Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अचानकपणे २२ जानेवारीचा अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दौरा रद्द केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला आयोध्या दौरा निश्चित केला आहे. फेब्रुवारीमध्ये ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह अख्ख मंत्रिमंडळच घेऊन रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा २२ जानेवारीचा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दौरा निश्चित होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी २० जानेवारीला रात्री उशिराने आपण अयोध्येला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी त्यांनी लवकरच आयोध्या दौऱ्याबाबतची तारीख जाहीर करू असंही म्हटलं होतं. त्यानंतर आता प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर शिंदे यांनी आपला दौरा निश्चित केला आहे. https://twitter.com/ANI/status/1750075451526271069?s=19 या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली नसली…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – फसवणुकीच्या एका गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी आरोपीच्या भावाकडे पाच लाखाची लाच मागणाऱ्या आणि त्यासाठी मध्यस्थी करत ४० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या वकिलाला अँटी करप्शनने पकडले असून पोलीस उपनिरीक्षक आणि वकिलाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश वसंत चव्हाण (वय ३५ वर्ष) आणि राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षक व वकिलाचे नाव आहे. पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराच्या भावा विरोधात पुणे शहरातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भावाला अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पद गेलं की माणसं पक्षापासून दुरावतात मात्र पद गेल्यानंतर देखील पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवत संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी शिवसेनेच्या चढ-उतारामध्ये देखील वर्षानुवर्ष पक्षासोबत राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना “निष्ठा पुरस्काराने” गौरवत वेळोवेळी पक्ष बदलू पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या कृतीतून सोमवारी चपराक दिली आहे. २३ जानेवारी हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिन. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेचे राज्यव्यापी महा अधिवेशन आणि ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर कतारी यांनी सोमवारी संगमनेरमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. याशिवाय शिवसैनिकांनी रचलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज निळवंडे (अहमदनगर) – निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. मात्र आता त्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. डाव्या कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला देखील पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तर अनेकांच्या त्यागातून निळवंडे धरण आणि कालवा प्रकल्पपूर्ती झाल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी ऊर्ध्व प्रवरा निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, निळवंडे…
शिक्षण हा समृद्धीचा अलंकार असल्याने शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याची आवश्यकता : विजय चौधरी
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षण हा समृद्धीचा अलंकार असून शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होत असतो त्यामुळे शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याचे काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केले. संगमनेर इनरव्हील क्लबच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील ३९ शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुनिता गाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक सामजिक कार्यकर्ते महेश मयूर, वैशाली मयूर, इनरव्हीलच्या सचिव शिल्पा नावंदर आदी व्यासपीठावर उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एकविसाव्या शतकातील भारताला विकासाची वाटचाल करताना मानवी मुल्यांची कास सोडून चालणार नाही. अनेक चढ-उतार सोसुनही भारतीय समाजाच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचा पाया हा समताधिष्ठित, मुल्याधिष्ठित समाज राहिला आहे. ते टिकवायचे असेल तर द्वेषाचं संकुचित राजकारण न करता त्यात समाजकारण वाढवावं लागेल. संगमनेरची महाराष्ट्राच्या राजकारणातील ही ओळख आहे, असे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष व कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्री थोरात यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर -कोयत्याच्या धाकावर दहशत निर्माण करून पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला नगरच्या कोतवाली पोलिसांनी केडगाव परिसरातील एका हॉटेलमधून जेरबंद केले आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीमध्ये टोळीतील सराईत आरोपींचा समावेश आहे. नगरच्या केडगाव परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये पुण्यातील आरोपींची टोळी बसलेली असल्याची माहिती खबऱ्यामार्फत कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मिळालेल्या माहितीच्या आधारे हेड कॉन्स्टेबल शाहीद शेख, रवींद्र टकले, राहुल शिंदे, योगेश कवाष्टे, सलीम शेख, दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सत्यजित शिंदे, महेश पवार, शिवाजी मोरे, प्रमोद लहारे आदींच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा लावला. संधी मिळताच पथकाने पुण्यात कोयत्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक होत असलेली ३२ जिवंत गोवंश जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली असल्याने या गोवंश जनावरांना जीवदान मिळाले. पोलिसांनी या कारवाईत जिवंत जनावरांसह ३ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान या संदर्भात रिहान अल्ताफ शेख (वय १९, तीन बत्ती चौक, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव-पोहेगाव रस्त्याने तळेगाव दिघे मार्गे एका पीकअप मधून कत्तलीसाठी जिवंत जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती शनिवारी दुपारी संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने पोलीस नाईक…
पक्षाचं काही झालं तरी देशाची लोकशाही टिकली पाहिजे. ज्यांनी तिला दावणीला लावलीय त्यांना सहज सुटं सोडलं तर आहे त्या लोकशाहीची दैना उडेल. माणूस म्हणून जगणं अवघड जाईल. पक्षांतरबंदीच्या कायद्याचं मूळ रूप आणि विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या फुटीवर दिलेल्या निवाड्याने देशाच्या लोकशाहीलाच हात घातला जात आहे. याचे बोलवते धनी वेगळे असले तरी नार्वेकरांसारखी शहाणी माणसंही त्यामागे फरफटत चालली आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाने बोलवलेल्या महापत्रकार परिदेतील या संभाव्य धोक्याची जाणीव करून देत यासाठी काहीही मोजण्याची तयारी ठेवण्याचं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. जे लोकशाही मानणार्या प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. पीठासीन अधिकारी म्हणून असलेल्या अधिकाराचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखली जावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत २ फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही, कोठेही बरोबर नेता येणार नाही.दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे याच्यासह जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक…
