Author: अनंत पांगारकर
अकोले (प्रतिनिधी): अनेक प्रयत्न आणि प्रशासकीय पाठपुरावा करूनही अकोले तालुक्यातील अवैध दारूविक्री थांबत नसल्याने दारूबंदी समितीचे सदस्य तथा प्रसिद्ध समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासकीय यंत्रणेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आदेश देऊनही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा निषेध नोंदवत कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच, पुढील बैठकीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, संगमनेर, ठाणगाव आणि घारगाव येथील दुकानांतून दररोज अकोल्यात अवैध दारूचा पुरवठा होतो. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांना वारंवार…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: ग्राम विकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, तालुक्यात रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे निर्माण करून सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केला. या निधीतून चंदनापुरी ते शिरापूर दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तर पिंपरणे…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: संगमनेर तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक दिशा मिळताना दिसत आहे. पठार भागातील साकुर व बोटा परिसरात औद्योगिक वसाहत उभारण्याच्या दृष्टीने या भागातील दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिघात शासकीय अथवा खाजगी स्वरूपातील औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या जागांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांनी 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्याच्या पठार भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर 7 एप्रिल 2025 रोजी त्यांनी उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांना यासंदर्भात पत्र पाठवले. त्या पत्राची दखल घेत…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी एका निनावी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आणि सखोल तपासणी केली. मात्र, सुदैवाने काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने हा केवळ एक खोडसाळपणा आणि अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून आता कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे सुरळीत झाले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर हा धमकीचा संदेश धडकला. यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आणि तातडीने पोलीस विभागाला याची माहिती देण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर पोलिसांनी वेल्हाळे शिवारात मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. या कारवाईत ८ जिवंत बैलांची सुटका करण्यात आली असून, टेम्पोसह एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. मंगळवारी, (दि. १६ डिसेंबर) रात्री १०:५० च्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वेल्हाळे शिवारातून एका आयशर टेम्पोमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अनाधिकृत वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, राहुल…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हा आणि राज्यस्तरीय योगासन स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिल्यानंतर, संगमनेर शहराच्या शिरपेचात आता मानाचा राष्ट्रीय तुरा रोवला गेला आहे. आगामी २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत संगमनेरमध्ये सहाव्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर व सिनिअर ‘बी’ योगासन क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. योगासन भारत आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेसाठी संगमनेर सज्ज झाले असून, ध्रुव ग्लोबल स्कूलमधील क्रीडा संकुलात हा योगसाधनेचा महाकुंभ भरणार असल्याची माहिती योगासन भारतचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. पाच दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवासाठी देशातील २८ राज्यांमधून ७०० हून अधिक नामांकित योगासनपटू, त्यांचे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज): संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत सुरू असतानाच एका दुर्मिळ घटनेत नर आणि मादी बिबट्याची जोडी वनविभागाच्या पिंजऱ्यात एकाच वेळी अडकल्याची घटना घडली आहे. मिलनाच्या उद्देशाने एकत्र आलेली ही जोडी जेरबंद झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. मिर्झापूर (संगमनेर) येथील ‘गणेश मळा’ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. काही दिवसांपूर्वीच एका बिबट्याने शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला होता. बुधवारी (१७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास, भक्ष्याच्या शोधात किंवा मिलनाच्या ओढीने आलेले हे नर-मादी बिबट्यांचे जोडपे वनविभागाच्या…
मेष : आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. वृषभ : आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. मिथुन : तुमच्या संवाद कौशल्यामुळे आज कठीण कामे सोपी होतील. मित्र-मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कर्क : आज थोडे भावूक राहाल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. जोडीदारासोबत वेळ घालवणे चांगले ठरेल. सिंह : तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कन्या : नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. तूळ : जोडीदाराशी असलेले संबंध…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात मंजूर झालेली आणि नंतर राजकीय कारणास्तव रद्द करण्यात आलेली रस्ते कामे पुन्हा मार्गी लागली आहेत. एकूण ३०.५७० किलोमीटरपैकी १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना राज्य सरकारने नव्याने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, यामुळे तालुक्यातील चार मोठ्या ग्रामीण भागांतील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. राजकीय वळणांनंतर कामांना पुन्हा संजीवनी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील ८ महत्त्वाचे रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र, ७ ऑगस्ट २०२५ रोजी एका अनपेक्षित निर्णयाद्वारे शासनाने या सर्व कामांची प्रशासकीय…
अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज काही महिन्यांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपले… पदराखाली दोन काळजाचे तुकडे घेऊन माऊली माहेरी आधार शोधायला आली होती पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. वीरगाव (ता. अकोले) येथे सोमवारी सायंकाळी विहिरीत पडल्याने दोन चिमुकल्या बहीण-भावंडांचा अंत झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका दुर्दैवी मातेचा आधारच हिरावला गेल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीरगाव येथील एका शेतातील विहिरीत दोन बालके पडल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली. या घटनेत पीयूष पोपट मेंगाळ (वय ८ महिने) आणि श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) या दोन निष्पाप जीवांचा करुण अंत…
