Author: अनंत पांगारकर
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामाजिक जाणीव आणि संवेदना जागृत ठेवत शिक्षक सुनील कडलग व अनिल कडलग, लता पुष्पा व उषा या भावंडांनी आपल्या आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने रूढी परंपरा बाजूला ठेवत स्वामी विवेकानंद वाचनालय आणि आधार संस्थेस देणगी दिली. याचबरोबर विचारवंत प्रा. सोपानराव देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून प्रेरणादायी कार्य केले. रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाचे संस्थापक सुनील कडलग आणि आधार संस्थेमार्फत सामाजिक काम करणारे अनिल कडलग यांच्या मातोश्री शकुंतला किसन कडलग यांचे सोमवारी (ता.8) प्रथम पुण्यस्मरण होते. आयुष्यभर सामाजिक जाण व भान जपणाऱ्या आईचा स्मृतीजागर हा प्रा. सोपानराव देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करून व…
नासिक / संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ब्रेक न लागल्याने एसटी बसने समोरून येणाऱ्या राजहंस दुधाच्या वाहनाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सोमवारी दुपारी सिन्नर पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर सिन्नर-नाशिक मार्गावर नाशिकच्या दिशेने एल अँण्ड टी फाट्याजवळ हा अपघात झाला. शहापूर आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच. 06 एच. 8560 ही 40 प्रवासी घेऊन दुपारी शिर्डीहून शहापूरकडे निघाली होती. शहापूरच्या दिशेने जात असताना एसटी बस चालकाच्या बाजूने ओढली जात असल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सिन्नर बस स्थानकात येताच बस चालकाने सिन्नर…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर संगमनेरला नवे तहसीलदार मिळाले आहे महिनाभरापूर्वी 12 एप्रिलला बदलून गेलेल्या तहसीलदार अमोल निकम यांच्या जागेवर अमरावती विभागातून धीरज मांजरे बदलून आले आहे. याशिवाय शिर्डीच्या साईबाबा संस्थान मध्ये प्रशासन अधिकारी म्हणून श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून संगमनेरला नवीन तहसीलदारांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. तहसीलदार अमोल निकम यांची नाशिकला बदली झाल्यापासून संगमनेरचे पद रिक्त होते. या पदावर शासनाकडून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता होती. सोमवारी 8 मे रोजी राज्य शासनाने नासिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद विभागातील तहसीलदारांच्या शासनाने केल्या बदल्या आहेत. अमरावती विभागामध्ये कारंजा येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती असलेले धीरज…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारे गुणी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा यंदाचा नृत्य कलाभूषण पुरस्कार ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तीन विद्यार्थीनींनी पटकावला. सौम्या सचिन जोशी, अदिती राजेश लाहोटी व श्रिया अमोल मुळे या विद्यार्थीनींचा यात समावेश आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी देशभरातील दीडशे स्पर्धकांमधून 27 विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यात ध्रुव ग्लोबलच्या तिघींचा समावेश आहे. नटराज आर्ट अँड कल्चरलचे प्रा. रवींद्र हरदास, आसमान फाउंडेशनचे संस्थापक डॉ. रवी गिरे, भरतनाट्यम गुरू माडखोलकर, प्रा. डिंपल साखरे, प्रा. सुंदरी पिसिपती, अनिल कावडे, ममता जयस्वाल, प्रा.…
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. भंडारदरा धरणामध्ये सद्यस्थितीत 59.60% पाणीसाठा शिल्लक असून निळवंडे धरणामध्ये सद्यस्थितीत 57.12% पाणीसाठा शिल्लक आहे. रविवारी सायंकाळी निळवंडे मधून 600 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले असून साधारणतः 20 ते 25 दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून हे पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. ऐन उन्हाळ्यात सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे शेती पिकांना याचा फायदा होणार आहे.
गोंदिया (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शैक्षणिक संस्थेला कर्मचाऱ्यांचे 65 कोटी रुपये चुकविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पटेल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आणि सध्या बंद पडलेल्या संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अधिपत्याखाली गोंदिया येथे मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ही संस्था कार्यरत होती. मात्र ही संस्था बंद पडल्याने अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या फुल अँड फायनल सेटलमेंटचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला होता. गोंदिया एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था खासदार पटेल यांचे कुटुंबीय चालवीत आहेत. 2018 मध्ये संस्थेत एकही प्रवेश नोंदविला गेला…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघचालक गोळवळकर गुरुजी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील काँग्रेसच्या हरिभाऊ सोळंके यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मनोहर सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सोळंके यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व ५०१ अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, ६ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वरील संस्कृती संवर्धन नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक लिंक आली. सूर्यवंशी यांनी आलेली लिंक क्लिक करून ओपन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) चपराक प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संदीप वाकचौरे यांच्या शिक्षणावरील “ऐसपैस शिक्षण” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, लेखक सुनील माळी, प्रकाशक घनश्याम पाटील, सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व पत्रकार प्रकाश टाकळकर आदींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संगमनेरमधील पत्रकार उपस्थित होते. चपराक प्रकाशनाच्यावतीने शिक्षणासंबंधीची बारा पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्या मालेतील संदीप वाकचौरे यांचे हे चौथे पुस्तक आहे. संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाच्यावतीने यापूर्वी शिक्षणाचे दिवास्वप्न, शिक्षणाचे पसायदान, पाटी पेन्सिल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात झाले आहे. पुस्तकाला माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तर…
रविवार विशेष लेख (महाराष्ट्र संवाद न्यूज) भारतीय राजकारणात काही व्यक्ती इतक्या बनेल झाल्यात की त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही असेच व्यक्तीमत्व बनलं आहे. जगज्जेते आणि सर्वव्यापी असल्याने त्यांनी केलेली कोणतीही कृती ही दैवी देणगीच जणू. ते कोणालाही काहीही बोलले तरी ते शब्द फुलोरे आणि त्यांना कोणी काही बोललं तर तो द्रोह, त्या म्हणजे लाखोल्या. त्यांनी कसंही वागलं तरी तो दैवी चमत्कार, इतरांसाठी मात्र तो व्यंग ठरतो. त्यांच्या अवगुणांवर कोणी बोट ठेवलं की जणू देवावरचाच हल्ला. यामुळे इतरांनी पंतप्रधानांवर टीका करू नये. तो अधिकार केवळ आणि केवळ मोदींचा आणि त्यांच्या पक्षाच्या वाचाळांचाच. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सध्या देशात धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. देशात व राज्यात आगामी काळात सत्ता बदल निश्चित असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षात युवकांसाठी मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी डॉ. जयश्री थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व रामहरी कातोरे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पापडेजा आदींसह युवक पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले,…
