Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना नफा-तोट्याच्या पुढचे सामाजिक आणि आर्थिक गणित समजत नसल्याचा थेट आरोप करत नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे नेण्याच्या केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा गळा घोटणारा असल्याचा संताप व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी अत्यंत तीव्र शब्दांत घणाघाती टीका केली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी पसरली असून, याविरुद्ध व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, हा निर्णय एका सरळ आणि सोप्या प्रकल्पाला जाणीवपूर्वक गुंतागुंतीचे करण्याचे उत्तम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील सुकेवाडी रोड येथे अनिकेत अशोक इथापे यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता आणि प्रशासनाने नोटीस बजावूनही बेकायदेशीरपणे पाच मजली (जी प्लस फोर) इमारतीचे बांधकाम केले आहे. या धोकादायक अवैध बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणी इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना दोन पत्रे देऊन दोन आठवडे उलटले आहेत, तरीही अद्याप संगमनेर शहर पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. नगरपालिका प्रशासनाने संगमनेर शहर पोलिसांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, अनिकेत अशोक इथापे यांनी सर्वे नंबर १५३/१/१ येथील जागेवर कोणत्याही…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन आणि उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रमानंतर यश नक्की मिळेल, त्यामुळे केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहारात मात्र थोडा संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील सदस्यांशी सुसंवाद वाढेल आणि वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे आज थोडे अधिक लक्ष देणे फायदेशीर ठरेल. ​वृषभ: तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. नको असलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आर्थिक हिताचे राहील. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे मानसिक प्रसन्नता टिकून राहील. ​मिथुन: व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीचे आणि सकारात्मक बदलांचे संकेत मिळत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  राहाता:  शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर आणि बांधकामावर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई ठरली असून, यामुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी राहता येथील एका कार्यक्रमात माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. मतदारसंघात महिलांची छेड काढणाऱ्यांच्या घरावर थेट जेसीबी चालवण्याचा इशारा त्यांनी दिला होता. गुरुवारी झालेल्या या धडक कारवाईमुळे विखे पाटील यांनी आपला शब्द कृतीत आणल्याची जोरदार चर्चा…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यासाठी सत्ताधारी आघाडीने आखलेली ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम म्हणजे राज्याच्या राजकारणातील काळा दिवस असल्याचा संताप राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकांनंतर शिवसेनेत फूट पडली होती आणि त्यानंतर आता पुन्हा तीच गोष्ट शिवसेनेसोबत होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतलेली ही अधोगती म्हणजे एक काळा इतिहास ठरेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “लोटस, टायगर, लायन… मला त्या जनावरांची नावे माहिती नाहीत; पण शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत.…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस घरातील कामांच्या व्यापात आणि धावपळीत व्यतीत होईल. अनेक कामे एकाच वेळी समोर आल्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो, म्हणूनच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे हिताचे ठरेल. मुलांकडून एखादी आनंददायी बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक थकवा जाणवण्याची शक्यता असल्याने विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज आळस झटकून पूर्ण उत्साहाने काम करण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या वाढल्यामुळे सुरुवातीला काहीशी चिंता वाटेल, परंतु सहकाऱ्यांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल आणि तुमची जिद्द व चिकाटी वाढीस लागेल. बोलताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा कुटुंबात विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षनिष्ठेशी तडजोड करणाऱ्या आणि मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात भविष्यातही यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी व शहर प्रमुख अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी साडेचार वाजता शिवसैनिकांनी एकत्र येत खासदार वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी खासदार वाकचौरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी…

Read More

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी गद्दारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी अखेर दिल्लीत लोटांगण घातले आहे. यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश असून, त्यांनी आपल्या दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या फुटीर खासदारांनी काल रात्रीपासूनच दिल्ली गाठून लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा अध्यक्षांनी या गटाला तात्काळ मंजुरी दिली असून, आता हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. काल रात्रीपासूनच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या २०२६-२८ या द्विवार्षिक निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुधीर श्रीराम डागा, श्रीनिवास फूलचंद भंडारी आणि गोरख वसंतराव कुटे हे तिघे कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. संघटनेत संगमनेरमधून दोघांची वर्णी लागली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निकालांनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापार व उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तिन्ही नेत्यांची निवड बिनविरोध झाली आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे निकाल आणि विजयी उमेदवारांची नावे – ​अध्यक्ष: सांगली जिल्ह्यातील रवींद्र परिसा माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ​वरिष्ठ उपाध्यक्ष: मुंबईतून करुणाकर शेखर शेट्टी हे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: शहरात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक धारदार चॉपर आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने १६ जून २०२६ रोजी संध्याकाळी ही धडक कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने जर्मन हॉस्पिटलच्या मागे, पाण्याच्या पाटाजवळ सापळा रचला होता. तिथे संशयास्पदरित्या थांबलेल्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता हा बेकायदेशीर हत्यारांचा साठा उघडकीस आला. या कारवाईत पोलिसांनी नाझीम अन्वर पठाण (वय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे धास्तावलेल्या व्यापारी वर्गाकडून मुंढे यांच्या बदलीसाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. बदलीच्या चर्चेवरून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सरकारला थेट इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांवर दररोज कठोर कारवाई करून कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. पूर्वी मनुष्यबळाची कमतरता सांगणारा हा विभाग आता अत्यंत सक्रिय झाला असून, नुकतीच पुण्यात साडेपाच हजार किलो आंबे आणि भेसळयुक्त आमरस नष्ट करण्याची मोठी कारवाई करण्यात आली. सनदी अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे त्यांना वारंवार बदलीला सामोरे जावे लागते. याचबरोबर सरकारकडून…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आज तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या चिंता आणि तणावातून मोठा दिलासा मिळेल. महत्त्वाची रखडलेली कामे नातेवाईकांच्या सहकार्याने मार्गी लागतील आणि एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडून उत्तम मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होतील, मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. वृषभ- आज कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील, ज्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असून दैनंदिन कामे विनाअडथळा पूर्ण होतील, परंतु खरेदी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याच्या…

