Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. परीक्षेसाठी प्रवेश पत्र काढण्याकरिता अकोले येथील सायबर कॅफेमध्ये गेलेल्या बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गावातीलच तरुणाकडून अनैसर्गिक वर्तन केल्याच्या कारणावरून आरोपी विरोधात अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे यांनी करत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या घटनेची सुनावणी सुरू होती. खटल्या दरम्यान आरोपी जामिनावर मुक्त होता. दोषारोप पत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्ही आमची सुरक्षा काढली. आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? आम्हाला कोणी हात लावतंय का? तुम्हीदेखील सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले या दौऱ्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर सुरक्षेविना फिरून दाखवा, असा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधासत्पणे फिरू शकतोय, असंही ते म्हणाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बारा वर्षाच्या मुलीने सोळा वर्षाच्या मुलाबरोबर पळून जात लग्न केले. नंतरच्या लग्न संबंधातून या मुलीला दिवस गेल्याने ही बाब समोर आली. तसेच या मुलीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे देखील तिने सांगितले आहे. पीडित मुलीच्या तोंडून हा प्रकार ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यामुळे पुणे जिल्ह्यातील बालविवाहाचा हा प्रकार समोर आला. अल्पवयीन पीडित बालिकेची ओळख एका यात्रेमध्ये आरोपी असलेल्या सोळा वर्षीय मुलासोबत झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र या मुलीने लग्नास नकार दिल्याने, मी विष पिऊन आत्महत्या करेल अशी धमकी वजा विनवणी आरोपीने पीडित मुलीला केली होती. त्यामुळे मुलीने लग्नाला होकार देत त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा निश्चित करण्यात आली नसून पुतळ्यासाठी करण्यात आलेली तरतूद देखील ५० लाखावरून २५ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे, अशाप्रकारे बोगस तरतुदी करण्यात आल्याचे स्पष्ट करत ‘खोटे बोला पण रेटून बोला, हे काँग्रेसचे विकास मॉडेल’ असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये भाजपची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे विधान जहागीरदार यांनी केले होते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी जागा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  वाळू लिलावासाठी शासनाच्या नवीन धोरणाची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार आहे. सरकारच्या यंत्रणेमार्फतच वाळूचे डेपो उभे करून ऑनलाईन पद्धतीने वाळू दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर वाळूचे लिलाव होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महसूल यंत्रणेच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीत मंत्री विखे बोलत होते. त्यांनी जनावरांच्या लम्पी स्किन संदर्भात देखील आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जळगावचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नंदूरबारचे प्रभारी जिल्हाधिकारी महेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकार घडले होते. मात्र आता राज्यात शिंदे–फडणवीस यांचे सरकार असल्याने तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालय सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वाघ प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे अनुवादित ‘सिटीझनविल’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी 7 डिसेंबरला साडेतीन वाजता मुंबईमध्ये होत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ‘सिटीझनविल’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचा युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. प्रकाशनापूर्वीच तांबे यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. पुण्याच्या अमेय प्रकाशनच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारा पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी शहरांचा विकास नियोजनबद्ध रीतीने होणे गरजेच झालंय, किंबहुना ती काळाची गरजच बनली. ही नियोजनबद्धता आणण्यासाठी हवा असतो एक वेगळा दृष्टिकोन, इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज टपाल विभागाच्या दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेत राज्य पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे निवडले गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेर मधील विविध शाळांचे आहेत, अशी माहिती श्रीरामपूर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर व संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नक्ष चंद्रकांत खामकर (इयत्ता सहावी), स्वामिनी संदीप चव्हाण (इयत्ता सातवी), प्रज्योत प्रदीप शेळके (इयत्ता नववी), मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयातील श्रद्धा विलास ताजने (इयत्ता आठवी), सुमित महेश देशमुख (इयत्ता आठवी), तनिष्क संतोष दिवे (इयत्ता नववी), अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमधून समरजीत विश्वास वाघ (इयत्ता सातवी), दिव्याल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यभरात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंचपदासह सदस्य निवडीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार वेबसाईट मध्ये खंडितपणा येत असल्याची दखल आयोगाने घेतली असून पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षक, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने (दि. ०९/११/२०२२) च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलेला असून या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज हळूहळू सगळेच राज्य समान नागरी कायदा लागू करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील यासाठी योग्य वेळी विचार करू, असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, उत्तराखंडमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हिमाचल आणि गुजरात देखील करणार आहे. मला वाटतं हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. मात्र आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो, असेदेखील ते म्हणाले. संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले…

Read More