Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजकुमार गांधी यांची तर उपाध्यक्षपदी आनंद दरडा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष कांतीलाल गांधी, उपाध्यक्ष प्रितेश पारख यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. यासाठी सोमवारी सहकार अधिकारी ए. एस. शेख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीदरम्यान अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी आणि उपाध्यक्षपदासाठी आनंद दरडा यांनी आपले अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदी राजकुमार गांधी व उपाध्यक्षपदी आनंद दरडा या दोघांच्याही निवडी बिनविरोध पार पडल्या. अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी यांचे नाव…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये येत्या शनिवारी २२ एप्रिलला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २५ वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत यंदा संगमनेर तालुक्यातील २५ जोडपी विवाहबद्ध होतील. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास दहा हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली. मालपाणी उद्योग समुहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांनी १९९७ साली या उपक्रमाची सुरुवात केली. लोकहिताचा हा उपक्रम जनतेच्या उस्त्फुर्त प्रतिसादाने रौप्यमहोत्सवी ठरला आहे. गेल्या अडीच दशकांत या सोहळ्याच्या माध्यमातून बाराशेहून अधिक परिवार एकमेकांशी जोडले गेले. अवघ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज वादळामुळे शेतामध्ये तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने कृषी व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे रविवारी (१६ एप्रिल) सकाळी घडली. विजय साहेबराव पवार (वय ४६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय पवार हे रविवारी सकाळी आपल्या शेतामध्ये डाळिंब बागेला औषध मारत होते. शनिवारी झालेल्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून त्यांच्या शेतात पडलेल्या होत्या. या तारेतून वीज प्रवाह सुरू असल्याने पवार यांचा झालेला धक्का लागला. त्यामुळे जोराचा शॉक बसल्याने ते जागीच कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने संगमनेरमध्ये उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू…
संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याच्याजवळ झोपतेस अशी विचारणा करत दोघांनी तिचा ब्लाउज फाडून विनयभंग केला तर फिर्यादी घरी परतल्यानंतर त्याला दारातच अडवून बांबू आणि कोयत्याने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी कामानिमित्ताने संगमनेर येथे आलेला होता. त्याचवेळी आरोपींनी गैर कायद्याची मंडळी एकत्रित जमवत फिर्यादीच्या घरी जाखुरी येथे जात फिर्यादीकडे कामास असलेल्या महिलेस तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याचे जवळ झोपतेस, असे म्हणत दोघा आरोपींनी तिचा ब्लाउज फाडून…
महाराष्ट्र संवाद | रविवार विशेष गौतम अदानींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, पूर्वी टाटा, बिर्ला यांचीही अशीच नावं घेतली जायची, या प्रकरणाची जेपीसी चौकशीची आवश्यकता नाही, जेसीपीत सत्ताधाऱ्यांचा भरणा असतो, मोदींना त्यांच्या शिक्षणावरील मुद्यावर जाणीवपूर्वक अडवलं जात आहे. ही सारी वक्तव्य बारामतीच्या पवार कुटुंबाकडून उघडपणे येऊ लागली तेव्हाच पाल चुकचुकली. काहीतरी विपरीत घडतं असल्याची चाहूल लागली. देश मोदींच्या नावाने खडे फोडत असताना बारामतीच्या शरद पवारांना आणि त्यांचे पुतणे अजित पवारांना अदानी आणि मोदींचं भरतं आलेलं पाहून सारा देश चकित झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोघं नवा अध्याय तयार करायला निघाले आहेत असा साऱ्यांचा समज होता. त्यांना वाटलं लोक आपल्या…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज भारताचे संविधान हे जगातील अतिशय उत्कृष्ट असे संविधान असून मानवतेच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत संगमनेर साहित्य परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. संगमनेर साहित्य परिषदेचा वर्धापनदिन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभदिनी हॉटेल सत्यशिवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष मेजर लक्ष्मण ढोले, सचिव दिलीप उदमले, वाचन मंडळ प्रमुख मनोज साकी, प्रकल्पप्रमुख गिरीश सोमाणी, प्रा. शशांक गंधे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ३० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून संगमनेरच्या न्यायालयात होणाऱ्या या लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाने केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संगमनेर तालुका वकील संघ, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून प्रलंबित दिवानी दावे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, नियमांतर्गत तडजोड होणारी फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, घरगुती हिंसाचार, विद्युत कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे, बँकांकडील वसुली दावे, भू-संपादन, लवाद अर्ज व दरखास्त आदी स्वरूपांच्या प्रकरणांचा निपटारा या लोक अदालतीमध्ये करण्यात येणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज जलजीवन मिशनच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा एका बालिकेच्या जीवावर बेतला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदकाम सुरू आहे. खोदलेल्या चारीतील पाण्यात पडून सात वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. मधुबाला शाम साळुंखे (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. एकीकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शुक्रवारी (ता.१४) दुपारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नारायण जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मधुबाला ही नारायण जगन्नाथ पवार यांचे नात असून ते…
शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील पाळणा दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना एसएमबीटी रुग्णालयातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. रामनवमी उत्सवावेळी शिर्डीमध्ये झालेल्या पाळणा दुर्घटनेमध्ये साळवे आणि साबळे या सर्वसामान्य कुटुंबातील पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या कुटुंबीयांची माजी मंत्री थोरात यांनी भेट घेत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर थोरात यांनी तातडीने धामणगाव येथील एसएमबीटी या सेवाभावी रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे.…
शिर्डी, महाराष्ट्र संवाद न्यूज सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील ७ कोटी ७८ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राहाता पंचायत समितीचे…
