Author: अनंत पांगारकर
रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात लोकसभेत देण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा आणि त्याला सत्ताधार्यांनी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं उत्तर जगाने पाहिलं. डोक्यात गेलेली सत्ता, या सत्तेचा अहंकार आणि सत्ता आपल्यासाठीच असल्याचा माज पाहून अनेकांना हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत याचंच आश्चर्य वाटत होतं. गेल्या नऊ वर्षांच्या सत्तेत जी दुषणं मोदींनी विरोधकांना दिली त्यात जराही फरक जाणवला नाही. सत्तेतील एखादा मंत्री किंवा खासदार खोटं बोलला तर त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. त्याला तितकं महत्व देत नाहीत. पण देशाचा प्रमुख असलेला पंतप्रधानच खोटं बोलू लागला तर ती लोकशाहीची आणि संसदेची थट्टाच होय. अर्थात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी मधून पुणेकरांची सुटका होण्यासाठी आता हवेतून चालणाऱ्या बस सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री होते उपस्थित: केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. गडकरी म्हणाले: पुण्यातील वाढती वाहनांची संख्या, प्रदूषण, कचरामुक्त पुणे यासाठी गडकरी यांनी उपाय सुचवत माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्काय बसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – गाव पातळीवर असलेल्या प्रत्येक यंत्रणेने सतर्क आणि संवेनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे. यापुढे निष्काळजीपणामुळे एकही जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहायला हवे. अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी प्रशासनाला केल्या. घेतली अधिकाऱ्यांची बैठक: कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची राज्य महिला आयोगाने सुमोटो दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुक्याचा दौरा करत याप्रकरणी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेत या प्रकरणी आढावा घेतला. काय होती घटना: वडाळी (नाशिक) येथील रहिवासी असलेली रेणुका किरण गांगुर्डे ही महिला आपल्या माहेरी कारवाडी (ता. कोपरगाव) येथे आली…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगर जिल्ह्यात मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत असुन घरोघरी जाऊन बीएलओ मतदारांची नाव नोंदणी करत आहेत. नागरिकांनी बीएलओंना मदत करुन आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यांची केली नियुक्ती: नव मतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील 107 महाविद्यालयामध्ये युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रत्येक महाविद्यालय स्तरावर बीएलओ, महसूल दूत व महाविद्यालयाचे नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातुन नव मतदारांची शंभर टक्के नाव नोंदणी करून घेण्यात येणार आहे. 12, 13 ऑगस्टला मोहीम: गृहनिर्माण संस्थामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची व भटक्या विमुक्त जमातीतील तांडा, वस्त्या येथील नागरिकांच्या मतदार नाव नोंदणीसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य व स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र संभाजीराव थोरात यांना तमिळनाडू सरकार व चेन्नईच्या एशिया इंटरनॅशनल कल्चर अॅण्ड रिसर्च विद्यापीठातर्फे “डॉक्टरेट आणि लोकहित सेवारत्न” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. राबविले वेगवेगळे उपक्रम: थोरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. अहमदनगर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे विशेष सामाजिक योगदान राहिलेले आहे. यांच्या उपस्थितीत झाला सन्मान: त्यांच्या कार्याची दखल घेऊन चेन्नई विद्यापीठाने त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जिनूरामा शर्मा, सिने अभिनेते शिवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बस स्थानकामध्ये एसटी बसच्या चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आयेशा मुनीर बेग (वय 55 वर्ष, रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्थानकामध्ये सिन्नर आगाराची नासिक-अहमदनगर (क्रमांक एम.एच 20 बीएल 4056) ही बस आली होती. या बसच्या चाकाखाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आयेशा बेग संगमनेर बस स्थानकावर आपल्या नातेवाईकांसह आल्या होत्या. बस चालक बस स्थानकामध्ये आपल्या ताब्यातील बस स्थानकाबाहेर नेण्याच्या बेतात असताना अचानकपणे त्या बसच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या बेग…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – स्वातंत्र्यदिनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा व नगरपालिका सांगण्यात उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिली. मुख्याधिकारी वाघ आमदार थोरात यांचे मानले आभार: निवेदनात करण्यात आलेली मागणी मान्य करण्यात आली असून प्रत्यक्षात कार्यवाहीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी समक्ष पाहणी करत घरांचे मोजमाप घेऊन मालमत्ता कराचे फॉर्म भरण्यास सुरुवात केल्याने नागरिकांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख कतारी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व संगमनेरचे लोकप्रतिनिधी, माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे. काय होती मागणी: शहरातील संजय…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पर्यावरण संवर्धनाची सर्वात मोठी लोक चळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून राजहंस दूध संघाने हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले असल्याने हा परिसर हिरवाईने फुलला असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. तर हिरवाई हीच खरी समृद्धी असल्याचे दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. वृक्षारोपण: हिवरगाव पावसा येथील देवगड डोंगर परिसरात संगमनेर तालूका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रीया संघाच्यावतीने दंडकारण्य अभियानांतर्गत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. हे होते उपस्थित: यावेळी प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे, दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – श्रेय लाटण्यासाठी राजकीय दबाव वापरत संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाने ग्रामीण रुग्णालयामार्फत सुरू करण्यात आलेला दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला. नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या भाजपच्या दबावाला शासकीय अधिकारी देखील बळी पडल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी केला आहे. कतारी यांनी काय म्हटले आहे: दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून योजना राबविल्या जातात. यासाठी गेल्या महिन्यात संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत संगमनेर तालुक्यातील साडेतीनशे दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. राजकीय दबावातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G-20 अंतर्गत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर झाला. रविवारी दिल्ली येथे शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G20 अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय एकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. थोरात यांची निवड: डॉ. जयश्रीताई थोरात या मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागात कार्यरत असून अत्यंत दुर्दम्य असणाऱ्या ब्लड कॅन्सर या आजारातील रुग्णांना त्यांनी…
