Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर येथे रविवारी एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील तसेच उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय कागदपत्रांचे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर अलकानगर येथे उत्साहात पार पडले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करण्यात आली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आयोजित केलेल्या या उपक्रमात नागरिकांसाठी विनामूल्य ओळखपत्र दुरुस्ती, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड,…

Read More

डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे संवेदनशीलता आणि शिस्त. यांचा संगम लाभलेले हे नेतृत्व संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देत आहे. चेन्नईच्या मातीत जन्म झाला असला तरी, सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मातीची ओढ त्यांच्या रक्तात आहे. तामिळ, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांच्या संगमातून त्यांना जे बहुभाषिक व्यक्तिमत्व लाभले त्यामुळेच त्यांना समाजाच्या विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधणे सहज शक्य झाले. पण हा केवळ संवाद नव्हता तर ती नाती जोडण्याची एक कला होती. डॉक्टर (BDS) म्हणून रुग्णांच्या वेदना समजून घेण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. मात्र, केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तालुक्यातील एका मोठ्या गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिचे भविष्य पणाला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून संपूर्ण तालुका ढवळून निघाला असून, चाईल्ड हेल्पलाईनने दिलेली तक्रार आणि लग्नाचे समोर आलेले स्पष्ट छायाचित्रांचे पुरावे असतानाही, स्थानिक प्रशासन मात्र संशयास्पद मौन बाळगून आहे. या ‘आंधळ्या दळणामुळे’ यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या विवाहामागे नेमका कुणाचा वरदहस्त आहे, अशी संतप्त विचारणा जनतेतून होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अवघ्या १६ वर्षांच्या मुलीच्या विवाहाची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईनने तातडीने तक्रार दाखल केली होती. महिला व बालविकास विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी या…

Read More

महाराष्ट्र सर्वात न्युज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज जनक्षोभ पाहायला मिळाला. तथाकथित महाराज धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानांचा तीव्र निषेध करत, शहरातील हजारो नागरिकांनी आणि सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोन्ही नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या निषेध सभेची सुरुवात झाली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, स्वतःला कितीही मोठे महाराज म्हणवून घेणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असू शकत नाहीत. उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमध्ये दाखल झाली असताना, एका दुर्दैवी प्रकाराने या जलयात्रेला गालबोट लागले आहे. भाजपच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच महिला पोलीस कर्मचारी आणि बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे जलसंपदा तथा अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपत्ती जलपूजा केल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ झालेली ही जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमधील प्रवरा नदीकाठच्या जाजू इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणात विसावली होती. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सत्ताधारी आमदाराचा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलेली ही ‘गुंडगिरी’ आणि ‘असंस्कृतपणा’ राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारा असून, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून रविवारी संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या पुस्तकाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तांबे व थोरात बोलत होत्या. माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली सुसंगतता आणि लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक वर्तन या विषयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी समाजमाध्यमाद्वारे आपले परखड मत व्यक्त केले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी महाराज नेमके कोण होते आणि त्यांचे स्वराज्य कोणत्या मूल्यांवर उभे होते, यावर नवीन पिढीमध्ये मंथन होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रामुख्याने कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा संदर्भ देत, ३९ वर्षांनंतरही या पुस्तकाचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगितले. शाळेत शिकवले जाणारे महाराज आणि प्रत्यक्ष इतिहासातील महाराज यांच्यातील तफावतीबद्दल त्यांच्या कन्या अहिल्या हिने…

Read More

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तकावर आक्षेप घेणार्‍या बुलढाणातील आमदार संजय गायकवाड याने महाराष्ट्राची लाज शरमेने वाकवली आहे. छत्रपती शिवरायांचे कर्तेधर्ते आपणच असल्याचा आव आणत पुस्तकावरील आक्षेपाला ज्या शिवराळ भाषेत या आमदाराने उत्तरं दिली ती पाहिली की हा आमदार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असंच दिसतं. महाराष्ट्राची लाज घालवणार्‍या कितीजणांना सत्ताधारी पोसणार आहेत, हा खरा सवाल महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे. सिंदखेड राजा या बुलढाणातील नावाजलेल्या ठिकाणची जहागीरदारी जणू या गायकवाडच्या घरचीच. शिवरायांच्या बालपणी स्वराज्याचं बीज ज्या जन्मस्थानी पेरलं त्या जिल्ह्यामधून असा आमदार आपण निवडून पाठवतो, याची लाज तिथल्या जनतेला वाटत असेल. मुळात शिक्षणाची वाणवा असलेल्या या आमदाराला…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी – शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त विधान यावरून राजकारण तापले आहे. या दोन्ही प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाचे संपादक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप माकपने केला आहे. गायकवाड यांनी वापरलेली भाषा सभ्य समाजाला न शोभणारी असून, महिलांचा अवमान करणारी आहे. एकीकडे नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या…

Read More

संगमनेर: प्रतिनिधी ज्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आज काही विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे काळवंडण्याचा प्रयत्न होत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन शिवविचारांचा अपमान केला आहे, त्याला आता वैचारिक मार्गाने उत्तर देण्याचा निर्धार संगमनेरकरांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर, रविवारी (२६ एप्रिल) सकाळी आठ वाजता संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करून शिवरायांचा खरा इतिहास जनमानसात मांडला जाणार आहे. या सामूहिक वाचनानंतर सकाळी १० वाजता संगमनेर बस स्थानक परिसरात गायकवाड यांच्या निषेधार्थ एल्गार पुकारला जाणार आहे. सत्तेच्या गुर्मीत…

Read More