Author: अनंत पांगारकर
गुरुवार दिनांक ६ जून २०२४ केंद्रात सरकार बनविण्याइतपत साधे बहुमतही भारतीय जनता पक्षाला यावेळी मिळाले नाही. २४० वरच त्यांचा आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही नरेंद्र मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले, मोदी हे आता त्यांच्या ‘ब्रॅण्ड’चे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत तर, त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला, असे सांगत ठाकरे गटाने मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अग्रलेखातून टीका – नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत,…
गुरुवार दिनांक ६ जून २०२४ बोगस डॉक्टरविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकत श्रीरामपूरमध्ये कारवाई केली. कथित डॉक्टर बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचा दवाखाना सील करण्यात आला आहे. सागर अहिरे असे या बोगस डॉक्टरचे नाव असेल श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे त्याचा दवाखाना सुरू होता. या डॉक्टर विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंधवणी (श्रीरामपूर) येथील अरुण माणिक शिंदे यांनी हा डॉक्टर बोगस असल्याबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी माळेवाडीचे समुदाय आरोग्य अधिकारी संदीप माने, आरोग्य सेवक…
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ डॉ. सुभाष भामरे चार हजार मतांनी निवडून आल्याची बातमी आल्याने आणि मतमोजणीच्या १९ फेऱ्या बाकी असताना निवडणूक निकाल कसा जाहीर होऊ शकतो, यामुळे आम्ही चार वाजण्याच्या सुमारास सर्वजण मतमोजणी केंद्रात पोहोचलो असताना तेथे प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन जोडून देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप नवनिर्वाचित खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा अगदी अटीतटीच्या लढतीत डॉ. बच्छाव यांनी पराभव केला. त्यानंतर डॉ. बच्छाव यांचा बुधवारी धुळ्याच्या काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी…
बुधवार दिनांक ५ जून २०२४ लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठा झटका बसला असून निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी यासंदर्भात राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. सरकारमधून मला मोकळं करावं, अशी विनंती त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, यश-अपयशाची आमची सामूहिक जबाबदारी आहे. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. सध्याच्या निवडणुकांमधील मतांची टक्केवारी बघितली तर मविआला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईमध्ये दोन लाख मतं आम्हाला जास्त मिळाली आहे. आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे.…
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ संगमनेरात मटक्यासारखे अवैध व्यवसाय बंद असल्याचा पोलिसांचा दावा त्यांच्याच कारवायांमुळे खोटा ठरत आहे. संगमनेरातील मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार चालवत असलेल्या मटका अड्ड्यांवर एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी आठवडाभराच्या आत तीन कारवाया केल्या असून या तिन्ही गुन्ह्यात सय्यद याच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाई १ – विशेष म्हणजे बुधवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार हा फरार दाखविण्यात आला आहे. तर बुधवारी दुपारी शहरालगतच्या समनापुरमध्ये एका पत्राच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांना टाईम बाजार नावाचा मटका सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत राज मोहम्मद अरीफ सय्यद (वय ४० अलकानगर, संगमनेर) याला पकडत…
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ सहाय्यक पोलीस निरीक्षकासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयात पैरवी कर्मचारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत रंगेहाथ पकडले आहे. यामुळे पोलिसांचा लाचेचा नवा कारनामा समोर आला. सागर कुमार टकले (वय ३७ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) व प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर (वय ४२ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) अशी लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक असलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या चुलत्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या चुलत्याला कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत म्हणणे (Say) देण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता सहाय्यक…
बुधवार, दि. ५ जून २०२४ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची मोठी पीछेहाट झाली आहे. महाविकास आघाडीने राज्यात भाजपाचा मोठा पराभव केल्याने या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी वरिष्ठांकडे दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाला दिल्लीतील आपल्या एकहाती सत्तेसाठी महाराष्ट्रात मोठ्या विजयाची अपेक्षा होती. त्यामुळे महायुतीने राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. मात्र निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने निराशाजनक कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले. राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. तर विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षेपेक्षा…
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ लोकसभा निवडणुकीचा उत्सव संपला आहे. येता काही दिवसात देशात नवे सरकार सत्तारूढ होईल. दरम्यान नासिकसह चार विधान परिषद मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जूनला होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मतदानाच्या वेळेत बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदानाची वेळ याआधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. नव्या बदलानुसार आता २६ जूनला मतदान सकाळी ७ वाजता सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती…
मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) निलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने धक्कादायक पराभव केला आहे. विखे यांचा विजयाचा आत्मविश्वास या मतदारसंघात मतदारांनी धुडकावून लावला. राज्यातील लक्षवेधी लढतीमध्ये अहमदनगर दक्षिणचा समावेश होता. महाविकास आघाडीने या मतदार संघात विखे यांचा पराभव करण्यासाठी आपली ताकद पणास लावली होती. भल्याभल्यांचे अंदाज या मतदारसंघात फोल ठरले. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी 7:50 वाजेपर्यंत निलेश लंके आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांच्यापेक्षा 22 हजार 245 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे लंके यांचा विजय अंतिम मानला जात आहे. ते 29 हजार 314 मतांनी…
मंगळवार दिनांक ४ जून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी ५० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांना विजयी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा मूळ शिवसेनेची (ठाकरे गट) मशाल पेटली आहे. नवे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विषयी मतदारांमध्ये फारशी सहानुभूती नसली तरी राज्यात घडलेले फोडाफोडीचे राजकारण शिर्डीतील मतदारांना मानवले नाही. अनेक पक्ष बदलून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेल्या वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विद्यमान खासदाराविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा वाकचौरे यांना झाला आहे. उद्धव ठाकरे…
