Author: अनंत पांगारकर
प्रवीण पूरो | रविवार विशेष सत्ता माणसाला जशी लाचार बनवते तशी ती घमेंड चढवते असं म्हणतात. जो या दोन्हीपासून स्वत:ला सावरतो तोच सत्तेवर स्वार होतो. ही सत्ता डोक्यात गेली तर त्याचं हसं होतं. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्थिती अशीच काहीशी झाली आहे. गेल्या आठवड्यात पाटलांनी टीव्हीचा पडदा आपल्याकडे खेचून घेतला होता. तो सकारात्मक मुळीच नव्हता. पाटलांमध्ये आलेल्या गुर्मीचा तो आखो देखा हाल होता. स्वत:ला संघाचा पायिक समजला जाणारा माणूस इतका खाली येऊ शकतो, याची लाज संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटेल इतका माजोरडेपणा पाटलांच्या नसानसात भिनलेला जगाने पाहिला. संघाचं लेबल लावलेली माणसं इतकी वाह्यात नसतात,…
महाराष्ट्र संवाद न्यूज बापलेकीच्या नात्याला काळीमा फासत आपल्या अल्पवयीन चौदा वर्षे वयाच्या मुलीवर बापाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या तक्रारीवरून बापाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापाने दोनदा अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर 15 एप्रिल 2022 रोजी पुणे येथे अत्याचार करण्यात आला. त्यानंतर 12 जून 2022 रोजी सायंकाळी मामाच्या गावी सोडण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घाट बहिरवाडी शिवार (ता. नगर) येथील जंगलात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घरी आई आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज धर्मांतराच्या कारणावरून संगमनेरच्या उपनगरामध्ये दोन गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय हस्तक्षेपानंतर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटाच्या आक्रमकतेनंतर शहर पोलिसांनी सामंजस्याचा मार्ग निवडत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळले. शहरातील उपनगरात काही लोकांना हेरून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याच्या संशयावरून काही तरुणांनी धर्मांतर करू पाहणाऱ्या लोकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता धर्मांतर करून घेऊ पाहणाऱ्या आणि त्यांना जाब विचारणारामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. राहुरी येथील धर्मांतराचे प्रकरण ताजे असतानाच संगमनेर असा प्रकार घडत असल्याच्या समस्यावरून निर्माण झालेला दोन गटातील तणाव बराच काळ सुरू होता. उपनगरामध्ये दुसऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या माजी सहसचिव आणि अकोले तालुक्यातील इंदोरी येथील शेतकरी कन्या शर्मिला येवले हिने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. येवले यांच्यासोबत आणखी सोळा पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली असल्याची माहिती मिळते. पक्षांतर्गत असलेल्या मतभेदांवर भाष्य करत येवले यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा सुरू झाली असताना त्यांनी वरून सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेतच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात राहण्याला पसंती दर्शविली होती. मात्र त्यानंतर देखील येवले पक्षामध्ये फारशा सक्रिय राहिल्या नाही. मध्यंतरी त्या आपल्या काही सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात…
महाराष्ट्र संवाद न्यूज खंडणीसाठी धान्य व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती. नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाचा शुक्रवारी न्यायालयाने अंतिम निवाडा केला आहे. विशेष मोक्का न्यायाधीश आदिती कदम यांनी आरोपींपैकी दोघाजणांना दोषी ठरविले असून त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरित तिघा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केले आहे. राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित बाफना हत्याकांडा बाबत नासिक जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती. चेतन यशवंतराव पगारे (वय २५ वर्ष, रा. ओझर टाऊनशिप) व अमन प्रकटसिंग जट (वय २२ वर्ष, रा. केवडीबन, पंचवटी) या दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तर संशयित आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सार्वजनिक उद्योग विक्रीस काढले आहे. कामगार विरोधी धोरण राबवत असताना सरकारच्या भांडवलदारधार्जिने धोरणामुळे कामगारांनी यापुढील काळात संघर्ष आणि त्यागाची तयारी ठेवली पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले. संगमनेर तालुका तंबाखू कामगार युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर १० व ११ डिसेंबरला पार पडले. कांगो यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कामगार व शेतकरी यांचे प्रतिक असलेल्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करत मानवंदना देण्यात आली. तसेच कॉ. सहाणे मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.…
जलद व आरामदायी प्रवास झाल्याची प्रवाशांची भावना महाराष्ट्र संवाद न्यूज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शुक्रवारी नागपूर-शिर्डी दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. जलद व आरामदायी प्रवासाचा २० प्रवाश्यानी आनंद घेतला. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून १५ डिसेंबरला रात्री ९ वाजता निघालेली बस (एमएच ०९ एफ.एल. ०२४८) शिर्डी बसस्थानकावर १६ डिसेंबरला पहाटे ५ वाजता पोहचली. ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने निघालेल्या बसला गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यानचे ५४० किलोमीटर अंतर कापण्यास सात तास लागले. आज हीच बस रात्री ९ वाजता शिर्डीहून नागपूरकडे प्रस्थान करणार आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर रोजी समृध्दी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान किसान सन्मान निधीची (पीएम किसान) नगर जिल्ह्यामध्ये ९० हजार ११३ लाभार्थ्यांची बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित आहे. केंद्र शासनाकडून या योजनेचा १३ वा हप्ता वितरण करण्यापूर्वी ही बँक खाती आधार संलग्न असणे अनिवार्य आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार संलग्न करून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांवरच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली खाती आधार संलग्न करण्याची आवश्यकता आहे. लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न असतील तर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता नाही. आधार संलग्न केलेल्याच बँक खात्यांमध्ये यापुढील…
शिवसेनेच्या आंदोलनाला मोठे यश आंदोलकांपुढे झुकले महावितरणचे अधिकारी महाराष्ट्र संवाद न्यूज विविध कारणांमुळे महावितरण विरोधात संगमनेरकरांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. महावितरणच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी संगमनेर शहर शिवसेना आणि संलग्न संघटनांनी (ठाकरे गट) महावितरणच्या कार्यालयावर हातात ‘दंडुके’ घेत हल्लाबोल करण्याचा इशारा देतात नरमलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तलवारी म्यान करत आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्याने होऊ घातलेले आंदोलन थांबले आहे. विज बिलासंदर्भात तक्रार असलेल्या कोणत्याही ग्राहकाची वीज जोडणी आता तोडली जाणार नाही, हे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळालेले मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करत झालेल्या चर्चेदरम्यान यासंदर्भात आंदोलकांना लेखी पत्र देण्यात आले आहे. संगमनेर शहर…
महाराष्ट्र संवाद न्यूज समाजामध्ये लव जिहादचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असून मराठा समाजातील मुली त्याचे बळी ठरत असल्याने समाजाने यासाठी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे. संगमनेर येथील विश्रामगृह येथे आयोजित नगर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठकीत कोंढरे बोलत होते. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, राहुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, राहता तालुकाध्यक्ष प्रकाश निर्मळ, अजय हासे, साहेबराव दातखिळे आदी उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, अखिल भारतीय मराठा महासंघाचा माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून युवकाना कर्ज मिळवून देण्याबरोबर व्यवसायिक मार्गदर्शन केले पाहिजे. सारथीची…
