Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी संगमनेर येथील आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संगमनेर नगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेला ‘रक्षक दल’ हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे संकेत मंत्री तटकरे यांनी दिले आहेत. या भेटीच्या वेळी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे उपस्थित होत्या. दुर्गा तांबे यांनी मंत्री आदिती तटकरे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. चर्चेदरम्यान आदिती तटकरे यांनी संगमनेरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘रक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | आळेफाटा शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन धांदरफळ (ता. संगमनेर) येथे परतत असताना वाटेत नियोजनावरून वाद झाल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, वायरने आणि लाकडी काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सुरेश खुरपे (वय ३४) असे फिर्यादीचे नाव असून ते धांदरफळ येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज खुरपे व त्यांच्या गावातील अंदाजे ७० लोक दिंडीनिमित्त शिखर शिंगणापूरला गेले होते. ३० मार्च रोजी ते सर्वजण पायी गावाकडे निघाले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास हे लोक आळे रोडने जात असताना चार मोटारसायकलवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात रविवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने अत्यंत हिंसक पवित्रा घेत तिघांवर प्राणघातक हल्ले केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एकापाठोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये दुचाकीस्वार तरुण आणि एका डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास अभिषेक केशव खेमनर (वय ३४) आणि सार्थक सुनील खेमनर (वय १७) हे दोघे दुचाकीवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या अनपेक्षित आक्रमणामुळे दोघांनीही मदतीसाठी मोठा आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकताच बापूसाहेब निर्मळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश होणे अत्यंत आवश्यक असून, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा तीव्रतेने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव घुले येथील ग्रामस्थांना दिला. सावरगाव घुले येथे आयोजित खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून महाआरती केली. या कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीत यश मिळविल्याबद्दल मधुकर घुले यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश यापूर्वीच व्हायला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या निंदनीय घटनेतील पीडितेच्या पाठीशी शासन पूर्ण ताकदीने उभे असून, तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तिचे वय लहान असल्याने आणि त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस विशेष उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून तिची उत्तम काळजी घेतली जात असून, विशेष समुपदेशकाद्वारे तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. हे समुपदेशन…
आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याच्या, राज्यातील जनतेच्या हिताचा जराही विचार न करता मनाला वाटेल तशा योजना जाहीर करणार्या सत्ताधार्यांमुळे राज्याचा आर्थिक गाडा पुरता दोलायमान बनला आहे. करदात्यांच्या कष्टाच्या रक्कमेची ही लूट ज्यांनी केली ती त्यांच्याकडूनच वसूल झाली पाहिजे. या योजना जाहीर करताना राज्याचं काय होईल, इतकाही विचार त्यांनी केला नाही. केवळ सत्ता मिळावी, इतक्या कुटील हेतूने जाहीर झालेल्या योजनांनी महाराष्ट्राला बेजार केलंच पण राज्य जगावं म्हणून जे आपल्या खिशाला ताण देतात त्यांनाही जगणं मुष्कील करून टाकलं आहे. लाडक्या बहिणींच्या नावाने सुरू केलेल्या या योजनेने जनतेच्या सुमारे 21 हजार कोटी इतक्या रक्कमेला चुना लावल्याचं नुकतंच उघड झालंय. सुधारलेल्या महाराष्ट्राने देशाला लूट करण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील एका दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे विशेष दौऱ्यावर येत आहेत. मंत्री तटकरे यांनी आपला नियोजित विदर्भ दौरा रद्द करून रविवारी थेट लोणी (ता. राहाता) येथील रुग्णालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेच्या भेटीला प्राधान्य मंत्री तटकरे आज शनिवारी या पिडीत मुलीची व मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येणार होत्या. मात्र त्यांचा शनिवारचा दौरा अचानक रद्द झाला होता. संगमनेरमधील ॲसिड हल्ला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि पीडित मुलीला मानसिक बळ देण्याच्या उद्देशाने त्यांनी तातडीने आपला दौरा बदलला आहे. पीडित मुलगी सध्या लोणी येथील हॉस्पिटलमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक नाशिकमधील सातपूर परिसरात एका धक्कादायक घटनेत एका प्रथितयश पत्रकाराचा खरा चेहरा समोर आला असून, त्याने गेल्या दोन दशकांपासून अनेक गरीब महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. खंडणी प्रकरणातील फिर्यादीच आरोपी म्हणून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रवींद्र एरंडे (वय ६३) असे या संशयित पत्रकाराचे नाव असून, तो एका साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनेलशी संबंधित आहे. एरंडे हा सातपूर भागातील कामगारनगर आणि श्रमिकनगरमध्ये लघू उद्योगांसाठी ‘कन्सल्टंट’ म्हणून काम करत असे. लघू उद्योग सुरू करून देण्याचे आमिष दाखवून त्याने सन २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या काळात अनेक गरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. या महिलांच्या हतबलतेचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर समनापूर येथे दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी आणि दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. या प्रकरणी दिनेश मुरलीधर मिलाने यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दिनेश मिलाने हे हॉटेल व्यावसायिक असून समनापूर गावात त्यांचे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपी देवा शेरमाळे आणि वंदना शेरमाळे यांनी दुकानात येऊन तेथे दारूचा व्यवसाय करू नये, असे म्हणत दुकानातील कामगार संतोष रावसाहेब गवळी याला शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष यांनी घटनेची माहिती दुकानमालक दिनेश मिलाने यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून, आता हा असंतोष उघडपणे समोर आला आहे. या पराभवास जबाबदार धरत शहर कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून पक्षाच्या शहर अध्यक्षांसह एका बड्या नेत्यावर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच नगरपालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक निवडून न आल्याने ही नामुष्की ओढवल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. या गंभीर पत्रव्यवहारात भाजपचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक श्रीराम गणपुले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका पीए मार्फत गणपुले यांनी…
