Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: संगमनेर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात महायुतीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात डीजे लावून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या ४० वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ माघाडे परिवाराच्या माध्यमातून वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा जोपासली जात आहे. मात्र, यंदा प्राध्यापक अहिरे यांचे व्याख्यान सुरू असतानाच समोरून डीजेचा कर्कश आवाज करून हा कार्यक्रम उधळून लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे संगमनेरची सांस्कृतिक आणि सामाजिक एकता धोक्यात आल्याचा आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे पडसाद आता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचे काम काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले असून, यामुळे संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शेडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने संगमनेरच्या तहसीलदारांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. जलजीवन योजनेचे मुख्य पाईपलाईनचे काम उद्भवापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत पूर्ण झाले होते, मात्र गावातील काही शेतकरी ही पाईपलाईन त्यांच्या क्षेत्रातून नेण्यास मज्जाव करत आहेत. यामध्ये दिलीप श्रीहरी नागरे, सत्पाल भिमाजी नागरे आणि सुखदेव रामभाऊ नागरे या शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यास विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही हे शेतकरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता प्रत्यक्ष कृती आराखड्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून, शहरवासीयांनी दिलेल्या कौलानुसार संगमनेर बसस्थानक परिसरात महाराजांचे भव्य ‘पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक’ उभारले जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. या स्मारकाचा प्रवास संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा राहिला आहे. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी बसस्थानक परिसरातील मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, अशी अधिकृत मागणी करत या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव शासनदरबारी ताकदीने मांडला. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणानुसार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शहरातील नामांकित सोनांबेकर हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांवर रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला आहे. मात्र, हा कायदेशीर तपास प्रक्रियेचा भाग असतानाही, डॉक्टरांच्या असोसिएशनच्या संगमनेर शाखेने संघटित होऊन पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी यांच्यावर सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती. विशेष म्हणजे, चार महिने पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर फिर्यादीला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली आहेत, मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याचे पाणी आणि पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन दिले. हे निवेदन कार्यकारी अभियंता कवडे व हापसे यांनी स्वीकारले असून, यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, विजय मगर, विलास…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत (TCS) नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणिलैंगिक शोषणाच्या धक्कादायक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेन वॉशिंग करून त्यांचे धर्मांतर करण्याचा आणि त्यांना लैंगिक जाळ्यात ओढण्याचा हा भयानक कट समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची सुरुवात एका तरुणीच्या वागण्यातील बदलामुळे झाली. संबंधित तरुणीने हिंदू असूनही अचानक रोजे पाळण्यास सुरुवात केली, तिचा पेहराव बदलला आणि तिने हिजाब परिधान करण्यास सुरुवात केली. मुलीच्या या संशयास्पद वर्तणुकीमुळे तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, ज्यातून या संपूर्ण रॅकेटची माहिती समोर आली. तपास यंत्रणांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी सिन्नर (नाशिक) येथील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट रूपाली चाकणकर यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्या तन्मय चाकणकर यांची शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या गोपनीय आणि कसून चौकशी सुरू आहे. समता पतसंस्थेमध्ये चाकणकर कुटुंबाच्या नावे असलेल्या चार बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, या व्यवहारांचा अशोक खरातशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. सकाळपासूनच या दोघांचे सविस्तर जबाब नोंदवले जात आहेत. यापूर्वी अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांमुळेच…
संगमनेर | विशेष प्रतिनिधी संगमनेर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. पण त्याच डॉक्टरांना वाचवण्यासाठी संगमनेरचे पोलीस चार महिने तक्रारदाराला उंबरठे झिजवायला लावतात, यावरून येथील कायदा सुव्यवस्था नेमकी कोणाच्या खिशात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशाने डॉ. अजिंक्य सोनांबेकर आणि डॉ. अभिजीत कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाने पोलीस दलातील शांततेचे वाभाडे निघाले आहेत. दत्तात्रय दळवी या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी न्यायासाठी, आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेला लढा थक्क करणारा आहे. १० डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर शहर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहर आणि तालुक्यात सध्या गोवंश हत्या आणि मांस तस्करीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचा धाक उरला नसल्याने की काय, पण तालुक्यात गोवंश कत्तलींचे सत्र अगदी ‘धडाक्यात’ सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी गोवंश कत्तलींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाही, प्रत्यक्षात यंत्रणांच्या अभद्र युतीमुळे जमिनीवर मात्र काहीच बदल होताना दिसत नाही. तात्पुरत्या मलमपट्टीचा अपवाद वगळता सर्व काही जैसे थे होताना दिसत आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नेत्यांनी या कत्तलींना जणू मूक संमतीच दिल्याचे भासते. या संपूर्ण गोरखधंद्यात पोलीस प्रशासन, बडे राजकीय नेते, पदाधिकारी, कथित पत्रकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर येथील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप एका पीडित पतीने केला आहे. यामुळे आधीच एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. रोहीदास गणपत डोंगरे (रा. निमज, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी होणाऱ्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. तक्रारदार डोंगरे यांनी दिलेल्या केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी मिना डोंगरे यांना छातीचा त्रास होत असल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. कोरडे…
