Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा विचार जन माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रभाग 1, 3, 4, 11, 12 व 14 मध्ये झालेल्या जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली. यांचा सहभाग: संगमनेर शहरात झालेल्या पदयात्रेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मनोज पुंड, बाळासाहेब पवार, सुनंदाताई दिघे, मुन्ना कडलग, किशोर टोकसे, शाकिब बागवान, जीवन पंचारिया, सुभाष दिघे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, गणेश गोडसे, गौरव डोंगरे, चंद्रकांत काळंग, अशोक जाधव, संजय पुंड, श्याम करपे, संजय पुरी, हरी भोसले, सचिन पाबळकर, सचिन सोनवणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपली भाषा समृध्द असली की जाणीवा समृध्द होतात. संगमनेर महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदविका पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ पत्रकारितेचे विविध पैलूंच शिकविले जात नाहीत तर जाणीवा समृध्द केल्या जातात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. यांची उपस्थिती: संगमनेर महाविद्यालयाच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक कैलास सोमाणी, महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य मधुसूदन नावंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. अरूण गायकवाड, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. संतोष खेडलेकर उपस्थित होते. मालपाणी म्हणाले, संगमनेर महाविद्यालयात मागील बारा वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात विद्यार्थी, गृहिणी, डॉक्टर्स, पत्रकार,…

Read More

घोलप यांच्या पाठोपाठ शिर्डीतून पदाधिकारी ही राजीनाम्याच्या तयारीत! महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – त्या ४० लोकांनी बंडखोरी केली, ते आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यासाठी त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी एका लोकसभा मतदारसंघाची निवड करायला सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली, पण तिथे गद्दार वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी द्यायची होती, मग मला का तयारी करायला सांगितले? असा सवाल करीत माजीमंत्री घोलप यांनी आपली नाराजी जाहीर केली. उपनेतेपदाच्या राजीनाम्याची घोषणा: बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे जाहीर केले. ३५ शाखांची स्थापना: शिर्डी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – उपनेते आणि शिर्डीचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुनर्बांधणी केलेल्या आणि विजयाची खात्री असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांना रविवारी मोठा धक्का बसला. ठाकरेंनी शिर्डीत केलेल्या बदलानंतर उपनेते बबनराव घोलप यांनी आपला राजीनामा ठाकरे यांना पाठविला असल्याची माहिती समोर येत आहे. नाराजी: एकीकडे जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांना दुसरीकडे शिर्डीतून हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे संगमनेर-शिर्डी दौऱ्यावरून जळगावमध्ये जात नाही तोच शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेसोबत गद्दारी करत काँग्रेस, भाजपची साथ केलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात असल्याने बबनराव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पाया सहकारावर आधारित आहे. सहकाराच्या माध्यमातून या तालुक्याने भरारी घेत राज्यात दिशादर्शक काम केले आहे. दिवंगत माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, दिवंगत स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या प्रमुख नेत्यांसह सहकारात काम करणाऱ्या अनेकांनी तालुक्यात सहकाराचा पाया रोवला. या सहकारातून समृद्धीची राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा दिली. समाजाच्या प्रगतीचे उद्दिष्ट समोर ठेवून तत्कालीन धुरीनांनी हा सहकार जसा वाढवला, जोपासला तसाच तो संपविण्याचे काम आता पांढऱ्या कपड्यातील लुटारू करीत असल्याचे दिसून येत आहे. सहकारात अपप्रवृत्ती: संगमनेर तालुक्यात पतसंस्थांची चळवळ जोमात उभी राहिली आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील…

Read More

रविवार विशेष @ प्रवीण पूरो  कोणतीही अपेक्षा नसताना मनोज जरांगे पाटलांनी सार्‍यांनाच जमिनीवर आणून ठेवलं आहेे. विशेषत: भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी केलेला खोटारडेपणा जरांगे पाटलांच्या उपोषणाने असा काही जिरला की यापुढे या पक्षाची माणसं खोटी बोलणार नाहीत अशी अपेक्षा आहे. इतकं होऊनही ती खोटारडेपणा करू लागली तर त्यांची अवस्था काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. मराठा जरांगे पाटलांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने दिलेली सबक हा सर्वच राजकीय पक्षांना मिळालेला धडा आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाचं निमित्त करत राजकीय पोळी भाजून घेतली त्यांच्यासाठी तर तो मोठा धक्का आहे. यामुळेच अशी खोटी आश्‍वासनं देताना सर्वांनाच सावध राहण्याची आवश्यकता आहे.  विशेष म्हणजे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. थोरातांनी केली होती मागणी: तीन-चार दिवसांपूर्वी माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणी पाठोपाठ पालकमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे घोषणा केल्याने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्तांना पाणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मंत्री विखेंच्या सूचना: गत आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे गांभीर्याने नियोजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड व उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशीलदार यांच्यासह संगमनेर महाविद्यालयामधील 31 जणांचा एचडी सायंटिफिक इंडेक्स 2023 मध्ये समावेश झाल्याची माहिती देण्यात आली आहे. क्रमवारी जाहीर: जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी “ए.डी.सायंटिफिक इंडेक्स -२०२३ नुकतीच जाहीर करण्यात असून जागतिक संशोधकांच्या अद्ययावत क्रमवारीत संगमनेर महाविद्यालयातील संशोधकांचा मोठ्या संख्येने समावेश झाला आहे. निकष: अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठातील प्रा. मुरत आल्पर व प्रा. सिहान डॉ. जर संयुक्तपणे ‘आल्पर डॉ. जर सायंटिफिक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स विश्लेषित केला आहे. त्यासाठी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षातील एच इंडेक्स, आय-टेन इंडेक्स निर्देशांक व सायटेशन स्कोअर याचे विश्लेषण केले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – भारतीय सण-उत्सवांच्या माध्यमातून मुलांना आपली प्राचीन परंपरा समाजावी यासाठी गीता परिवार संचलित संस्कार बालभवनमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. गुरुवारी जन्माष्टमी निमित्ताने बालभवनमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीकृष्ण, राधा, सुदामा, गोप व गोपिकांच्या आकर्षक पेहरावात आलेल्या जवळपास पन्नास मुलांनी या उत्सवात सहभाग घेतला. ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की’ असा घोष करीत मुलांनी एकत्रितपणे हंडी फोडून गोपाळकाल्याचा आनंद लुटला. बालभवन गोकुळासमान: श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गुरुवारी (ता. 7) गीता परिवाराच्यावतीने संस्कार बालभवनमध्ये बालगोपाळांची ‘दहीहंडी’ बांधण्यात आली होती. यावेळी सजवलेल्या पाळण्यात विराजमान गोपाळकृष्णांच्या समोर बसून मुलांनी सामुहिकपणे वेगवेगळी भजने गावून या उत्सवाची रंगत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – संगमनेरच नव्हे तर राज्यातील बहुचर्चित आणि येथील समृद्ध सहकार विश्वाला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी दाखल असलेल्या सर्वच अर्जांची सुनावणी एकाच वेळी घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय विश्वात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या व या प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तपास जैसे थे: पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होतात तत्कालीन तपास अधिकारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी बँकेच्या व्यवस्थापकासह पाच आरोपींना अटक केली…

Read More