Author: अनंत पांगारकर

‘अमृत महोत्सवी भारत’ या विषयावर ॲड. असीम सरोदे कॉम्रेड डॉ. अजित नवले मांडणार विचार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कालकतीत प्रेमानंद (बाबूजी) रूपवते यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त संगमनेरमध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. संघराज रुपवते यांनी दिली आहे. आमदार बाळासाहेब थोरात असतील अध्यक्ष : शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता मालपाणी लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे. अमृत महोत्सवी भारत या विषयावर हे मांडणार विचार : अभिवादन कार्यक्रमादरम्यान बाबूजी यांच्या स्मृती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राहुरी – सातत्याने लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाची प्रकरणे समोर येत आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथून देखील असेच एक प्रकरण समोर आल्याने सरकारने लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधात कठोर कायदा करावा या मागणीसाठी शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी राहुरीच्या वायएमसीए ग्राउंडवरून भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. का काढला जातोय मोर्चा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात क्लासच्या नावाखाली धर्मांतराचं रॅकेट चालवल्याचं उघडकीस आल. येथे क्लासच्या नावाखाली अल्पवयीन हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न चालू होता. मुलींना धमकी का दिली जात होती : उंबरे गावातील एक मुस्लिम शिक्षिका कोचिंग क्लास घेते. मात्र ईदसारख्या सणांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एक ऑगस्ट पासून राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमातच निवासी नायब तहसीलदाराने शेतकऱ्याकडून तीन हजाराची लाच घेतल्याचे समोर आले आहे. लाचखोर नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला असून त्याला अटक करण्यात आले आहे. काय आहे महसूल सप्ताह : शासनाच्या आदेशाने राज्यात महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी हा सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांनी महसूल विभागासह सर्व यंत्रणांना निर्देश दिलेले आहेत. या माध्यमातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई -राज्यात निर्माण झालेल्या वाळू प्रश्नाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुपारच्या सत्रात सभागृहात गौण खनिजासंबंधी विविध प्रश्न उपस्थित करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. काय म्हणाले आमदार थोरात : घरगुती उपयोगासाठी गौण खनिजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करू नका. ज्यांचा उद्देश व्यापारी नाही त्यांच्यावर कसल्या कारवाया करता? मोठे धेंड सोडून सामान्य माणसाला का त्रास देता? अंगणात किंवा घरासमोर, दुकानासमोर, रस्त्यावर मुरूम टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जे व्यापारी उद्देशाने गौण खनिजाची चोरी करतात त्यांना हे सरकार मोकळे सोडते आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी बांधवांना मात्र त्रास दिला जातो. जो शेतकरी आपल्या अंगणात मुरूम…

Read More

रूफटॉप सोलर उभारणी करणारा राज्यातील पहिला कारखाना महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने छतावरील सोलर सिस्टीम (रूफटॉप) प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाद्वारे दररोज ७५० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. थोरात कारखान्याने अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रकल्प कार्यान्वित करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे राज्यासाठी प्रयोगशील व दिशादर्शक राहिला आहे. पुण्यातील बैठकीत कार्यकारी संचालकांचा सत्कार : थोरात कारखान्याने अल्प कालावधीत या प्रकल्पाची उभारणी करत प्रकल्प कार्यान्वित केल्याने पुणे येथे को-जन इंडियाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  अमोलराजे म्हस्के पाथर्डी-शेवगाव :-माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि सभापती डॉ. क्षितिजभैय्या नरेंद्र घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घुले पाटील प्रणित असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध योजना सुरू करण्यासाठी शेवगावच्या तहसील कार्यालयावर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. का काढला मोर्चा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे हजार कोटी रुपये शिल्लक असतानासुद्धा बांधकाम कामगाराच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व कल्याण मंडळाकडे कामगार मागणी करूनसुद्धा मंडळाकडून दखल न घेतल्यान या कामगारांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला. या आहेत मागण्या: मोर्चेकरी कामगारांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – लोकमान्य टिळक हे भारतीयांच्या कपाळावरील टिळा आहेत असे गौरवोद्गार काढत आजचा पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्प देणार आहे. पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी पुण्यात: लोकमान्य टिळक यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान आज पुण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विधिवत पूजा करत दर्शन घेतले त्यानंतर पुरस्कार सोहळ्यासाठी एस पी महाविद्यालयात हजेरी लावली. यांची उपस्थिती: यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, राज्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बहुजन समाजामधील प्रतिभावान व कर्तबगार ठरलेल्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व शाहिर अमर शेख यांना भारतरत्न पुरस्कार गौरव करण्याची मागणी असिफ शेख यांनी केली आहे. यांना दिले निवेदन: प्रांताधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्काराची मागणी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिर अमर शेख यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप महान असे कार्य करून ठेवले. ते लोक चळवळीतील कार्यकर्ते असल्याने निरपेक्ष वृत्तीने काम केले आहे. त्यांनी कधीच पुरस्कार, मानधन व पदांसाठी कधीच काम केले नाही. त्यांनी सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. का केली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे निश्चित झाले असून या पदावर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधीमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारी कायम राहणार आहे. त्यामुळे आता सभागृहात वडेट्टीवार-थोरात विरोधकांचा किल्ला लढवताना दिसतील. चार वर्षानंतर काँग्रेसला पुन्हा संधी: ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्ष नेता आणि विधान परिषदेचेही विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडेच असे सूत्र ठरलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर सभागृहात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे – समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना ठाण्यातील शहापूर तालुक्यामध्ये भीषण दुर्घटना घडली असून काल रात्री ग्रेडर मशीन (क्रेन) पडून त्याखाली १७ जणांचा दबून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनही काही लोक या गर्डर मशीनच्या खाली अडकल्याची शक्यता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथेही दुर्घटना घडली आहे. यात १७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून चार-पाच लोक जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून रात्रीच्या वेळी हे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. काय आहे नेमकी घटना: समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या…

Read More