Author: अनंत पांगारकर
अंतिम भाग | प्रवीण पुरो देशाचा चौकीदार म्हणून स्वत:ची पाठ थोपटणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक नुकसान कोणाचं केलं असेल तर ते महाराष्ट्राचं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षांत बसलेला विविध मार्गातील फटका लक्षात घेतला तर या राज्याने, राज्यातल्या जनतेने विशेषत: बेरोजगारांनी मोदी नावाच्या चौकीदाराला कदापि माफ करायला नको. दुर्देवाने सुर्याजी पिसाळांच्या अवलादी याच महाराष्ट्रात जन्मल्याने चौकीदार शांत बसेलच याची खात्री देता येत नाही. सत्ता हा त्यांचा मतलब राहिला आणि चौकीदाराने केलेली लूट या पिसाळांनी राज्यातल्या जनतेच्या बोकांडी मारली. देशावर नोटबंदी लादताना चौकीदाराने सारी थोतांडं हातोहात पुढे केली. भ्रष्टाचार थांबेल, दहशतवाद संपेल, काळापैसा बाहेर येईल आणि रोजगाराला चालना मिळेल, असल्या…
शनिवार, दि. ४ मे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, गेल्या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडत दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. ख्रिश्चन मुसलमानांपेक्षा जास्त अन्याय हिंदूंवर झाले. राज्यसभेत समोर आलेली ही माहिती छापण्याची गोदी मीडियाची हिम्मत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर शनिवारी श्रीरामपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवं, मात्र ते मानवतेच न राहता वसुलीच कार्यालय झाल आहे. मोदींनी इन्कम टॅक्स,…
शनिवार, दि. ४ मे गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केल आहे. १० वर्षात मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता त्यांनी सांगावे, देश टिकविण्यासाठी आता आपल्याला या बाबींचा विचार करावाच लागेल असे सांगत भाजपाचे राधाकृष्ण विखे उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात, ही काँग्रेसचे आमदार थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ आंबेडकर नगरमध्ये झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी वंचितचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदींचा राजकारण हे अतिशय भयानक असून काँग्रेस पक्षाने त्यांना २०१२ मध्ये…
शनिवार, दि. ४ मे | अनंत पांगारकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र प्रमुख उमेदवारांचा प्रचार अद्यापही थंडच आहे. अपवाद वगळता पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही निरुत्साह दिसत असून उमेदवारांच्या भूमिका मतदारांसह कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात पाडणाऱ्या आहे. निवडून जाणारा आणि पराभूत होणारा उमेदवार आता तरी आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहत दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पदाच्या लालसेने पक्ष बदलणार याची गॅरंटी मात्र कोणीही देताना दिसत नाही. आजी-माजी खासदारांसह या मतदारसंघात प्रथमताच प्रमुख महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या महिला उमेदवारामुळे सुरुवातीची दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी बनली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांचे भवितव्य टांगणीला…
शुक्रवार, दि. ०३ मे गेल्या काही दिवसांपूर्वी पोट व यकृत (लिव्हर) संबंधित आजार असलेल्या रुग्णांना इतरत्र जाऊन उपचार घ्यावे लागत होते. रुग्णसंख्येचा वाढता आलेख यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ पोटविकार विभाग सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी व ईआरसीपी प्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा आठवड्यातून दोन दिवस नाशिक येथील क्लिनिकमध्येही सुरु करण्यात आली असून याठिकाणी रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. याबाबतची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नाशिकसह जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, जालना, भंडारा गोंदियासोबतच ठाणे, पालघर व मुंबईच्या…
शुक्रवार, दि. ३ मे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सुरू असलेल्या छबिना मिरवणुकीत तरुणावर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील शेवगावमधील शहर टाकळी येथे गुरुवारी (दि. २) रात्री ही घटना घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४ वर्ष, रा. शहर टाकळी, शेवगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात मृत तरुणाचा भाऊ संकेत संजय आपशेटे याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अजय दावीद कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार व विकास संजय कोल्हे या पाच आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत आपशेटे ज्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मे रोजी रात्री…
शुक्रवार, दि. ३ मे नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर या प्रकरणातील पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी नग्नावस्थेत रात्रभर स्मशानभूमीत बसविल्याने आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली केली यामुळे पुन्हा एकदा राज्य हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने राज्य हादरले होते. या अत्याचाराच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे…
शुक्रवार, दि. ३ मे पोटगीपोटी शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात दावा करणाऱ्या पत्नीचा न्यायालयाच्या परिसरात चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीसह चार जणांना वैजापूर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोयिऊद्दीन एम. ए. यांनी हा निकाल दिला. ३ ऑक्टोबर २०२० मध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेत केशरबाई कारभारी गवळी (८०) रा. भिंगी बोरसर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी कारभारी किसन गवळी (८०), त्याची दोन मुले भारत कारभारी गवळी (४७), अतुल कारभारी गवळी (२१) सर्व रा. घायगाव ता. वैजापूर व त्यांचा नातेवाईक रघुनाथ जगन्नाथ सरोवर (३०) रा. गारज यांना…
शुक्रवार, दि. ३ मे सोने व्यापाऱ्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले अविनाश जाधव, वैभव ठक्कर यांच्या विरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथील रहिवासी असलेल्या शैलेश कांतीलाल जैन यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. जैन हे सोन्याचा व्यवसाय करतात. जैन त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये वैभव ठक्कर यांच्यासोबत व्यवहार करत असताना अविनाश जाधव, त्यांचा चालक आणि इतर पाच-सहा जण सुरक्षा रक्षकासह बळजबरीने ज्वेलरी शॉप मध्ये आले. तेथे जैन यांचा मुलगा सौमील याला मारहाण केली. तसेच पाच कोटी रुपये…
गुरुवार, दि. २ मे राज्यातील हाय व्होल्टेज लढतीमधील एक प्रमुख लढत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये होत आहे. भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात ही लढत होत आहे. ही लढत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी काल महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. विखे यांना दिलेला पाठिंबा हा या मतदारसंघात महा विकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभेचे माजी उपसभापती आणि पारनेरचे माजी आमदार असलेल्या विजय औटी यांनी पक्षाचा आदेश न पाळल्याने…
