Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज “तुझा लवकरच नरेंद्र दाभोळकर होणार”, अशी धमकी शरद पवारांना देणाऱ्या सागर बर्वेच्या मुंबई पोलिसांनी पुण्यातून मुसक्या आवळल्या आहे. बर्वे ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने फेसबुक पेज चालवत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून ही धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. “शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार”, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. फेसबुक आणि ट्विटरवर शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज | सकारात्मक राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळचे असलेल्या माझ्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एक व्यक्तीकडे गेले. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो वाट पाहत होता. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला आणि लगेच खायला सुरुवात केली. जेवत असताना त्याचे हात…
संगमनेर तालुक्यातील 45019 शेतकऱ्यांना 7 कोटी 72 लाखाचा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून फायदा
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम शंभर टक्के बँकेची वसुली दिली आहे. शून्य टक्के व्याज देण्याच्या जिल्हा बँकेच्या निर्णयातून संगमनेर तालुक्यातील नियमित कर्ज फेड करणाऱ्या 45019 सभासदांना राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 7 कोटी 72 लाख 21 हजार 749 रू व्याज सवलत मिळाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आदर्श परंपरा लाभलेल्या संगमनेर तालुक्याने जिल्हा बँकेची कायम शंभर टक्के वसुली दिली आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर…
थोरात-कोल्हे युती ब्रँडेड आणि प्रामाणिक – करण ससाणे तुम्हाला गाळप करता आले नाही म्हणून संगमनेर संजीवनी शेतकऱ्यांच्या मदतीला आले – सचिन गुजर महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांचे गणेश कारखान्यावर आणि गणेश परिसरावर विशेष प्रेम होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखान्याने सुवर्णकाळ अनुभवलेला आहे, कोल्हे साहेबांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाच्यावतीने युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोंडेगाव येथे प्रचार बैठक घेतली. बैठकीत बोलताना त्यांनी या निवडणुकी संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.…
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पत्राचा विपर्यास करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम काही रिकामी टाळकी करत आहे भाजपने स्वतःच्या नावाने थोरात यांच्या राजीनाम्याची मागणी करावी सकल हिंदू समाज व हिंदू युवकांचे नाव घेऊ नये आम्ही असा कोणताही ठेका संगमनेर भाजपला दिलेला नाही महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिंदू समाजावरील वाढते अत्याचार, महिला, शेतकरी, व्यापारी यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गोरक्षणाच्या मुद्द्यावरून संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट मोर्चा पार पडला. राजकीय पक्ष विरहित हा मोर्चा असल्याने यात सर्वपक्षीय हिंदुत्ववादी पदाधिकारी, कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. मात्र मोर्चाच्या यशस्वीततेनंतर त्याचे श्रेय घेण्याचा तसेच त्याला राजकीय वळण देण्याचा भारतीय जनता पक्षाने केविलवाना प्रयत्न सुरू केला असल्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मानव विकास संस्थेचे संस्थापक वसंत घोगरे यांनी दिली. याप्रसंगी जेष्ठ नेते सहकार महर्षी दिलीप देशमुख, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पद्मश्री तात्याराव लहाने उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज हिरालाल पगडाल साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील पालगड येथे झाला. आयुष्यभर अज्ञान, विषमता, पारतंत्र्य याच्याविरोधात संघर्ष करणाऱ्या गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले. साने गुरुजी क्रांतिकारक होते, लढवय्ये होते, व्यक्तिमत्वाला अनेक पदर होते पण त्यांचे व्यक्तिमत्त्व रणझुंजार असतांना, करुणा वात्सल्य नम्रता प्रेम या चौकटीत गुरुजींची प्रतिमा बंदिस्त करण्यात येथील व्यवस्थापती यशस्वी झाले. साने गुरुजी म्हंटले की सगळ्यात अगोदर समोर येते ती म्हणजे श्यामची आई. याच श्यामची आईमुळे साने गुरुजींची प्रतिमा मातृहृदयी अशी निर्माण झाली. आजही मराठी सारस्वतात श्यामची आई हेच सर्वाधिक लोकांनी वाचलेले पुस्तक आहे. आचार्य अत्रेंनी १९५२ साली श्यामची आई…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | ज्ञानेश्वर गायकर देशाचे नेते शरद पवार यांनी शनिवारी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन कार्यकारी अध्यक्ष मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची नियुक्ती करण्यात आली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देऊन अन्य खासदारांना काय जबाबदारी देता येईल, याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवली असली तरी, संघटनात्मक जबाबदारीमध्ये अजित पवार यांना कोणतेही स्थान मिळाले नाही. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी ह्या सर्व बाबींचे स्वागत केले आहे. पुढे अजितदादाच राज्याचे मुख्यमंत्री असणार हेही पवारसाहेबांनी अधोरेखित केले. याबद्दल मीडिया, अंध भक्त आणि घाणेरडा आयटी सेल…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो, मुंबई सारं काही माझ्यामुळेच घडतं. विश्वाचा निर्माता मीच, अशा अहंकारात वावरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार बालासोरच्या भीषण रेल्वे अपघाताने लोप पावला तर चांगलंच. पण घमेंडी माणसाची देहबोली तसं होऊ देत नाही. शाबासकी घ्यायची असेल तर मी आणि संकट आलं की दुसर्याला पुढे करण्याची हिकमत मोदींनाच शोभते. इतरांच्या ती अंगलट आली असती. स्वातंत्र्यानंतर आजवरच्या भीषण अपघातातील एक अशा बालासोरच्या तिहेरी रेल्वे अपघाताने हाह:कार माजला नसता तर नवलच. या घाताने भारत सरकारचा, सरकार चालवणार्या भाजपचा आणि भाजपचं नेतृत्व करणार्या मोदी-शहांच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटला. तरी निर्लज्जासारखी ही माणसं लोकांना फसवताहेत. भाजप सत्तेच्या…
नासिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यात सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत तरुणांना विनंती केली आहे की… बघा व्हिडिओ
