), चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष), अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) , अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र…
शुक्रवार, दि.२६ एप्रिल लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात कुठेही दिसणार नाही, फोन टॅपिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती, असे मोठे विधान करत पहिल्या दोन टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी राऊत बोलत होते. आतापर्यंत राज्यात दोन टप्प्यात मतदान पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान झाले तर आज आठ मतदारसंघात मतदान होत आहे. या दोन्ही…
शुक्रवार दि.२६ एप्रिल सध्या ऐरणीवर असलेल्या संगमनेरच्या गोवंश हत्या आणि कत्तलखाने पुन्हा एकदा गाजू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या ठिकाणी छापे घालून गोवंश मांस व तस्करी करणारे पकडले आहेत. गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने एका वाहनातून २८ गोवंश वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्याला जेरबंद केले आहे. उपअधीक्षक वाघचौरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की, एका पिकअप गाडीमध्ये कत्तलीकरिता गोवंश जनावरे आणलेली आहेत. ती संगमनेरच्या कत्तलखान्यात दिली जाणार आहेत. ही गाडी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड या परिसरात आहे. पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता एक पांढऱ्या रंगाची पीकअप दिसून आली. पोलिसांना पिकअप…
अनंत पांगारकर | शुक्रवार, दि.२६ एप्रिल शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी नवी खेळी खेळली गेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाशी नामसाधर्म्य असलेले उमेदवार मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही खेळी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडली आहे. ठाकरे गटाकडून या मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. वाकचौरे यांच्या उमेदवारी विषयी मतदार संघात मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण असताना आता वाकचौरे यांच्या नावाशी मिळताजुळता उमेदवार शेवटच्या क्षणी मैदानात उतरला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्याबरोबर आता…
शिर्डी, गुरुवार दि.२५ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे प्राथमिक चित्र आज स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ३१ उमेदवारांनी ४० अर्ज दाखल केले आहे. गुरुवारी १६ उमेदवारांनी २३ उमेदवारी अर्ज दाखल केले. सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे गडद झाली आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘आपला विजय निश्चित या हवेत असलेल्या’ उमेदवारांचा फुगा देखील येत्या एक-दोन दिवसात फुटेल आणि त्यांना जनतेसमोर जावे लागणार आहे.…
अहमदनगर दि. २६ एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत या मतदारसंघात ४३ उमेदवारांनी ५५ नाम निर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती देण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ. योगिता प्रविण चोळके (अपक्ष), उमाशंकर श्यानमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष व भारतीय जनता पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष व हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल गणपत (अपक्ष), मुक्ता…
