Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज चारित्र्याचा संशय घेत पत्नीच्या डोक्यात पाटा टाकून तिचा खून केल्याप्रकरणी पतीस संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड द्रव्याची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश नामदेव धांडे, वय 36 वर्ष, रा. आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे 12 नोव्हेंबर 2018 रोजी खुनाचा हा प्रकार घडला होता. आरोपी प्रकाश धांडे यांच्यावर पत्नी शांता हिच्या खुनाचा आरोप होता. या संदर्भात घारगाव (ता. संगमनेर) पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात मृत शांता धांडे हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शांता हिचा मामेखेल येथील एका व्यक्तीशी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनैतिक संबंधाचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वकिलाला गळा दाबून, मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावामध्ये मंगळवारी अहिंसेचा संदेश देणाऱ्या महावीर जयंती दिनी घडली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वकील महिला जिल्ह्यातील एका न्यायालयात वकिली करत आहे. या महिलेच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, ही बाब त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी या संदर्भात पतीला समजावून सांगण्यासाठी आपल्या सासूला सांगितले होते. महावीर जयंतीदिनी 4 एप्रिल ला संबंधित महिला आपल्या घरी असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या महिलेच्या सासूने तिच्या पतीस आणि महिलेचा पती असलेल्या मुलास…
महाराष्ट्र संवाद न्यूज □ अनंत पांगारकर ऐतिहासिक असलेल्या संगमनेरच्या हनुमान रथोत्सव मिरवणूक गेल्या वर्षी एका वेगळ्याच वादात सापडल्यानंतर यावर्षी मात्र पोलीस प्रशासनाचा मानाचा ध्वज वाजत गाजत आणत तो रथावर फडकाविण्याचा मान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कायम ठेवला. गतवर्षी निर्माण झालेल्या वादामुळे हा ध्वज आणण्याचा मान पोलीस निरीक्षकांऐवजी इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस उपनिरीक्षकाला मिळाला होता. संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने निघणाऱ्या रथ मिरवणुकीला एक वेगळी परंपरा लाभली आहे. कोरोना संकटानंतर गतवर्षी संगमनेरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार भाजपच्या नेत्या चित्रा वाघ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील तत्कालीन नगराध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर शिवसेनेतील सर्वात मोठ्या फुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अमर कतारी यांच्यावर सातव्यांदा शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविले गेली. त्यानंतर कतारी यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांचा “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत शहरात एकाच दिवशी सर्व प्रभागात पंधरा शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या. या शाखांची उद्घाटन करताना संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शहरप्रमुखांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. संगमनेर शहरातील सर्वच्या सर्व पंधरा प्रभागामध्ये बुधवारी (५ एप्रिल) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख आदींच्या हस्ते या शाखांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोपरगावचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज रात्रंदिवस माणसांची वर्दळ असलेल्या बस स्थानकासमोरील काश्मीर हॉटेललगत अज्ञात चोरट्याने दोन किराणा दुकान फोडत दुकानातील रोकड रकमेसह सिगारेट, विलायची असा पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असलेला परिसर आणि सातत्याने 24 तास माणसांची वर्दळ असलेल्या ठिकाणी झालेली ही चोरी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तुषार अशोक राठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातून जाणाऱ्या नासिक-पुणे महामार्गावर बस स्थानक आणि हॉटेल काश्मीर या गजबजलेल्या परिसरात काश्मीर हॉटेल लगत राठी यांच्या मालकीची किराणा दुकाने आहेत. फिर्यादी तुषार राठी हे सोमवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपापल्या करियरसाठी धावत आहे. मात्र, तुमच्याकडे कौशल्ये नसतील तर केवळ पदवीला काहीही अर्थ नाही. आता तुमच्या थेट कामातून उच्च गुणवत्ता अपेक्षित आहे, म्हणूनच कामाचा निखळ आनंद मिळवून समर्पितवृत्तीने कार्य करणारे तरुणच भारताला सामर्थ्य संपन्न बनवतील, असे प्रतिपादन संगमनेर येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी केले. मास्टर लर्नर्स फोनिक्स फाऊंडेशन तर्फे आयोजित प्रज्ञावंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फोनिक्स फाऊंडेशनच्या संस्थापक माया परदेशी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुचित गांधी उपस्थित होते. कडलग म्हणाल्या, परंपरागत शिक्षण कुचकामी ठरत असतांना विद्यार्थ्यांनी नाविन्याची कास धरून आत्मविश्वासाने पुढे जावे. प्रामाणिकपणा जपा, विचलित होऊ नका.…
महाराष्ट्र संवाद न्यूज सध्या सुरू असलेल्या कामांचा निधी मागील मविआ सरकारच्या काळातील आहे. मात्र सध्याचे पालकमंत्री मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत. काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते, हे सर्व जनतेला माहिती आहे. असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी महाविकास…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशाच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा शुभारंभ देशभरातील १ लाख ५९ हजार पोस्ट ऑफिसेसमधून करण्यात आला. संगमनेरमध्ये गणेशनगर मधील रहिवासी अपर्णा जोशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रथम महिला मानकरी ठरल्या. संगमनेरमधील मुख्य डाकघर येथे यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निश्चित व्याजदर व जास्त परतावा यामुळे ही योजना महिलांच्या आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी व्यक्त केला. निश्चित आर्थिक ध्येयपूर्ती करण्यासाठी महिलांनी या खात्याचा लाभ घ्यावा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऐतिहासिक शहागडाच्या पायथ्याशी असलेल्या पेमगिरी येथे सर्वात उंच मारुतीरायांच्या ३० फूट गदेचा लोकार्पण सोहळा हनुमान जन्मोत्सव दिनी गुरुवारी (६ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, अभिनेता देवदत्त नागे, प्रा. नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. पेमगिरी हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक गाव असुन शहागड व भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष या गावात आहे. याचबरोबर आता नव्याने सर्वात उंच मारुतीरायांची ३० फूट गदा या ठिकाणी उभारली आहे. हनुमान जन्मोत्सव दिनी या ऐतिहासिक गदेचा लोकार्पण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, प्रतिनिधी शहराच्या व्यापार क्षेत्राला दिशा देणार्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदार व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आगामी वर्षभरात संस्थेतील ठेवींचा आकडा दोनशे कोटींच्या पार नेण्याचा संकल्प आहे. विविध ग्राहकोपयोगी सुविधा, स्वच्छ व पारदर्शक व्यवहार आणि उच्च कोटीची कामकाज प्रणाली यामुळे आधुनिक संस्थांच्या पंक्तितही संस्थेने भरारी घेतली आहे. ठेवीदारांच्या याच विश्वासाच्या जोरावर संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात १६९ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडतांना विक्रमी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी दिली. संस्थेच्या ३१ मार्च अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देतांना विद्यमान अध्यक्ष विशाल पडताणी म्हणाले, कोविड संक्रमणाच्या कालावधीनंतर जगभरात निर्माण…
