Author: अनंत पांगारकर
सिहंस्थ कुभमेळ्याच्या निमित्ताने नाशिककरांच्या पर्यावरण अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कुंभमेळ्यात उपस्थित राहणार्या साधूंच्या निवासासाठी सरकारला साधूग्राम उभारायचंय. यासाठी तपोवनाची अनेक वर्षांची शान बनलेली 1800 मोठाली झाडं तोडण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. आपल्या कारकिर्दीला एक वर्षाचा काळ पूर्ण होत असताना स्वत:चे ढोल बडवणार्या सरकारचा या प्रश्नावरून होत असलेला निषेध खूपच बोलका आहे. सरकारमध्ये सारं काही अलबेल नाही, हे दर्शवणारा हा विरोध आहे. वाढता विरोध लक्षात घेता झाडं तोडून साधूग्राम बनवण्याचा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मागे घेतला पाहिजे. त्याऐवजी साधूग्राम न बनवल्यास कुंभमेळा कसा होईल, असले फालतू प्रश्न विचारत ते नाशिककरांच्या संतापात तेल ओतत आहेत. आपलं…
आजचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंतीचा असल्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी लाभदायक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. मेष : आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम आणि उत्साहवर्धक असेल. तुमच्या कामात नवीन ऊर्जा जाणवेल आणि अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आर्थिकदृष्ट्या हा दिवस लाभदायक ठरू शकतो, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. महत्त्वाच्या कामांची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कार्यपूर्तीचा असेल. हाती घेतलेले जुने प्रकल्प आणि कामे वेळेत व्यवस्थित पूर्ण होतील. घरात खरेदीचा किंवा महत्त्वाच्या वस्तू घेण्याचा योग आहे. आर्थिक बाबींमध्ये स्थिरता…
संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका करत, आयोग पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम मंत्रालयातील कोणीतरी पीए ठरवत असून आयोग त्याची अंमलबजावणी करत असल्याचा खळबळजनक आरोप थोरात यांनी केला. तसेच, मतदान आणि मतमोजणीतील २० दिवसांच्या अंतरावर आक्षेप घेत, EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) पेट्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि अचानक मतदान स्थगित केले जाते, असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नाही. सावळा गोंधळ…
मेष (Aries): घर-परिवारातील कार्यांसाठी उत्तम दिवस, अडकलेले धन परत मिळण्याची शक्यता, नोकरी आणि व्यवसायाच्या योजना चांगल्या, आरोग्य उत्तम. वृषभ (Taurus): व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल, बुद्धिमत्तेने कामात यश, वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील, आर्थिक बाजू बळकट करण्याचे निर्णय घ्याल. मिथुन (Gemini): दिवस उत्साहवर्धक आणि शुभ, नोकरीत समाधान, व्यवसायात प्रगती, भावंडांशी सलोखा वाढेल आणि आर्थिक लाभ संभवतो. कर्क (Cancer): संयम आणि विचारपूर्वक व्यवहार ठेवावा, आर्थिक व्यवहारात काळजी घ्या आणि जास्त खर्च टाळा, कौटुंबिक जीवनात लवचिक धोरण ठेवा. सिंह (Leo): दिवस शुभ फलदायी, कार्यक्षमता वाढेल, नवीन योजना यशस्वी होतील, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आणि सामाजिक मान-सन्मान वाढेल. कन्या (Virgo): सुख-समृद्धी लाभेल, बऱ्याच दिवसांची चिंता कमी होईल,…
मेष : आज तुम्हाला संबंधांमध्ये जुळवून घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. संयम आणि क्षमावृत्तीने वागल्यास ऐक्य टिकून राहील. शांत राहून जोडीदाराला त्यांचे विचार मोकळेपणाने मांडण्यास मदत करा. वृषभ : आज तुम्ही भावनिकदृष्ट्या सुरक्षित आणि समाधानी असाल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे, पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करा. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल, विशेषत: करिअरमध्ये. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करा आणि लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. कर्क : तुमचे आरोग्य आणि तंदुरुस्ती आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असेल. मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यान केल्यास…
