Author: अनंत पांगारकर
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम सन २०१६ पासून राबविण्यात येत आहे. योजनेची उद्दीष्टये :- ????नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. ????शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. ???? पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ????कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. योजनेचे वैशिष्टये :- ????कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. ????खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेलो आहे. ????विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. ????शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम २ टक्के…
शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. वाळू विक्री केंद्राच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत आहे. यातील सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसात वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राच्या कामकाजाचा महसूलमंत्र्यांनी सोमवारी (ता. १५ मे) श्रीरामपूर येथे आढावा घेतला. यावेळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सामंत, महसूली कर्मचारी, तलाठी आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, नायगाव वाळू केंद्रावर पंधरा हजार…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक न करता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विवेक अशोक पवार (वय ३५ वर्ष) असे या लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. पवार यांनी तक्रारदाराचा मावस भाऊ आणि त्याच्याबरोबर असलेले चार सहआरोपी यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करता अटकपूर्व जामीन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात दुचाकीचोरांनी आपले टार्गेट बदलले असून आता जुन्या दुचाकी ऐवजी नव्या दुचाकीकडे लक्ष वळविले आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास दुचाकीचोरांनी कोल्हार-घोटी मार्गावरील गांधी मोटर्स टीव्हीएस शोरूमचे पत्र्याचे गोडाऊन फोडत पावणेतीन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरून नेल्या आहे. अधिकारी बदलूनही नव्या अधिकाऱ्यांना शहरात कायद्याचा धाक निर्माण करण्यात यश येताना दिसत नाही. दररोज सुरू असलेल्या चोऱ्यांमुळे संगमनेरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांवर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस यंत्रणेमुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांच्या माहितीचा अभाव असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे चोरट्यांचे फावले आहे. तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदाराचीच पोलीस यंत्रणा उलट तपासणी घेऊ लागल्याने नागरिकांना देखील पोलीस ठाण्याची…
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) सध्याचे सीबीआयचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाल संपत आल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी कर्नाटकचे पोलीस महासंचालक राहिलेले प्रवीण सुद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने महासंचालकपदी ही निवड केली आहे. सीबीआयच्या महासंचालकपदाचा सूद यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असला तरी तो पाच वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो. सध्याचे सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचे ते जागा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांमधून प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मोदींच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. कर्नाटकचे बीजेपी…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले एक विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आहे. खासदार राऊत यांच्या विधानावरून त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खासदार राऊत हे ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभासाठी नासिक मध्ये आले होते. याच विवाह समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने याच दिवशी अंतिम निकाल जाहीर केला होता. दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान हा निकाल आला आणि त्यानंतर सायंकाळी चार…
कर्नाटक सरकार मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेणार पाच महत्त्वाचे निर्णय; राहुल गांधींनी दिले संकेत
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) मतदारांनी बहुमताने कर्नाटक काँग्रेसच्या हाती सोपविल्यानंतर काँग्रेसने सरकार येताच आपल्या आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्या पाच वचनांच्या बळावर काँग्रेसला सत्ता सोपविले गेली त्या पाच वचनांची पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्तता करण्यासाठी मंजुरी दिली जाणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकहाती मोठा विजय मिळवत भाजपला सत्तेत येण्यापासून रोखले आहे. काँग्रेस सत्तेत येण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाच घोषणा कर्नाटकमध्ये महत्त्वपूर्ण ठरल्या आहे. यामध्ये सखी योजनेअंतर्गत कर्नाटकमधील सर्व महिलांना मोफत बस प्रवास, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये, युवा निधी अंतर्गत कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना दरमहा तीन हजार रुपये, बेरोजगार…
रविवार विशेष लेख महाराष्ट्रातल्या 2021मधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्यानंतरही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव म्हणजे ‘आयजीची खाट आणि बायजीचा थाट’ असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सारी पिसं उपटूनही आपणच जिंकल्याचं आणलेलं उसनं अवसान म्हणजे लाज कोळून पिण्याचा प्रकार होय. प्रचंड लत्ताप्रहार होऊनही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव पाहाता आजचे सत्ताधारी लाज कोळून पिणारे सत्तापिसाटच म्हटले पाहिजेत. महाराष्ट्रात अस्तित्वात आलेली सत्ता ही बेकायदा आणि घटनेची सारी तत्व गुंडाळून आलेलं सरकार होय, असं स्पष्ट मत व्यक्त होऊनही कोणी आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्या बुध्दीची तपासणीच करायला हवी. काहींना आनंद साजरा करण्यात असुरी असते. तीच असुरी…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोपरगाव तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुका प्रशासनाच्यावतीने नऊ ठिकाणी ‘गुलाबी मतदान केंद्र’ उभारण्यात आले होते. या उल्लेखनीय उपक्रमांची राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’ गृहपत्रिकेत दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने दर सहा महिन्यांनी ‘निवडणूक वार्ता’ ही गृहपत्रिका (न्यूज लेटर) प्रकाशित करण्यात येते. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निवडणूक वार्ताच्या सहामाही अंकात पृष्ठ क्रमांक ९ वर कोपरगाव तालुका प्रशासनाने राबविलेल्या ‘गुलाबी मतदान केंद्र (पिंक बूथ)’ या उल्लेखनीय उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे. कोपरगावचे तहसीलदार विजय बोरूडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडल्या. यात शिंगणापूर…
कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोपरगाव तालुक्यातील जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर कडे जाताना या दांपत्याचा अपघात झाला. अशोक विठ्ठल गुंड (वय 58 वर्ष) व शोभा अशोक गुंड (वय 53 वर्ष रा. जळगाव, ता. राहाता, जि. अहमदनगर) हे दांपत्य शनिवारी (ता. 13 मे) सकाळी संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरून जात असताना साडे आठ वाजण्याच्या दरम्यान जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अशोक गुंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शोभा गुंड या…
