Author: अनंत पांगारकर
शिर्डी- महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीचे आतोनात नुकसान झाले असून घरे व मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. या कठीण परिस्थितीत, आपली सामाजिक बांधिलकी जपत, शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची भरघोस मदत जाहीर केली आहे. संस्थानच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. साईबाबा संस्थानने नेहमीच धर्मदाय आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांच्या या उदार मदतीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या पीडितांना तातडीची मदत पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बळ मिळेल. श्री साईबाबा संस्थान केवळ एक धार्मिक…
पुणे – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहे. पवार कुटुंबाने गुंड पोसलेले आहेत आणि त्याच गुंडांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर शनिवारी (२७ सप्टेंबर) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दैत्यनांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना अरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी अडविली व हल्ला केला. या हल्ल्यात हाके यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी पोलिसांच्या सुरक्षेमध्येही हल्ला झाल्याबद्दल चिंता व्यक्त…
आश्वी | प्रतिनिधी निळवंडे धरणाचा उजवा कॅनॉल पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे शनिवारी रात्री फुटला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी धास्ती पसरली आहे. कॅनॉलची भिंत फुटल्याने पाण्याचा प्रवाह वडनेरकडे वळला. सुदैवाने, या घटनेत निंभेरे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान टळले असून, कोणतीही मानवी हानी झालेली नाही. मात्र, या प्रकाराने ग्रामस्थ हादरले असून भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कॅनॉलची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी सरपंच शांताराम सिनारे, माजी सभापती भीमराज हरदे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे, सचिव माधव हारदे, शहाजी हारदे, राजेंद्र हारदे, चांगदेव…
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आश्वी परिसरात ऑनलाईन फसवणुकीने थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये ग्राहक सेवा केंद्र चालक, मेडिकल व्यावसायिक, शेतकरी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह अनेकांना सुमारे १० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, आश्वी खुर्द येथे शनिवारी दुपारी घडलेल्या एका ताज्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गावातील एका जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ‘भाडेकरू’ असल्याचे भासवून तब्बल १९,००० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. पीडित कर्मचारी जेवण करत असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पलीकडील व्यक्तीने, मी तुमच्या रूमचा भाडेकरू बोलतोय, माझा फोन पे नंबर बंद आहे. माझा मित्र हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला अर्जंट…
पाथर्डी (अहिल्यानगर): अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर, थोरात यांनी शनिवारी (२७ सप्टेंबर) पाथर्डी येथील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना करत, या पाषाण हृदयी सरकारला काही केल्या पान्हा फुटत नाहीये, यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सद्बुद्धी दे, अशी आर्त विनवणी केली. बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहणीला सुरुवात करून त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील नुकसानग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यांमधील शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त…
रविवार विशेष लेख — प्रवीण पुरो- केंद्रातल्या युती सरकारने नव्याने जारी केलेला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या (GST) कर प्रणालीत सुधारणा करत देशभर जीएसटी बचत उत्सव साजरा करण्याचा नवा खेळ सुरू केला आहे. सात वर्षाच्या लुटीनंतर लोकांना वेडं बनवण्याचा हा नवा खेळ. याआधी नोटबंदीचा उत्सव, कोरोनात थाळ्या बडवण्याचा उत्सव साजरा करताना या सरकारने लोकांना अक्षरश: उल्लू बनवलं. नोटबंदी फसली आणि सत्ताधार्यांची स्वत:ची पुंजी वाढवली. कोरोनात थाळ्या वाजवल्या आणि पीएम केअर फंडाद्वारे हजारो कोटींची व्यक्तीगत कमाई केली. जीएसटी प्रणाली सुरू करताना त्यात असंख्य चुका आणि प्रचंड तक्रारींचा बोजा वाढला. या तक्रारींना जराही दाद न देणार्या या सरकारला आठ वर्ष उलटल्यानंतर…
मेष – व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. फॅशन, ग्लॅमर आणि डिझाइनिंगशी संबंधित लोकांना लाभ होईल. नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल. कौटुंबिक जीवनात धार्मिक वातावरण राहील, पण आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. वृषभ – आज करिअरमध्ये नवीन बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता, ज्यामुळे धनलाभ होईल. तुमचा दांपत्य जीवन आनंदी राहील आणि तुम्ही जोडीदाराला भेटवस्तू द्याल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. तुमच्या कर्मक्षेत्रात विस्तार होईल आणि पदोन्नतीचा योग बनत…
अहिल्यानगर – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या ते अतिमोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने, अकोले तालुक्यातील निळवंडे धरण परिसरात अत्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे. निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्र व धरणाच्या खालील परिसरातील पाण्याचा वेग व पातळी लक्षणीय वाढणार आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना म्हणून, नदीपात्र व जलाशय परिसरात असलेले कोणतेही साहित्य अथवा जनावरे तात्काळ हलविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, विसर्गात टप्प्याटप्याने वाढ होण्याची…
संगमनेर: नाशिक परिमंडळात अहिल्यानगर मंडळांतर्गत येणाऱ्या संगमनेर विभागातील वीज वितरण सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संगमनेर उपविभाग-१ आणि २ चे विभाजन करून नवीन ‘संगमनेर उपविभाग-३’ स्थापन करण्यास महावितरणने मंजुरी दिली आहे. नवीन उपविभाग-३ च्या पद निर्मितीसाठी वार्षिक १,२६,७३,०९२ इतका खर्च तसेच कार्यालय निर्मितीसाठी १२ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी मिळाली असल्याचे आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजातील अडचणी कमी व्हाव्यात, तसेच नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर भागात शेती पंपधारक, ग्राहक आणि व्यावसायिक यांची मोठी संख्या असल्याने वीज जोडणीस होणारा उशीर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माजी पोलीस उपअधीक्षक (DYSP) यांच्या मुलाने कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देत, दोन तरुणी आणि त्यांच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवून डांबून ठेवल्याची आणि त्यांच्यावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील ‘कॅटल हाऊस’ या हॉटेलमध्ये हा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी हॉटेलचा चालक व सेवानिवृत्त DYSP संजय देशमुख यांचा मुलगा सौरभ देशमुख याच्यासह वेटर मोहित मिलिंद ताम्हाणे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गंगापूररोडवरील एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलात डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक दाखवून दोघींकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अनैतिक व्यवसाय करण्यास सांगितल्याचे फिर्यादीतून उघड झाले आहे. याप्रकरणी सौरभसह…
