Author: अनंत पांगारकर
मंगळवार, दि. १६ एप्रिल संगमनेरच्या पोलीस निरीक्षकांवर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले असतानाच आता पोलीस उपनिरीक्षकाचे नवे प्रकरण समोर आले आहे. ३३ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून या पोलीस उपनिरीक्षकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातून समोर आलेल्या या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिला जामखेड मधील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचे या युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे…
सोमवार, दि. १५ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी रविवारी संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी व सतीची वाडी या मतदान केंद्राना अचानक भेट दिली. भेटीत त्यांनी गावातील मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पेमरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीत सुमारे तीनशे मतदार आहेत. पेमरेवाडी शिर्डी लोकसभा व अकोले विधानसभा मतदारसंघात येते. पेमरेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. २०२४ च्या निवडणूकीपूर्वी या गावाला जोडणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. अपर…
सोमवार, दि. १५ एप्रिल काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन काही घटक अशा प्रकारचे कृत्य करत आहे, यापासून न्यायव्यवस्था वाचविण्याची गरज असल्याच्या आशयाचे न्यायव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा अशा २१ निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेवर येणारा दबाव थांबवायला हवा. न्यायव्यवस्थेला अवाजवी दबावापासून वाचविण्याची आवश्यकता आहे. राजकीय संबंध, वैयक्तिक फायद्यासाठी काही घटक न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडेल…
सोमवार, दि. १५ एप्रिल देशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता १६ मार्चपासून सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप सुरुवात झाली नसली तरीदेखील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्याची व त्यातील बहुतांशी तक्रारीचे निराकरण केल्याची माहिती आचारसंहिता कक्षाकडून देण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आलेल्या शंभर टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली. अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुती आणि…
गबरूच्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. गबरूच्या अंगातही निवडणुकीचे वारे संचारले आहे. त्यामुळे रात्री उशिराने झोपलेला गबरू सकाळी जरा उशिराच उठला मात्र त्याचा आळस रात्रीच्या जागरणामुळे दूर झाला नव्हता. तशाही अवस्थेत गबरूने आपला मोबाईल हातात घेत त्याचं इंटरनेट चालू केलं. आणि व्हाट्सअप मेसेज वाचू लागला. व्हाट्सअप ग्रुपवरचा एक मेसेज पाहिला आणि गबरूच्या अंगात पुन्हा निवडणुकीचे वार संचारलं. त्यामुळे गबरू घाईघाईनं अंथरुणातून दूर झाला आणि आपले सकाळचे विधी आवरू लागला. त्याची आंघोळ होऊन कपडे घालून तो हॉलमध्ये येईपर्यंत त्याच्या आईने त्याच्यासमोर नाश्ता आणून ठेवला. मात्र आईने आणलेला नाश्ता न घेताच दहा वाजल्याने तो घाई घाईने घराबाहेर पडला. गबरूच्या गावात…
रविवार, दि. १४ एप्रिल रोज काही ना काही घटना घडणाऱ्या संगमनेर मध्ये शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यातून नवीन प्रकार समोर आला आहे. शहरातील एका महिलेने एका सलूनमध्ये आपला विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली तर सलून चालकाने सदर महिलेने आपल्या दुकानात गोंधळ घालून धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. दोन्ही तक्रारीवरून शहर पोलिसांनी विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर शहरामध्ये जावेद हबीब सलून या दुकानाची फ्रेंचाईजी आहे. या दुकानांमध्ये कृष्णा सारडा नावाची एक महिला स्वतःचे केस वॉश करण्यासाठी गेली होती. सदर महिलेला तेथील स्टाफमध्ये काम करणाऱ्या एका शाकिब नावाच्या मुस्लिम कर्मचाऱ्याने हेअर वॉशच्या वेळी मॅडम…
प्रवीण पुरो “न खाऊंगा, ना खाने दुंगा” या टॅगलाईनवर देशाला आणि देशातल्या जनतेला खोट्यात पाडणार्या देशाच्या पंतप्रधानांच्या साथीदारांनी, त्यांच्या पक्ष प्रमुखांनी आणि शिलेदारांनी इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून जमवलेल्या मायेचा थोडासा जरी हिशोब दिला तरी मोदी हे देशातल्या भ्रष्टाचाराचे खरे कर्दनकाळ आहेत, असं मानायला हरकत नाही. आजवर त्यांच्यावर, त्यांच्या सरकारवर आणि त्यांच्या पक्षावर झालेल्या आरोपाला साधं उत्तर देण्याचं दायित्व जी व्यक्ती पार पाडत नाही, तिला इतरांना उपदेश देण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर झाला नाही इतका मोठा भ्रष्ट कारभार भाजपच्या सरकारने आणि त्या पक्षाने केला. इलेक्ट्रोल बॉण्ड म्हणजे निवडणूक रोख्यांच्या रुपात कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवणारे त्याचा जेव्हा हिशोब नाकारतात तेव्हा त्यात…
शनिवार, दि. १३ एप्रिल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईसत्र पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. गेल्या दोन दिवसात २५ जणांवर हद्दपारची कारवाई केल्यानंतर शनिवारी पुन्हा आणखी एका गुन्हेगारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. सिद्धार्थ उर्फ सिद्धांत दीपक मावस (रा. चत्तर हॉस्पिटलजवळ, संगमनेर खुर्द, संगमनेर) असे हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मावस याला नगर जिल्ह्यासह लगतच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून देखील हद्दपार करण्यात आले असल्याचे आदेश संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. मावस याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीसह शरीरा विरुद्ध व माला विरुद्ध गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे…
शनिवार, दि. १३ एप्रिल अवैधरित्या वाळु वाहतुक करण्यासाठी, कारवाई न करण्यासाठी ३५ हजाराची लाच स्वीकारताना सिंदखेडराजाचे तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवारी पकडण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लाचखोर तहसीलदार जैस्वाल याच्या घराची झडती घेतली असता घरातील नोटांचे ढीग बघून अधिकारीही चक्रावले. जैस्वालच्या बंगला आणि निवासस्थानामध्ये घेतलेल्या झडतीत तब्बल ४७ लाखांची रोकड सापडल्याचे खळबळजनक वृत्त आहे. ३५ हजाराची लाच घेताना तहसीलदाराला पकडल्यानंतर बुलढाणा लाच लुचपत विभागाच्या पथकाने वेगाने कारवाई करत जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा स्थित शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच पथकाच्या हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम…
शनिवार, दि. १३ एप्रिल तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. त्या पाठोपाठ आज शनिवारी त्यांनी एका पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. ठाकरे यांनी मुंबईत आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीला प्रचारात सहकार्य करायचे की नाही, यासंदर्भातील बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. एका बाजूला कडबोळे आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व अशावेळी पुन्हा त्यांना एकदा संधी देणे आवश्यक आहे वाटले. म्हणून…