Read More

​विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” अशी घोषणा करणारे अभिजित दिपके यांच्यावरील हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा थेट आरोप स्वतः दिपके यांनी केला आहे. ज्यांनी हल्ला केला, त्या संघाशी संबंधित हल्लेखोरांना संघाची फूस होती, असे दिपके यांनी म्हटले आहे. अभिजित यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ​जयपूरनंतर मंगळवारी नागपुरात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अभिजित म्हणाले, “सोमवारी माझ्यावर हल्ला झाला. माझ्यावर हल्ला करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ६ जूनला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले होते, तेव्हाच आम्ही अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  येथील सत्यशोधक विचारमंचच्या वतीने सुरू असलेल्या व्याख्यानमालेत शनिवारी (२० जून) प्रसिद्ध राजकीय विश्लेषक हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प आहे.  शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडताणी कॉम्प्लेक्समधील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. या व्याख्यानाचा मुख्य विषय ‘झुंजायच्या गोष्टी (सात हुतात्म्यांची झुंज)’ असा आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एका ओळीवरून हे शीर्षक घेण्यात आले असून, आपल्या विचारांसाठी आणि निष्ठांसाठी संघर्ष करताना ज्या मान्यवरांनी प्राणांची आहुती दिली अशा सात थोर व्यक्तींची संघर्षगाथा हनुमंत पवार या व्याख्यानातून मांडणार आहेत. संगमनेर आणि परिसरातील नागरिकांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रामराज्य हे केवळ शस्त्राच्या बळावर उभे राहत नसून, त्यासाठी शास्त्र, संस्कार आणि सदाचाराचा भक्कम आधार आवश्यक असतो. तसेच कोणतेही धर्मकार्य यशस्वी करण्यासाठी माणसाकडे दृढ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले आहे. गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सुमारे सात लाख भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे, कथेच्या सांगतेनंतर महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अधिक मासातील आठव्या पर्वाचे औचित्य साधून आयोजित या रामकथेच्या अंतिम सत्रात ढोक महाराजांनी आपल्या मधुर आणि ओजस्वी वाणीतून रामायणातील युद्धकांड आणि रामराज्य स्थापनेचे…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत दिवस प्रगतीचा असून जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ​वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे. अडकलेली कामे गतीने पुढे सरकतील आणि व्यावसायिक क्षेत्रात धनलाभाचे उत्तम योग आहेत. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे समाजात तुमचा मान-सम्मान वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल. मानसिक शांतता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने त्यांना निवडून दिले, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात खासदार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे. रूपवते यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गेल्या दोन वर्षांतील कारकिर्दीवर थेट आणि धारदार शब्दांत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत खासदार वाकचौरे यांच्या कामगिरीचा जाहीर पंचनामा केला. उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, ४ जून रोजी लोकसभेच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाली असून या काळात खासदारांनी मतदारसंघात नेमकी काय कामे केली आणि कोणत्या विकासकामांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई:  राज्य विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन आगामी २२ जूनपासून सुरू होणार असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. आज मुंबईत पार पडलेल्या विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाच्या एकूण कालावधीसह विधिमंडळ कामकाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. २२ जून ते १० जुलै अशा जवळपास तीन आठवड्यांच्या या कालावधीत राज्य सरकारकडून विविध प्रलंबित विधेयके मंजुरीसाठी पटलावर ठेवली जातील, तसेच राज्याच्या महत्त्वाच्या आर्थिक आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर दोन्ही सभागृहात चर्चा घडवून आणली जाईल. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हे पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: माणूस निसर्गातून जन्माला आला असून त्याला पुन्हा निसर्गातच विलीन व्हायचे आहे, हाच परमपूज्य गगनगिरी महाराजांचा संदेश होता. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण आणि निसर्गाचे जतन करणे हीच गगनगिरी महाराज आणि परमेश्वराची खरी सेवा ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. गुंजाळवाडी (संगमनेर) येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात झालेल्या परमपूज्य विश्वविभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या सांगता समारंभाप्रसंगी प्रसिद्ध समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले. या सोहळ्याला व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप…

Read More

मोहसीन शेख, संगमनेर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अँग्लो उर्दू हायस्कूल, संगमनेर येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन शेख गनी हाजीसेठ, अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्टचे चीफ ट्रस्टी अब्दुल्लाह हाजी हसन चौधरी, सेक्रेटरी हाजी पठाण शौकतखान मोहंमदखान, ट्रस्टी हाजी शेख एजाज शमशुद्दीन तसेच शालेय समिती सदस्य हाजी इनामदार शमशुद्दीन जैनुद्दीन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व, शालेय शिस्त आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक…

Read More