Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज एकीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतदेहांची ओळख न पटल्याने सामूहिक अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता तर दुसरीकडे राजभवनात शपथविधीचे नाट्य सुरू होते. महाराष्ट्र अपघाताच्या घटनेने हळहळत असताना राज्याच्या राजकारणात सत्तेच्या सारीपाटाचा आनंदी सोहळा रंगला होता. या पार्श्वभूमीवर अकोला येथील ॲड. अनंत खेळकर यांची यावर भाष्य करणारी कविता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी सोशल मीडियाच्या सौजन्याने आम्ही ती आपणासाठी देत आहोत. ——————– तिकडे समृध्दी महामार्गावर झाले देहाचे कोळसे ईकडे मात्र राजकारण घेत होते ‘वळसे’ ओळख पटली नाही म्हणून सामुहिक अंत्यविधी तिकडे त्यांची चिता जळाली ईकडे ह्यांचा ‘शपथविधी’ …
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याचे स्वागत भाजपा मराठा समाजाचे नेते भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी केले. मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत नाही. ही बाब लक्षात घेऊन क्यु-एस वर्ल्ड २०० च्या आता मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. ही योजना २०२३-२४…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवार यांच्यासह आठ नव्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाल मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागांचे प्रधान सचिव वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अजित पवारांसह नव्या आठ मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होती. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय संक्षिप्त स्वरूपात :- * राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन (ऊर्जा विभाग) * मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रांताधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपी आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख याला संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी ३० ऑक्टोंबर २०२२ ते ३१ ऑक्टोंबर २०२३ या एक वर्षाच्या कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. गडाख हा हद्दपारीच्या कालावधीमध्ये तालुक्यामध्येच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्यावर निमोण गावच्या शिवारात निमोण – पारेगाव गडाख फाट्यावर पोलिसांना आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख हा आढळून आला. प्रांत अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत आढळून आल्याने पोलिसांनी त्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७, लोक कल्याण मार्गावरील आणि नो टाईम झोन मधील ‘पंचवटी’ बंगल्यावर सोमवारी सकाळी ड्रोन उडत असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती तातडीने दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही काळ खळबळ माजली होती. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एसपीजीने (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) याची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर दिल्ली पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी पंतप्रधानांचे निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान या ड्रोनबाबत अद्याप पोलिसांना तपास लागू शकला नाही. ड्रोन नेमकं कोणाचं होतं, याबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहे. तसेच ड्रोन पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत कसे पोहोचले? हा प्रश्न देखील अद्याप…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अनुदानित – विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी शिक्षण संस्थांकडून अवास्तव फी आकारणी केली जात आहे. या फी मध्ये कपात करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेच्यावतीने उपशहरप्रमुख फैसल सय्यद व युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाळा महाविद्यालयांना निवेदन देत केली आहे. नॅशनल इंग्लिश मीडियमसह शहरातील अन्य शैक्षणिक संस्थांना हे निवेदन देण्यात आले असल्याचे सय्यद यांच्यासह युवा सेना शहरप्रमुख गोविंद नागरे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवा सेना समन्वयक अक्षय बिल्लाडे यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शाळा व महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. त्यात शासनाचं अनुदान स्कॉलरशिप व कॅटेगिरी फार्म भरून देखील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रविवारचा दिवस संगमनेरकरांसाठी घातवार ठरला. दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, जवळे कडलग आणि पेमगिरी येथे पाण्यात पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या पाचही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी बराच काळ उपलब्ध न झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संगमनेर शहरातील देवी गल्ली येथील अनुकूल सत्यवान मेंढे (वय २१ वर्षे) या तरुणांचा निळवंडेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मेंढे याला उपचारासाठी रात्री संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सृष्टीसाठी काम करणारी दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची महाराष्ट्रातील मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर विविध शासकीय विभाग व अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर समवेत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, सुधाकर जोशी, संतोष हासे,ॲड. मधुकर गुंजाळ, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी…
जनतेच्या न्यायालयातच सगळा निर्णय होईल, जनता सर्व पाहते आहे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी लावणारे आहे. घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटनेकरता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आजच्या शपथविधीची घडलेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला…. राज ठाकरे झाले उद्विग्न उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स…
