Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 जणांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखविणे असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान विवियाना मॉल मधील चित्रपटाचा शोध बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकांने शो बंद पाडल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले होते तसेच कोण जितेंद्र आव्हाड अशी विचारणा केली होती. यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आमदार आव्हाड यांच्यासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेडमध्ये असून गुरुवारी रात्री यात्रेत सहभागी झालेल्या दोघा यात्रेकरूंना ट्रकने उडविण्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये असून या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या यात्रेतून एक दुःखद घटना समोर आली. नवीन मोंढा परिसरातील सभा संपल्यानंतर यात्रा महादेव पिंपळगाव येथील कॅम्प कडे रवाना झाली. रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव येथील नांदेड अकोला पाळी चालणाऱ्या गणेशन (वय ६२वर्ष) आणि सययुल (वय ३० वर्ष) या दोघांना ट्रकने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा पुढे येऊ लागली आहे. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी नितीन गडकरी यांच्यासह दहा खासदारांचा राजीनामा मागितला जाणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे. या संदर्भात समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी म्हटले आहे की, संसदेत या खासदारांनी विदर्भ स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी ठराव न केल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. विदर्भा संदर्भात खासदारांना प्रेम राहिले नसल्याने या खासदारांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना राजीनामा मागितला जाणार आहे. वेगळ्या विदर्भासाठी भुवनेश्वर मधील अधिवेशनात भारतीय जनता पक्षाने ठराव केला होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं मात्र ते पाळले गेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राजकारणातली कटूता संपली पाहिजे. एका पक्षाने ठरवून ती संपणार नाही. सर्वांनीच ती संपवली पाहिजे. पण सोबतच नेत्यांनी शांत राहायचं आणि कुणाला तरी बोलायला सांगायचं ही प्रथा पण बंद झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. गुरुवारी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकारणातील कटूतेवर भाष्य केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकारणातील कटुता संपवायला हवी’ या आपल्या विधानाचा पुनरुच्चार करत खासदार राऊत यांना चिमटा काढला आहे. खासदार राऊत यांच्या जामीनाबद्दल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, न्यायालयाने निर्णय दिला आहे. तो योग्य की अयोग्य यावर ईडी बोलेल, ते उच्च न्यायालयात गेले आहे. त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘विशेष मोहीम’ राबविण्यात आली. या मोहीमेत बारा तासाच्या आत 142 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. शैक्षणिक प्रकरणांच्या त्रुटी पूर्ततेसाठी ही मोहीम राबविण्यात आली. सध्या सीईटी-नीट परीक्षेच्या प्रवेश फेऱ्या चालू आहेत. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची शैक्षणिक कागदपत्र जमवाजमव करण्याची धावपळ सुरू आहे. या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास पानसरे, सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अखंड भारताची संकल्पना घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील या यात्रेत जनसागर उसळला असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी होत आहेत. कन्याकुमारी येथून निघालेली ही भारत जोडो यात्रा ६० दिवसांचा प्रवास करून ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेडमधील देगलूरला आली. तेथे काँग्रेसच्या वतीने यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभारी एच. के .पाटील, पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संजय राऊत यांच्या धाडसाचं तसेच त्यांच्या कुटुंबीयांचही कौतुक वाटतं. संजयला बेकायदेशीररित्या पत्राचाळ प्रकरणात अडकवण्यात आल. मी न्यायदेवतेचे आभार मानतो, कारण त्यांनी योग्य तो न्याय केला. या प्रकरणावरून सिद्ध झाले की केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत आहे. खासदार राऊत यांनी जामीनावर सुटल्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. खासदार राऊत यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात नवं सरकार सत्तारूढ झाल, त्यावेळी मी तुरुंगात होतो. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातल्या सरकार तेच चालवत आहे आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या फडणीसांविषयीच्या कौतुकास्पद उद्गाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची बुधवारी रात्री तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.…
प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतनाचा निधी इतरत्र वळविल्याने शिक्षण संचालकांकडून कारणे दाखवा नोटीस
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन विहित मुदतीत न दिल्याच्या कारणावरून आणि उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करत शासनाची प्रतिमा मलीन केल्याच्या कारणावरून शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी संचालनालय स्तरावरून तेरा हजार सातशे दहा कोटी सात लाख चौदा हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. असे असताना देखील राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले नाही. पुरेसे अनुदान उपलब्ध करून देऊन देखील वेळेत शिक्षकांचे पगार झाले नसल्याने शिक्षकांमध्ये प्रशासना विरोधात रोष निर्माण झाला आहे. वितरित करण्यात आलेले अनुदान हे केवळ नियमित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते व खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुगांतून तब्बल तीन महिन्यानंतर जामीनावर सुटले आहे. शिवसेनेची बुलंद तोफ असलेले राऊत तीन महिन्यानंतर पुन्हा परतले असून ‘टायगर इज बॅक’ अशा घोषणा देत संगमनेरमध्ये त्यांच्या सुटकेचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात आला.बसस्थानक चौकात शहरप्रमुख प्रसाद पवार, माजी जिल्हा प्रमुख जयवंत पवार, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, समीर ओझा, भैय्या तांबोळी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, जालिंदर लहामगे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, जालींदर लहामगे आदींसह शिवसैनिकांनी जल्लोष करत राऊत यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करीत त्यांच्या सुटकेचे स्वागत केले. फटाक्याच्या आतीषबाजीने बसस्थानकाचा परिसर दुमदुमला…
