Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना पदाधिकाऱ्यांना दूर ठेवत शनिवारी सकाळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेला काही दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत खदखद यामुळे समोर आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले होते. यात काही पदाधिकाऱ्यांचे पद काढून घेण्यात आले होते. तर त्यांचा पदभार नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत म्हणविणारे नाराज झाले. पदच्युत झालेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख खेवरे यांच्यावरील आपल्या निष्ठा कायम ठेवत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला निर्णय घेण्याचे जाहीर केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपली सत्ता केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच धोक्यात आणू शकतो याची जाण सत्ताधाऱ्यांना असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत याचाच अर्थ आपला पक्ष बलशाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या राज्यस्तरीय शिबिराला शुक्रवारी शिर्डीत सुरुवात झाली. यावेळी पाटील बोलत होते. शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत आणि अस्वस्थ आहे. सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत…
(महाराष्ट्र संवाद न्यूज च्या वाचकांसाठी दैनिक सामना मधील बातमी सोबत देत आहोत) महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्याबाबत काही समाजकंटकांनी अश्लाघ्य वर्तन केले आहे. असे वर्तन करणाऱ्या समाजकंटकांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काहीही संबंध नाही. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयातून सचिव खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे नव्याने केलेल्या नियुक्ती यांना ब्रेक लागला असून आता शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवे पदाधिकारी कधी जाहीर होतात, याची शिवसैनिकात उत्सुकता आहे. शिवसेना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमधून वाहणाऱ्या अमृतवाहिनी प्रवरा नदीमध्ये मोठ्या पुलाजवळ काही अंतरावर शुक्रवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा शोध घेण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.शुक्रवारी सकाळी प्रवरा नदीपात्रातील मोठ्या पुलाखाली आणि तेथून काही अंतरावर असलेल्या फादरवाडी जवळ नदीपात्रात दोन पुरुषांचा मृतदेह आढळून आला शहर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्रातून काढत शवविच्छेदनासाठी नगरपालिकेच्या विच्छेदन गृहामध्ये आणले होते.दरम्यान दोन मृतदेंपैकी एकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून हा मृतदेह शहरातीलच मोगलपुरा पुणे नाका येथील अमोल अण्णासाहेब आव्हाड याचा असल्याचे स्पष्ट झाले आव्हाड बेपत्ता झाल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहे. अशावेळी राज्य सरकार महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आणून मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचे सांगत आहे. तुम्ही भरती करणार असाल तर किती प्रकल्प राज्यात येणार आहे. आणि किती भरती करणार आहात. याची माहिती राज्याला द्या, असे जाहीर आव्हान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या शिबिराला शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात शिर्डीमध्ये प्रारंभ झाला. तत्पूर्वी पवार माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, “आम्ही पण बरीच वर्षे सरकारमध्ये काम करत आहोत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना आम्ही…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर नजीकच्या हिवरगांव पावसा येथील टोल प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामूळे आत्तापर्यत अनेक अपघात झाले. यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांचा मृत्यू झाला तरी टोल प्रशासन आपल्या कारभारात सुधारणा करावयास तयार नाही. टोल वसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोल प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली आरपारच्या लढाईच्या इशारा देत शुक्रवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.टोल प्रशासनाच्या विरोधात आत्तापर्यत सर्वच पक्षांनी आंदोलने केली, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याशिवाय ठोस अशी कोणतीही कृती टोल प्रशासनाने केलेली नाही. स्थानिक नागरिकांनादेखील टोल…
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील घटना महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आईवडीलांच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याला त्यांच्या कुशीतून ओढत त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. चिमुरड्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्यामुळे जाग्या झालेल्या आईवडीलांनी बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली असली तरी या घटनेत चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्याला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. विरु अजय पवार असे या चिमुरड्याचे नांव आहे. सध्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु आहे. यासाठी संगमनेर तालुक्यात काही ऊसतोडणी कामगार आले आहेत. थोरात कारखान्याच्या ऊसतोडणीशी संबधीत असलेले २० मजुरांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रमध्ये प्रवेश करणार असून लोकशाहीच्या विचारांना ताकद देणाऱ्या या यात्रेचे देगलूरमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. महाराष्ट्रात या यात्रेचा प्रवास 381 किलोमीटरचा राहणार असून या दरम्यान दोन भव्य सभा देखील होणार आहेत. याबद्दलची उपरेषा माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. नांदेड ते बुलढाणा दरम्यान 14 ठिकाणी या यात्रेचा मुक्काम राहणार असून 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पहिल्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीतील एका अधिवेशननंतर सरकार पडले होते आता आमच्या अधिवेशनानंतर देखील शिंदे फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे असे आम्ही स्नेही खासदार सुजय विखे पाटील यांना शिर्डीत जाऊन सांगणार आहोत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व पाच नोव्हेंबर रोजी ‘राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा’ हे शिबिर होत आहे. या राज्यव्यापी शिबिरासाठी आजी-माजी आमदार खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पत्र वाघ यांना दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणे, महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे यामुळे त्या भाजपच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी निवड करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविल्याचे मानले जाते. याआधी महिला प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे काम पाहत होत्या मात्र त्या विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर या जागेवर आता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे…
