Author: अनंत पांगारकर

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात महाराष्ट्र दिनापासून मोठ्या थाटामाटात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे ही तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र महसूलमंत्र्यांचे खास लक्ष असलेल्या संगमनेरात मात्र नव्या धोरण लागू होण्यापूर्वीच जेसीबीद्वारे वाळू तस्करी होत असून मोठ्या प्रमाणात वाळू साठे तयार करण्यात आल्याचे महसूलच्या कारवाईत समोर आले आहे. संगमनेरात विद्यमान महसूलमंत्र्यांनी वाळू तस्करांचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात असले तरी हा दावा महसूलनेच केलेल्या कारवाईमुळे खोटा ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे रविवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई मध्ये महसूलच्या पथकाने पाठलाग करत जेसीबी ताब्यात घेतला तसेच काही अंतरावर पथकाला मोठ्या…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) डिजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्नविधी वेळेवर व्हावेत व विधवेची हेटाळणी टाळण्यासाठी गाव पातळीवर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभामध्ये ठराव घेण्यासाठी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिनींनी पुढे सरसावल्या आहे. चुकीच्या प्रथांविरोधात त्यांनी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन दिले. त्या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिले. लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर तसेच मृत्युनंतर करण्यात येणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीमध्ये वृषाली कडलग, ॲड. सीमा सातपुते, स्नेहलता कडलग, माधुरी शेवाळे, डॉ. नीलम शिंदे, डॉ. श्रद्धा वाणी, सुधा नवले, कस्तुरी शेवाळे आदींचा समावेश होता. निवेदनात…

Read More

विश्लेषण ☆ अनंत पांगारकर संगमनेरच्या म्हाळुंगी नदीवरील पुलावरून चालू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यातून संगमनेरकर पुरते गोंधळून गेले. थोरात-विखे यांच्या पत्रोपचारामुळे या खचलेल्या पुलाखालून बरेच पाणी वाहून जात आहे. थोरात-विखे समर्थकातील पुराव्यांच्या शीतयुद्धामुळे पूल होण्यास नेमके कोण आडकाठी आणत आहेत हेही आश्चर्यकारकरीत्या लोकांसमोर आले असताना जनतेचे मूलभूत प्रश्न आणि विकास कामांच्या सोडवणुकीमध्ये तरी किमान राजकारण आणू नये, अशी सर्वसामान्य जनतेची रास्त अपेक्षा आहे. थोरात-विखे यांच्यातील संघर्ष अलीकडे अधिक टोकदार झाला असून त्याचा परिणाम विकास कामांवर होऊन जनता भरडली तर जाणार नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवर स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेल्या पक्क्या…

Read More

राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज) राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्वच्या सर्व 18 जागांवर मोठा नेत्रदीपक विजय मिळविला आहे. त्यामुळे या बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व कायम राहिले. संगमनेर आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजी-माजी महसूल मंत्र्यांनी एकमेकांविरोधात आपले पॅनल उभे केले होते. निवडणूक निकालानंतर दोघांनीही आपापल्या बाजार समित्या कायम राखल्या आहेत. संगमनेरमध्ये थोरात यांच्या तर राहत्या मध्ये विखे यांच्या नेतृत्वाखालील मंडळांनी सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविल्याने दोन्ही सामने बरोबरीत सुटले आहे. राहाता बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ…

Read More

शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यात गतिमान करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिले. महसूल मंत्री विखे पाटील यांनी‌ लोणीयेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. विखे म्हणाले, राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित वाळू धोरण राज्य शासनामार्फत…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता, तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली असून १५ भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांची जबाबदारी…

Read More

निवडणूक विश्लेषण | अनंत पांगारकर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षेप्रमाणे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविले आहे. थोराताना शह देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या नाकातोंडात पाणी गेले. थोरात यांच्या सैन्याने सेनापतीविना असलेल्या विखेंच्या सगळ्याच सोंगट्या मारल्या. शेतकरी मंडळाला एकही जागा मिळून न देणाऱ्या बुद्धिबळाच्या निवडणुकीत थोरात अखेर बाजीगर ठरले. बिनविरोध निवडीची परंपरा मोडीत काढत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनसेवा मंडळाचे उमेदवारी करत निवडणुकीत रंगत आणली होती. सर्वच्या सर्व…

Read More

महाराष्ट्र संवाद ◇ रविवार विशेष लेख कोणतीही सत्ता असो ती माणसाला अहंकारी बनवत असते. सत्ता डोक्यात भिनली की ती कोणालाच जुमानत नाही. मोदींच्या नेतृत्वातील मध्यवर्ती सरकारचं सध्या असंच काहीसं सुरू आहे. अहंकाराने सत्ताधारी इतके मदमस्त झालेत की आसपास काय बोललं जातं याचीही तमा ते करत नाहीत. असंख्य आरोपांची राळ उठली असतानाही त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. साधेसुधे आरोप झाले असते तर एकवेळ ते दुर्लक्षित करता आले असते. पण देशाच्या सार्वभौमत्वाला हात घालणारे आरोप होऊनही जेव्हा सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा त्यांना अहंकाराने पछाडल्याचाच प्रत्यय असतो. केंद्रातल्या मोदी सरकारचा कारभार अशाच अहंकारात सुरू आहे. असंख्य आरोप जे देशाच्या अस्तित्वालाच हात घालणारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मित्राचा खून केल्याच्या कारणावरून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम 304 (पार्ट सेकंड) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडासह दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शंकर लहानू साळुंखे, रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 3 फेब्रुवारी 2022 रोजी देवठाण रोड अकोले येथे खुनाची घटना घडली होती. सुतार व्यवसाय करणाऱ्या सरबजीत ओमप्रकाश चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणी राजू जगधारी राजभर याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी शंकर लहानु साळुंखे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक माहिती अशी, 3…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाचा साफ धुव्वा उडाला आहे. त्यांच्या अधिपत्याखालील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. एका जागेवर थोरात समर्थक अपक्ष उमेदवाराचा व शेतकरी विकास मंडळाचे सतरा उमेदवार विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणूक मैदानामध्ये थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ आणि विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळात सरळ लढत झाली. शुक्रवारी मतपेटीत 45 उमेदवारांचे भवितव्य बंद झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी…

Read More