Author: अनंत पांगारकर
रोज टीव्ही पाहून त्याला कंटाळा आला होता . तशी इतक्या दिवसांच्या सुट्टीची सवय नव्हती त्याला.. आज त्याने ठरवलं मौन व्रत करायचं.. कुणाशी बोलायचं नाही आणि काहीच करायच नाही.. घरात सगळ्यांना तस सांगूनही टाकल… त्याच्या बायकोला तसा आनंद झाला.. तसही चांगल बोलण ह्यांना माहीतच नाही.. निदान आज कंप्लेंट तरी ऐकायला मिळणार नाहीत असा मनात विचार करून ती मनोमन सुखावली. आज तिने नास्ताला सकाळी डोसा केला मुद्दाम. ह्यांना डोसा आवडत नाही पण आज बोलणार नाहीत ठरवलं आहे, मग काय निदान रागाराग तरी करणार नाहीत. मुलांनी आवडीने डोसा खाल्ला त्यांची आवडती डिश. त्याने ही गुपचूप खायला सुरवात केली. खाताना त्याच्या लक्षात आले. किती…
रविवार, १५ डिसेंबर पुणे – बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचे अमिष दाखवत ७९ गुंतवणूकदारांची सुमारे साडेसात कोटींची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये संगमनेरमधील एका आरोपीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नितीन रावजी शेळके (रा. नारायणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन बाळासाहेब पोखरकर (वय ४१, रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), राजेंद्र सूर्यभान उपाध्याय (उपाध्ये) (वय ४२, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यासह आणखी दोघा अनोळखी व्यक्तींवर नारायणगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव व परिसरातील सुमारे ७९ जणांची पीएलसी…
राज्यात आणि देशात सत्तेची तिसरी टर्म प्राप्त केलेला भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वाधिक घोडचुका केलेला नशिबवान पक्ष ठरला आहे. सत्तेची सत्तर वर्षं पूर्ण केलेल्या काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते या पक्षाने लीलया करून दाखवलंय. असंख्य दोषांची मालिका भरीस असतानाही तो पक्ष सहज सत्ता मिळवतो आणि तितक्याच रुबाबात तो सत्तेची पाच वर्षं पूर्णही करतो. महाराष्ट्रात त्या पक्षाला जशी पवार कंपनी साथ देते तशी देशात कधी नितीशकुमार, चंद्राबाबू, तर कधी मेहबुबा आणि मायावती त्या पक्षाला तारतात. त्या पक्षाच्या विचारधारेपासून कोसभर दूर असलेले ‘अचानक’ मदतीला धावतात आणि सत्तेत सहभाग घेतात. २०१९ च्या महाराष्ट्रतील निवडणूक निकालानंतर मोक्याची वेळ साधत शरद पवार यांनी…
बाळासाहेब थोरात (माजीमंत्री महाराष्ट्र राज्य) सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला अकोले तालुका हा पुरोगामी आणि डाव्या विचारांचा. संघर्ष आणि चळवळीतून तयार झालेले मधुकरराव पिचड हे अकोले तालुक्याने राज्याला दिलेले संघर्षशील नेतृत्व. विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरता राज्यभर मोठे काम उभे करताना जलसिंचनाच्या माध्यमातून अकोले तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे श्रेय हे तालुक्याचे आधारवड असलेल्या मधुकरराव पिचड साहेबांना जाते. अकोले आणि संगमनेर तालुका हे भाऊ-भाऊ म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या तालुक्यांमध्ये अनेक चळवळी झाल्या आणि त्यामुळे डावी विचारसरणी इथे रुजली. सह्याद्री पर्वतांमध्ये वसलेल्या राजूर गावात मधुकरराव पिचड यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी संघर्षातून नेतृत्व घडविले. सुरुवातीला अकोले तालुक्याचे सभापती आणि त्यानंतर ते…
शनिवार, १४ डिसेंबर संगमनेर – शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवसाय पूर्व कौशल्य मिळावीत, आपली कार्य संस्कृती आणि आधुनिक व्यवसाय याविषयी माहिती तसेच स्वतःचे करिअर निवडण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये २१ ते २३ डिसेंबर दरम्यान भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला महोत्सवाच्या दरम्यान ७२०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यवसाय पूर्व कौशल्य शिकविली जाणार आहे. महोत्सवादरम्यान २३ डिसेंबरला एकाच वेळी पाचवी ते नववी दरम्यान शिकणारे ७,२०० विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे गायन देखील करणार आहे. राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य उपक्रमाची माहिती एका पत्रकार…
शनिवार १४ डिसेंबर मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. ‘माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्याने काँग्रेसमध्ये आता या पराभवाची कारणमीमांसा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. प्रदेश कमिटी बरखास्त करा!… मी मागील ४ वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे.…
शनिवार १४ डिसेंबर मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदुत्वाची आठवण होते. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. तरीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का? भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व गेले कुठे? निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी भाजपला हिंदुत्व आठवते, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वावर भाजपची भूमिका काय ते आधी स्पष्ट करावे, असे खुले आव्हानही ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुंबईत दादरमधील ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहे, आता…
प्रवीण पुरो / मुंबई शुक्रवार १३ डिसेंबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीतील कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार? कुठली खाती मिळणार? यावरून धाकधूक वाढली आहे. यातच शिंदेंच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार? याची नावे समोर आली आहेत. प्राप्त वृत्तानुसार, शिंदेंच्या शिवसेनेला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदे मिळतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते, त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, असंही सांगितलं जातं. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश असेल. यंदा गोगावले यांची कोट घालण्याची इच्छा पूर्ण होईल असं मानलं जातं. अडीच वर्षांच्या कार्यकाळात…
शुक्रवार १३ डिसेंबर सहा वर्षाच्या मुलीसह चित्रपट पाहून स्कुटीवरून घरी परतत असलेल्या संगमनेर महाविद्यालयातील महिला प्रोफेसरला शहरालगतच्या घुलेवाडी फाट्याजवळ चार चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत माय-लेकी जखमी झाल्या आहे. जखमी मायलेकींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात जखमी असलेल्या प्रोफेसर ललिता बाबुलाल मालुसरे सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. 05 – 8886 या चार चाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, बुधवारी (११ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर मालुसरे या आपल्या सहा वर्षे वयाच्या मुलीसह घुलेवाडी येथील छोटू महाराज टॉकीजमध्ये चित्रपट पाहून आपल्या स्कुटीवरून गोल्डन…
शुक्रवार १३ डिसेंबर मुंबई – महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाला असून यात भारतीय जनता पक्षाला २१, शिवसेनेला १३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे मिळणार आहे. नव्या मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांचा समावेश असेल. भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या आणि समोर आलेल्या संभाव्य २१ मंत्र्यांच्या नावाच्या यादीत अहिल्यानगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा समावेश नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून आता मंत्रिपदासाठी फिल्डींग लावली जाण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. भाजप आणि शिवसेनेकडून जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार असल्याचे चिन्ह असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट व राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती…
