Author: अनंत पांगारकर
शनिवार दि. २३ मार्च, संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावर समनापुर लागत असलेल्या हॉटेल नेचर जवळील मैदानात २३ वर्षीय तरुणाचा गळा कापून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अवघ्या तीन तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या संदर्भात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून कौटुंबिक कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. शनिवारी सकाळी हॉटेल नेचर जवळील मैदानात खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस पथकाने…
शनिवार दि. २३ मार्च, अहमदनगर पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती. अशी खासदार विखे यांचे नाव न घेता टिपणी करत भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून पुन्हा उमेदवारी दिली असती तरी गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल, असे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना अंतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. आमदार राम शिंदे यांच्यासह…
शुक्रवार दि. २३ मार्च, संगमनेर शासकीय वसुलीच्या दृष्टीने मार्च महिना महत्त्वाचा समजला जात असल्याने शनिवार, रविवार आणि सोमवारी शासकीय सुट्ट्यांचे दिवस असतानादेखील संगमनेर नगर परिषदेचा वसुली विभाग सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे. २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली पथकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय करांचा भरणा वेळेत व्हावा यासाठी या मोहिमेअंतर्गत २३ ते २५ मार्च दरम्यान शासकीय सुट्ट्या असताना देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने वसुली विभाग सुरूच ठेवला जाणार आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कर निर्धारण…
शुक्रवार दि. २२ मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद सुरूच असल्याचे दिसते. भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर आल्या असताना या दौऱ्यावेळी आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती समोर आली आहे. अद्यापही शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. भाजपच्या बीडमधून उमेदवार असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. पाथर्डीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगरचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते. या दौऱ्यात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली. खासदार…
शुक्रवार दि. २२ मार्च, संगमनेर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आत्महत्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अद्यापही या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रुबाब पान शॉपमध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून सौरभ रावसाहेब खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने २९ फेब्रुवारीला सकाळी आठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अत्याचार केला होता. सौरभ खेमनर मुलीवर अत्याचार करत असताना त्याचा जोडीदार योगेश रामा खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने पान स्टॉलचे शटर बाहेरून बंद करून त्याला कुलूप लावून घेतले होते. तर त्यांचे आणखी दोघे मित्र प्रशांत…
शुक्रवार दि. २२ मार्च, अकोले ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्दीच्या बळावर सामान्य कुटुंबातील एखादा तरुण अथवा तरुणीही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते. घरात फारशी सुबत्ता नाही, रोज कमवायचे आणि खायचे अशा परिस्थितीत सामान्य कुटुंबात एखादा दिवा पेटला की त्याचा उजेड संपूर्ण कुटुंबासोबतच गावालाही जाणवतो. आणि गावासाठी ती अभिमानाची बाब ठरते, याचा वस्तुपाठ घालून देणारे उदाहरण संगमनेर नजीकच्या अकोले तालुक्यातील आदिवासी गाव असलेल्या कोतुळमध्ये समोर आले आहे. घरात सदासर्वदा दारिद्र शेळके कुटुंबात आई विडी कामगार, पेंटर काम करताना फावल्या वेळात एखाद्या वृत्तपत्रासाठी बातमीदारी करणारे वडील अशोक शेळके आणि चार मुले यांच्या कुटुंबात परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या स्वप्नाला संतोष (शिवा) शेळके याने…
गुरुवार दि. २१ मार्च, मुंबई निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे…
गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात असलेल्या जोर्वे नाका पहाटेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटची मॅच खेळून आपल्या जोर्वे गावाकडे परतणाऱ्या मुलांवर हल्ला करण्यात आला आहे. या मुलांना त्यांच्याकडील बॅटनेच बेदम मारहाण केल्याचा प्रकार पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर, नाशिक) येथे सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅच संपवून काही मुले घराकडे परतत असताना तीन बत्ती चौक ते जोर्वे नाका परिसरात त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या संदर्भात साई महेश जाधव यांच्या तक्रारीवरून एका दुचाकी चालकासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
गुरुवार दि. २१ मार्च, अकोले राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी व्यक्त करत दुग्ध विकास मंत्री आणि सरकारचा तीव्र निषेध केला आहे. डॉ. नवले यांनी मंत्र्यांच्या या जाहिरातबाजीवर संतप्त होत सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. दुधाचे भाव आणखी कोसळलेले असताना दुग्धविकास मंत्री काय जाहिरात करत आहेत पहा असे म्हणत सोशल मीडियावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले…
गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर १० वर्ष वयाच्या मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दत्तू पंढरीनाथ डोळझाके (रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) याला संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि २७,५०० रुपये दंडाचे शिक्षा सुनावली आहे. २५ मे २०२२ रोजी पठार भागातील एका गावात घडलेल्या या प्रकारासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३५४(अ), ३५४(ब), ३२३, पोस्को, अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार दत्तू पंढरीनाथ डोळझाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. फिर्यादी व त्याच्या कुटुंबीय घरात असताना फिर्यादीची भाची दुपारी साडेतीन…
