Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज तब्बल सात महिने उलटून गेल्यानंतर देखील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणाऱ्या म्हाळुंगी नदीतील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासन अद्यापही करू शकले नाही. पालिकेत सुरू असलेला प्रशासकीय कारभार आणि राजकीय श्रेय वादाच्या टोलवाटोलवीमध्ये या फुलाचा प्रश्न अडकला असल्याने आता या प्रश्नी स्थानिक नागरिक आणि संगमनेरकरांनी आपली वज्रमुठ आवळली असून आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (२४ एप्रिल) म्हाळुंगी नदीवरील पडलेल्या पुलाच्या दुरुस्ती करता आंदोलन करण्यात येणार असून तशा आशयाचे निवेदन तब्बल दीडशे लोकांनी प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रश्नी संगमनेरकरांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या असल्याचे दिसते. या पुलावरून दररोज हजारो व्यक्तींची…
महाराष्ट्र संवाद न्यूज रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील दोन गटात झालेल्या दंगलीमुळे ईदच्या सणाला संगमनेरमध्ये गालबोट लागले आहे. शहर पोलिसांनी नगरसेवकासह निष्पन्न झालेल्या आठ जणांसह 28 जणांविरोधात दंगल, विनयभंग आणि शस्त्राचा वापर आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एकास अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटातील वादाची परिणती प्राणघातक हल्ल्यात झाली. शहरातील नाईकवाडपुरा भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. हाणामारीमध्ये तलवार, चाकू, हॉकी स्टिकचा वापर करण्यात आल्याने चार जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रात्री नाईकवाडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी रमजान ईदच्या पवित्र सणाला…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल चाळीस हजाराची लाच मागणारा तलाठी आणि त्या तलाठ्यासाठी छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी एजंट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. धनराज नरसिंग राठोड (वय ४० वर्ष) असे लाचखोर तलाठ्याचे तर योगेश विठ्ठल काशीद (वय ३३ रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर) असे लाचखोर खासगी एजंटचे नाव आहे. संगमनेर मध्ये शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळापुर येथील बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तसेच त्यावर वडील व इतर ११ जणांची नावे असलेला हा उतारा तक्रारदार व्यक्तीला हवा होता. त्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज समाजामध्ये महिला बालकांवर होणारे अन्याय अत्याचार तसेच बालविवाहासारख्या चुकीच्या प्रथांवर प्रतिबंध आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशासन व सर्व समाज घटकांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी केले. संगमनेर तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व मुख्य प्रशासकीय विभागांच्या प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. नायब तहसीलदार गणेश तळेकर व राजेश पऊल, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, संगमनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोर्डे, ॲड. रंजना गवांदे आदी उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले तालुक्यातील आंभोळ गावचे सुपुत्र असलेल्या विजय चौधरी यांना राज्याच्या नगर विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अभियंता पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. मुंबईत नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले विजय चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देय क्षेत्रापोटी सन २०१९ ते २०२३ या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे अकराशे कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. संचालक नगर…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत तब्बल 91 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. 171 गावे आणि अडीचशेच्यावर वाडीवस्ती असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार थोरात यांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या आदी विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहे. सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो. अहमदनगर जिल्हा परिषद सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पालक हे मुलांचे प्रथम शिक्षक तर शिक्षक मुलांचे दुसरे पालक असतात. नीती मूल्यांची नैतिक शिकवण देत परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, असे प्रतिपादन देवगड विद्यालयाचे मावळते मुख्याध्यापक रमेश पावसे यांनी केले. 33 वर्षाच्या शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक पावसे सेवानिवृत्त झाले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयामध्ये आयोजित सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कढणे होते. पुण्याच्या जलजीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यावेळी उपस्थित होते. पावसे यांनी केलेल्या शैक्षणिक सेवेची दखल घेत संस्थेतर्फे त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह देण्यात आले. राजेंद्र रहाणे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता त्यांच्यात मूल्यांची, चांगल्या विचारांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आजी-माजी महसूल मंत्री थोरात-विखे समर्थकांमध्ये निवडणूक रंगणार आहे. 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एकही जागा होऊ शकलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कृषी पतसंस्था मतदारसंघातून सर्वसाधारण गटात 18, महिला राखीव गटात 4, इतर मागास प्रवर्ग गटामध्ये 2, विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये 2, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेवर 6, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 2, दुर्बल घटक प्रवर्गातून 2, व्यापारी अडते मतदार संघातून 6 व हमाल मापारी मतदारसंघातून 3 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरात आर्थिक फसवणुकीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. जमीन विकत घेणाऱ्या शेतकऱ्याकडून पंधरा लाख रुपये घेतल्यानंतरदेखील खरेदी दस्त नोंदणीवेळीच पळवून नेल्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला. पीडित शेतकऱ्याने या संदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली पण उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भास्कर गीते (रा. पिंपरीलौकी, अजमपुर ता. संगमनेर) यांनी संगमनेर न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून अमोल रामदास गीते आणि रामदास लक्ष्मण गीते (रा. बोल्हेगाव रोड, एमआयडीसी, मोनालिसा नगर, नागापूर, अहमदनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला…
महाराष्ट्र संवाद न्यूज वारंवार टाकलेल्या छापल्यानंतर देखील संगमनेरातील बहुचर्चित कत्तलखाने सुरूच आहेत. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला न घाबरणाऱ्या कसायांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आपले धंदे सुरूच ठेवले आहे. गुरुवारी पहाटे पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयातील पथकाने केलेल्या एका कारवाईत तब्बल १७०० किलो गोमांस आणि दोन चार चाकी वाहने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. संगमनेर शहरातील मोगलपुरा येथे आयुब तांबोळी यांच्या चाळेच्या दोन नंबरच्या खोलीमध्ये सोन्या कुरेशी व त्याचा साथीदार सलीम कुरेशी हे दोघे गोवंश जनावराची कत्तल करत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. उपाधीक्षक संजय सातव यांनी आपल्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव…
