Author: अनंत पांगारकर
संगमनेर: तालुक्यातील जोर्वे परिसरात अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,५९,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल गंगाधर बोरकर (वय ५६, रा. नवीन गावठाण, जोर्वे) हे दि. १० जानेवारी २०२६ च्या संध्याकाळी ६ ते दि. ११ जानेवारी २०२६ च्या सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घरी नसताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने बोरकर यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील शोकेसमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरीला गेलेल्या…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘संगमनेर सेवा समिती’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रचना मालपाणी यांच्यासह सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी आज या नावांची अधिकृत घोषणा केली. या निवडीबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर २.० चा जाहीरनामा आणि शहराच्या विकासाचे एक विशेष व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली होती. यावर विश्वास ठेवून संगमनेरच्या ७० टक्के मतदारांनी सेवा समितीला मोठे यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली असून कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने स्वीकृत नगरसेवक…
संगमनेर, प्रतिनिधी- वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्य युद्धात उडी घेऊन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्या तत्त्वांची मूल्ये जपत निष्ठा, शिस्त, काटकसर आणि नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते निर्माण केले. सहकार, शेती, शिक्षण, समाजकारण आणि पर्यावरण या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर…
सौ. दुर्गा सुधीर तांबे (माजी नगराध्यक्षा, संगमनेर) महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही व्यक्ती अशा असतात, ज्या केवळ एका पिढीचे नेतृत्व करत नाहीत, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी विचारांचा वारसा निर्माण करतात. माझे वडील, ज्यांना आम्ही सर्वजण आदराने ‘दादा’ म्हणायचो, म्हणजेच स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे अशाच प्रगल्भ नेतृत्वांपैकी एक होते. नेते, सहकारमहर्षी, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक विविध क्षेत्रांतील अभ्यासू नेतृत्व म्हणून दादांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आमचा थोरात परिवार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ‘जोर्वे’ गावचा. जोर्वे हे केवळ एक गाव नाही, तर ती एक प्राचीन संस्कृती आहे. ज्या संस्कृतीचा उल्लेख ताम्रपाषाणयुगीन कालखंडाशी जोडला जातो, त्या मातीत दादांचा जन्म १२…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा असून कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभाचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, फक्त रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, कारण कुटुंबातील सदस्यांचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. मिथुन: व्यापार करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक असून नवीन संधी चालून येतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि मित्रपरिवारासोबत प्रवासाचे बेत आखले जातील, मात्र संवाद साधताना स्पष्टता ठेवा. कर्क: आज कामाचा व्याप वाढल्याने थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो, पण तुमची जिद्द तुम्हाला यश…
संगमनेर, प्रतिनिधी- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे. आमदार खताळ यांनी निवेदनात नमूद केले आहे की, त्यांच्या संगमनेर मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील अनेक लाभार्थी महिलांकडून या योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने ई-केवायसी प्रक्रिया करताना अनेक महिलांकडून अज्ञानामुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे ‘घरामध्ये शासकीय कर्मचारी आहे’ हा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे संबंधित…
नाशिक: सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. किशोर दिनकर सोनवणे (वय २९, रा. महाकाली चौक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २ मे २०१९ रोजी नाशिकमधील सिडको परिसरातील साईबाबानगर, महाकाली चौक येथे घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी घरासमोर इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी आरोपी किशोर सोनवणे याने घराच्या गच्चीवरून एक उशी खाली फेकली. मुलीला ती उशी घेऊन गच्चीवर येण्यास सांगून, तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर, अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा…
संगमनेर, प्रतिनिधी- कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाने’ लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ज्ञानकुंभाला गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ३ लाख ९ हजार ४७२ नागरिकांनी भेट दिली असून, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत आहे. माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री दिनेश ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण मलिक, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या…
अहिल्यानगर- कोपरगाव शहर परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पथकाने कोपरगाव परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये पोलीस अंमलदार दीपक मेढे, राहुल द्वारके, राहुल डोके, सतिश भवर, सुनिल मालणकर आणि चालक भगवान धुळे यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या मागे मनोज चंद्रकांत…
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महाराष्ट्राची लाज आणि शरम अक्षरश: रस्त्यावर आणली आहे. पत्रकारितेच्या 35 वर्षांच्या काळात निवडणुकांची इतकी अधोगती आम्ही पाहिली नाही. गडबड केली तर हातची उमेदवारी जाईल, आचारसंहिता भंग केला तर पोलीस कारवाई होईल, अशा संविधानिक दडपणात होणार्या राज्यातील निवडणुका म्हणजे देशातील निवडणुकांचा आदर्श मानला जाई. पण गेल्या दहा वर्षांपासून निवडणुकांचं झालेलं अवमुल्यन पहाता निवडणुका म्हणजे केवळ बाजार झालाय, असंच म्हणता येईल. निवडणुकांतील वाढता काळाबाजार हे लोकशाहीचं अध:पतनच ठरलंय. याआधी महाराष्ट्रासारख्या राज्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एव्हाना काहीसा बरा होता. पण विकासाच्या मुद्यापेक्षा लाळघोटेपणाला महत्व आल्यापासून महाराष्ट्र हे निवडणुकांसाठी नालायक राज्य ठरलं आहे. याची सर्वस्व जबाबदारी ही सत्ताधार्यांकडेच…
