Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल आणि बाहेर उभ्या असलेल्या कारमधून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून, एकूण ५,४४,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी साहेबराव भिकाजी राहिंज (वय ४६, रा. पिंपरणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत शिवाजी आढाव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास पिंपरणे ते संगमनेर रोडवरील ‘हॉटेल गरीब’ येथे ही कारवाई…
संगमनेर: संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ही घटना ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास डिग्रस ते ठाकरवाडी रोडवरील मेंगाळवस्ती येथे घडली. या कारवाईत दोन डंपर आणि वाळू असा एकूण २० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश जबाजी कर्डीले यांनी याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केवळ संगमनेर शहरातच नव्हे तर संगमनेर तालुक्यात येथील यामुळे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरला अवैध धंद्यांनी पोखरले आहे. यातून गुन्हेगारी…
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली हानी सारा महाराष्ट्र आज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आपल्या मागे विश्वासू राजकीय वारस नसेल तर त्या राजकीय पक्षाचं कसं होतं याचं उदाहरण म्हणजे दादांच्या पक्षाची होत असलेली वाताहत होय. दादांच्या जाण्याने निर्माण झालेला त्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न अधिक गहिरा बनला आहे. दादा निर्णय घेताना जणू आपल्याच कानात पुटपुटायचे, ते आपल्याशी बोलायचे, ते आपले सल्ले घ्यायचे, अशी दावेदारी सध्या सुरू आहे. जो तो स्वार्थी पध्दतशीर आपली पोळी भाजून घेत आहे. ज्यांनी दादांना मदत केली त्यांना दावे करण्याचा जरूर अधिकार आहे. पण त्यांनी दादांना धमकावलं, त्यांच्या राजकारणाचा बट्टयाबोळ केला…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आर्थिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी ओळख होईल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात व्यवसायात होऊ शकतो. मिथुन: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. सर्जनशील कामात रस वाढेल आणि मित्रमंडळींसोबत बाहेर जाण्याचे बेत आखले जातील. कामात काही आव्हाने येऊ शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर…
संगमनेर, प्रतिनिधी – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्री पूर्ण दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या कार्यान्वित नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण शक्यता निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करण्याची पूर्वतयारी ठेवावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात विशेष नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार खताळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून आणि कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या चालकावर शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी डीजे साहित्यासह मुद्देमाल जप्त केला असून संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घुलेवाडी परिसरातील ‘अमृता लॉन्स’ येथे नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी ‘जनता बँड’ मालकीचा डीजे संच कोणताही अधिकृत परवाना नसताना अत्यंत मोठ्या आवाजात वाजवला जात असल्याचे निदर्शनास आले. या…
संगमनेर/श्रीरामपूर: राज्यात नवीन फौजदारी कायदा ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, उत्तर नगर जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’ सदृश कारवाईचा धडाका लावला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीवर आता भारतीय न्याय संहितेचे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे केवळ ८-१० दिवसांत जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांना आता किमान एक वर्ष जेलमध्येच राहावे लागणार असून, त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती श्रामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत असताना,…
संगमनेर, प्रतिनिधी – टोल नाक्यावरील २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आमदार अमोल खताळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, कामगारांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून टोल नाका कायमचा बंद पाडू, असा सज्जड इशारा दिला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता शिवसेना महायुती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. गेल्या नऊ-दहा वर्षांपासून इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे.आर.आर. रोडवेज कंपनीच्या चालक राजपाल यांनी कोणताही पूर्वविचार न करता कामावरून हटवले असून, काही जणांच्या पगारातही मोठी कपात केली आहे. या दडपशाहीविरोधात…
महाराष्ट्रातील प्रगतशील आणि सर्वांगीण विकसित तालुक्यांचा विचार केला, तर आज बारामतीपाठोपाठ संगमनेर तालुक्याचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घेतले जाते. संगमनेरची ही शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती एका दिवसात झालेली नसून, त्यामागे १९८५ पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेले अथक परिश्रम आणि अविश्रांत कष्ट आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दूरदृष्टीने संगमनेरचा कायापालट केला आहे, म्हणूनच त्यांना या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार मानले जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांचा आणि संघर्षाचा वारसा घेऊन बाळासाहेबांनी राजकारणात प्रवेश केला. एका दुष्काळी तालुक्याला सधन बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्याची सुरुवात १९८९ मध्ये…
महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा या भूमीला लाभला आहे. याच विचारांच्या पायावर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. हाच विकासाचा वारसा अत्यंत निष्ठेने आणि संयमाने पुढे नेणारे नेतृत्व म्हणून आज माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट’ ठरले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाया त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत दडलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.…
