Author: अनंत पांगारकर
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर बस स्टॅन्डजवळील अकोले रोड चौफूलीवर होत असलेली वाहतूक कोंडी आणि पोलिस नियंत्रण चौकी बसवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागणी तातडीने पूर्ण केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संगमनेर बस स्टॅन्ड जवळील अकोले रोड चौफूलीवर सतत वाहतूक कोंडी होत आहे. याचे मुख्य कारण ट्रैफिक सिग्नल असून नसल्यासारखे आहेत. वाहतूक नियंत्रण पोलिस चौकी नाही. सदर ठिकाणी असलेला अनधिकृत रिक्षा स्टॉप, आसपास झालेली व्यावसायिक अतिक्रमणे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये मनसेकडून विनंती करण्यात आली की, सदर ठिकाणी तात्काळ पोलिस नियंत्रण चौकी बसवण्यात यावी व रोडवरील घुलेवाडीलाईन अनधिकृत रिक्षा…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार करून वेळोवेळी तिच्याकडून सुमारे 30 लाख रुपये घेऊन ते परत देण्यास नकार देत विधवेच्या मुलीस मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. सप्टेंबर 2020 चे 1 मे 2023 या काळात संगमनेर आणि शिर्डीमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या संदर्भात संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी (जि. पुणे) येथील योगेश सुभाष टोपेकर यांच्या विरोधात अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश टोपेकर याची कोविड काळामध्ये फेसबुकवर पीडित महिलेची ओळख झाली होती. फेसबुकवर झालेल्या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती टोपेकर याला मिळाल्यानंतर त्याने या महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क…
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व महाविकास आघाडी प्रणित शेतकरी समृद्धी मंडळाचे संचालक भानुदास तिकांडे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचेच रोहिदास भोर निवडून आले. विरोधी भाजप उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी बुधवारी निवडणूक पार पडली. सभापतीपदासाठी मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे व भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळाकडून बाळासाहेब सावंत यांनी, उपसभापती पदासाठी मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी उपसभापती रोहिदास भोर व भाजपकडून शिवराम अरज यांनी अर्ज दाखल केले होते. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली यात सभापतीपदासाठी भानुदास…
विशेष वृत्त लेख शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते २६ मे २०२३ रोजी कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथून होत आहे. यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील १० जिल्ह्याशी थेट व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला जाणार आहे. समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठ्या सिन्नर इंटरचेंजमुळे शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. एका अर्थाने विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी पकडून देखील त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. एकाच वेळी शहरात दुचाकी चोरट्यांच्या एकापेक्षा अधिक टोळ्या कार्यरत असल्याचे दुचाकी चोरीच्या घटनांमधून समोर येत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अज्ञात चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकीमध्ये एका बुलेटचा समावेश आहे. 19-20 मे दरम्यान शहरातील ताजणे मळा येथून हबीब अब्दुल करीम तांबोळी या किराणा व्यावसायिकाची सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची क्लासिक कंपनीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. या संदर्भात बुधवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) रिक्षा चालक ते अब्जाधीश असा प्रवास असलेले आणि वर्षभरापासून अटकेत असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. भोसले यांच्या याचिकेवरील सुनावणी ६ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. येस बँक आणि डिएचएफएल घोटळा प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीआयने २६ मे २०२२ रोजी अटक केली होती. दरम्यान, ईडीने मनी लाँड्रींगच्या आरोपात देखील तपास सुरू केला होता. तेव्हापासून अविनाश भोसले हे कोठडीत आहेत. अविनाश भोसले यांना जवळपास वर्षभरापासून जामीन मिळालेला नाही. भोसले यांनी याप्रकरणी दिलासा मागत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान ६ जूनपर्यंत या प्रकरणाची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) दुचाकी वरून जाणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिच्या दुचाकीला कट मारून ‘तू मला आवडतेस’, असे म्हणून लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जमजम कॉलनी येथे राहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून याच भागातील फरदीन शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या मुलीने म्हटले आहे की, सोमवारी (ता. 22 मे) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या ओळखीच्या एका दाम्पत्यासह दुचाकीवरून रहेमतनगर येथे नाश्ता करण्यासाठी जात असताना पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून पाठलाग करीत आलेल्या आरोपी फरदीन शेख याने तिच्या दुचाकीला कट मारत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शैक्षणिक हब बनलेल्या संगमनेर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी शिक्षण व महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. परीक्षेत सुकेवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील मंगेश खिलारी, मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपारणे येथील राजश्री शांताराम देशमुख या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांनी अत्यंत जिद्द आणि आत्मविश्वासातून मिळवलेले हे यश संगमनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थी…
संगमनेर: अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सूर्य डोक्यावर आग ओकत असताना निळवंडेचे पाणी देखील तापले आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले असून यात पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर सवडीने निळवंडे धरण व कालव्याचे उद्घाटन करा, आधी कालव्यांद्वारे दुष्काळी भागातील जनतेला पाणी द्या. अशी मागणी केली आहे. थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दहा टीएमसी पाण्याची उपलब्धता असताना, दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्याचे पुण्यकर्म सरकारने पार पाडावे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संगमनेर नगर परिषदेच्यावतीने देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाते. याच उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्यावतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सन 2020 ते 2023 या तीन वर्षात 18 ते 59 वयोगटातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेले मृत्यूचे दाखले नगर परिषदेमार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. इयत्ता पहिलीच्या…
