Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय हा जात-धर्म आणि भेदापलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र गुंफण्याचे कार्य करतो, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला थोर संतांची परंपरा लाभली असून, संत ज्ञानेश्वरांनी रचलेले ‘पसायदान’ हे केवळ काव्य नसून ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असलेले महाकाव्य आहे. सध्याच्या जागतिक युद्धाच्या आणि अशांततेच्या वातावरणात जगाला पसायदानाचा विचारच तारू शकतो. ज्ञानेश्वर माउलींनी स्वतःच्या आयुष्यात मोठा संघर्ष सोसूनही जगाच्या सुखासाठी साकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका छोटा हत्ती वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ६४ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात दोन खराब आरोपींचा समावेश आहे. स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर शुक्रवारी सकाळी अकोले ते धामणगाव पाट रोडवर पाझर तलावाजवळ ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संगमनेरमधून ही दारू विक्रीसाठी नेली जात होती. श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकोले परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी, ११ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम लेखक आणि पत्रकार पी. साईनाथ हे ‘शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर १२ एप्रिल रोजी तरुण पिढीतील लोकप्रिय वक्ते डॉ. स्वप्नील चौधरी यांचा ‘चल दंगल समजून घेऊ’ हा संवेदनशील विषयावरील विशेष कार्यक्रम होईल. १३ एप्रिल रोजी वारकरी संप्रदायातील प्रभावी प्रवचनकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी सायंकाळी निळवंडे धरणातून १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागाला तातडीने सूचना दिल्या होत्या. संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून गावपातळीवरील जलस्रोत आटले आहेत. यामुळे नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले होते. या सर्व परिस्थितीचा विचार करून हे बिगरसिंचन आवर्तन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले भंडारदरा धरणाच्या मागील बाजूकडील सर्व आदिवासी गावे आणि धरण भिंतीच्या पूर्व भागातील परिसराला शासकीय योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणास अखेर सुरुवात झाली आहे. किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या लाँग मार्चमधील मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी अकोले तहसील कार्यालयात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व सीटूच्या विविध संघटनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवला, तर प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार मोरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. बैठकीत कोळेकर यांनी माहिती दिली की, लाँग मार्चमध्ये मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी उन्हाची वाढती तीव्रता व लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली टंचाई विचारात घेऊन, भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे आवर्तन तातडीने सुरू करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या संगमनेर, राहाता व श्रीरामपूर तालुक्यांतील बहुतांश गावांत पाण्याची टंचाई भासू लागली आहे. गावपातळीवरील पाण्याचे स्रोत कमी पडल्याने तसेच नदीकाठच्या गावांत पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामपंचायतींसह नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. आवर्तन सुरू करताना शेवटच्या गावापर्यंत पाणी मिळेल, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच पाण्याचा अपव्यय होणार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर मधील सोनांबेकर रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांवर रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने हॉस्पिटलने ओपन स्पेस मध्ये केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांच्याकडे केल्यानंतर पालिका प्रशासनाने लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुवारी धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान ओपन स्पेसमध्ये हॉस्पिटल प्रशासनाने टाकलेली भिंत आणि एका खोलीचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या पथकाने काढून टाकले आहे. सकाळी केलेल्या या कारवाईमुळे आता धन दांडग्यांच्या अतिक्रमणावर पालिकेचा जेसीबी पडला आहे. त्यामुळे सरकारी जागा बळकवण्याचा रुग्णालय प्रशासनाचा इरादा ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागणीनंतर प्रशासनाने हाणून पाडला आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस सोनांबेकर हॉस्पिटलमधील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी माजी महापौर अभिषेक कळमकर विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमकर विरुद्धचा हा दुसरा गुन्हा असल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीडित तरुणीची ओळख आरोपीशी झाली होती. पीडितेने ती बेरोजगार असल्याचे सांगितल्यानंतर कळमकरने तिला नोकरीचे आश्वासन दिले. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये त्याने पीडितेशी पुन्हा संपर्क साधून तिला नगर क्लबजवळील एका निर्जन ठिकाणी बोलावले. तिथे कारमध्ये तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची भक्कम सत्ता असताना आणि तालुक्यात महायुतीचे आमदार कार्यरत असतानाही, संगमनेरमध्ये पक्षाची झालेली दयनीय अवस्था सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. “महाराष्ट्र संवाद न्यूज”ने या दुर्दैवी स्थितीवर आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे निर्माण झालेल्या अस्तित्वाच्या संकटावर प्रकाश टाकल्यानंतर, आता भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. या घटनेनंतर पक्षातील दोन्ही गट एकमेकांवर थेट पत्रकबाजी करत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण अधिकच तापले आहे. एकेकाळी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यात वर्चस्व राखणारा हा पक्ष आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले असून, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होत असल्याचे चित्र निर्माण झाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर हलगर्जीपणामुळे दत्तात्रय दळवी या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील दोन्ही दोषी डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, रुग्णालय सील करावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. संगमनेर पोलिसांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांची कृती संशयास्पद ठरल्याने या गुन्ह्याची माहिती समोर येण्यास तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला असून यादरम्यान आरोपी पसार झाले…

Read More