दिल्लीतील केंद्र सरकारची प्राथमिकता काय हे आता जनतेला पुरतं कळून चुकलं आहे. सत्तेच्या पाच वर्षात मंदिरांची उभारणी आणि या मंदिरांवर झेंडे फडकवले की आपलं भागलं, असं वाटणार्या सरकारकडून फार अपेक्षा ठेवायचे दिवस राहिलेले नाहीत. देशात नव्या उद्योगाच्या मुहूर्ताचा झेंडा रोवला म्हणून कुठे गंध नाही. मात्र धर्माच्या नावाखाली लोकांना जखडून ठेवण्यासाठी सरकारच मंदिरांचे झेंडे लावणार असेल तर? असं आजवर कधी झालं नाही. प्रयागराजच्या कुंभमेळ्यासाठी एकीकडे 7500 कोटी खर्च केले आणि देशावर 2100 कोटींचा भार टाकला. कुंभ मेळ्यासाठी जर्जर झालेल्या उत्तर प्रदेशने 5435 कोटी रुपये खर्ची घालून स्वत:च्या तिजोरीला खाली केलं. या कुंभमेळ्यावर झालेल्या खर्चातील अधिकतर रक्कम सत्ताधारी पक्षाशी जवळकी साधणार्या कंत्राटदारांनी…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी उत्साह असेल आणि तुम्ही दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि लहान खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. वैयक्तिक आयुष्यात, जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर होईल आणि अविवाहितांना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आज तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील. वृषभ – आज तुम्हाला शांतता आणि संयम ठेवण्याची गरज आहे. कामावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाऊ शकते, पण अनावश्यक खर्च टाळून तुम्ही आर्थिक स्थिती चांगली राखू शकता. घरात शांतता राखण्यासाठी तुमचा समजूतदारपणा वापरा. मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान किंवा योगासने केल्यास फायदा होईल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष…
संगमनेर – श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या संगमनेर शाखेला दिलेला धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी न्यायालयाने विजू शांताराम नवले (रा. मालदाड, ता. संगमनेर) या आरोपीला दोषी ठरवले आहे. न्यायदंडाधिकारी सी. पी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने आरोपीला दोन महिने साधा कारावास आणि चेक रक्कम अधिक वीस हजार रुपये दंड भरण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायालयाने आरोपीला चेक रक्कम आणि दंड अशी एकूण रक्कम एका महिन्याच्या आत फिर्यादी कंपनीस देण्याचे निर्देश दिले आहेत. जर आरोपीने या मुदतीत दंडाची रक्कम भरली नाही, तर त्याला अतिरिक्त वीस दिवस साधा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपी विजू शांताराम नवले यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड, शाखा संगमनेर येथून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर गुरुवारच्या सभेत कोणीतरी ‘टायगर’ आला होता. टायगर हा स्वार्थी असल्याने एकटा येतो, तर जंगलचा राजा ‘सिंह’ (बाळासाहेब थोरात) सर्वांना बरोबर घेऊन येतो. राजकीय कार्यकर्त्याचे भाषण हे मुद्द्याचे असावे, करमणुकीचे नसावे, असा टोला नाव न घेता आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांना लगावला. उपमुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे खंडन करत, सत्ताधाऱ्यांचे राजकारण केवळ ‘करमणुकीचे’ असल्याचे सांगत संगमनेर सेवा समितीच्या विराट सभेत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भाषणातून महायुतीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना फोन करून मंजूर केलेल्या कामाचा दाखला दिला, परंतु ते काम माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या कारभारावर ‘टोल वसुली’ आणि ‘खोट्या आश्वासनांची बनवाबनवी’ ही दोन प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचा गंभीर आरोप करत संगमनेर येथील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर संगमनेर सेवा समितीच्या विराट जाहीर सभेत बोलताना जोरदार टीकास्त्र सोडले. शुक्रवारी सायंकाळी संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे, हिरालाल पगडाल, पप्पू कानकाटे, इसहाकखान पठाण, अजय फटांगरे, प्रमिला अभंग यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने…
