Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रातील तमाशा रसिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष आणि संगमनेरचे सुपुत्र असलेल्या रघुवीर खेडकर यांनी आपल्या असामान्य कलागुणांच्या जोरावर पारंपरिक लोककलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना होती. मात्र, संगमनेरमधील राजकीय परिवर्तनानंतर आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर यासाठी विशेष पाठपुरावा केला. कांताबाई सातारकर पुरस्कार सोहळ्यादरम्यान संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक/चांदवड: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘महाविकास आघाडी’च्या वतीने चांदवड येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता डावे पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन आणि शासनाकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या बळाच्या वापराचा किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. आतापर्यंत हे आंदोलन केवळ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सुरू होते. मात्र, आंदोलकांची गळचेपी करण्यासाठी शासनाने ज्या प्रकारे बळाचा वापर केला आहे, ते पाहता आता डावे पक्ष आणि शेतकरी संघटना या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर डाव्या आघाडीच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. ऑनलाइन पारदर्शकतेचा दावा केला जात असला तरी, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १३४ मदत प्रकरणे प्रलंबित राहिली असून, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबे २ कोटी ६५ लाख रुपयांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या सलग दोन वर्षांत एकही प्रस्ताव प्रलंबित नसताना, यंदा मात्र निधीअभावी लाभार्थींना ताटकळत राहावे लागत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ३९० प्रस्ताव दाखल झाले होते. यामध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: गेल्या एका वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला अहिल्या नगर जिल्ह्यात तब्बल ५५ बालविवाह रोखण्यात मोठे यश आले आहे. या कारवाईदरम्यान बालविवाहाचे उल्लंघन करणाऱ्या १५ कुटुंबांविरोधात एफआयआर (गुन्हे) दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायद्याची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने “बालविवाह मुक्त भारत” अभियान मोठ्या जोमाने राबविले जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या मातोश्रींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे मनातील चिंता दूर होईल. आर्थिक बाबींमध्ये आजचा दिवस लाभदायक ठरेल आणि अचानक धनलाभाचे योग येतील. जुन्या मित्रांशी किंवा ओळखीच्या व्यक्तींशी अनपेक्षित भेट झाल्यामुळे मन आनंदी होईल. आज तुम्ही तुमच्या कामाचे योग्य नियोजन केल्यास तुम्हाला कामात हमखास यश मिळेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. एखादी चांगली किंवा गोड बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाचे योग्य नियोजन करूनही मनात थोडी धाकधूक किंवा चिंता राहील, पण तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील, परंतु त्यासोबतच खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाने अनेकांना मंत्रिपदे आणि विरोधी पक्षनेते पदे देऊन मोठे केले, मात्र त्यांनीच कठीण काळात पक्षांतर करून सत्ताधारी पक्षाचा रस्ता धरला. संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी स्वतः चार पक्ष बदलून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षनिष्ठेवर बोलण्यापूर्वी स्वतः कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे. आपली राजकीय उंची किती आणि आपण कोणावर बोलतोय याचे भान त्यांनी ठेवावे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच संगमनेर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या एकनिष्ठेचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुका महसूल स्थळ सीमा हद्दीत तब्बल १९ जणांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रवेशबंदीचा आदेश शनिवारपासूनच (दिनांक २३ मे) लागू झाला असून, तो दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना संगमनेर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: महाराष्ट्राच्या मातीतील जिवंत लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगमनेर तालुक्याचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांचा नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेडकर यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते खेडकर यांना पद्मश्री चे वितरण करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. रघुवीर खेडकर यांना मिळालेल्या या बहुमानामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा सन्मान झाला असून, संगमनेरकरांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा ठरला आहे, अशा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नियमित प्रशिक्षण सुरू असताना एका स्मोक हँडग्रेनेडचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून मुख्यालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटात शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना अत्यंत गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. यातील काही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते. मिळालेल्या माहितीनुसार, जमाव नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडची…
विशेष प्रतिनिधी, अलिबाग: पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभिळ गावाजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. पर्यटकांची स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण (वय १८ ते ३५ वर्षे) शुक्रवारी कोकणात सहलीसाठी आले होते. दापोलीतील हर्णे येथून रविवारी परतत असताना…
