Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष / प्रवीण पुरो महाराष्ट्रातील सत्तेच्या पिपासूंचा नंगानाच गेल्या रविवारी सार्‍या जगाने अनुभवला. गेल्या वर्षी याच काळात हा नंगानाच गोहाटीपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत निर्लज्जपणे सुरू होता, जवळपास सर्वांनीच तो ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. माणून नावाचा प्राणी किती निष्ठूर असतो, तो कसाही विकला जाऊ शकतो आणि विकला जाऊनही मालकावर कसा दुगाण्या झाडतो याचं उदाहरण देशभरातल्या जनतेला मिळालं. या नंगानाचाचे खलनायक होते अर्थातच देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याच्या राजकरणाचा बाजार करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. काहीही करा सत्ता ताब्यात घ्या, या त्यांच्यातल्या हवरटपणाने राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. सत्तेसाठी आजवर माणसं फोडली जायची. आता थेट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी (ता. 7 जुलै) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावात एक नंबर कांद्यास सर्वाधिक 1801 रुपयांचा तर टोमॅटो 1400 रुपये प्रति कॅरेट बाजार भाव मिळाला आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीस आणत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. गुंजाळ म्हणाले, शुक्रवारच्या लिलावामध्ये बाजार समितीत एकूण 26444 कांदा गोण्यांची आवक झाली. या लिलावामध्ये चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1801 रुपयांचा, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 900 रुपयांचा भाव मिळाला. तर गोल्टी कांदाही 400 ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वयात येण्यापूर्वीच दोन महिने अगोदर अल्पवयीन मुलीला कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेणाऱ्या सारोळे पठार येथील सतीश हरिभाऊ फटांगरे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे हा प्रकार घडला. आरोपी सतीश फटांगरे याने फिर्यादीच्या अल्पवयीन नातीस कशाचे तरी आमिष दाखवून फिर्यादीच्या राहत्या घरातून गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पळवून नेले, अशा आशयाची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वायाळ तपास करत आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना अखेर मंत्रालयात कार्यालयासाठी जागा मिळाली. पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अजित पवारांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर शासकीय कार्यालय देण्यात आलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना मंत्रालयात नेमकं कुठलं कार्यालय देणार यावरून राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली होती. आतापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सहाव्या मजल्यावर एकच कार्यालय होते. मात्र, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मधलं कार्यालय देण्यात आलं आहे. पवार यांच्या कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी या दोघांचेही कार्यालय रिकामे करण्यात आले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र ‌न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. त्यामुळे शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी जाहीर केले. मात्र आता काँग्रेसनेच या पदावर दावा केला आहे. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचाच विरोधी पक्ष नेता असेल असे सांगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचे संकेत दिले. थोरात म्हणाले, राज्यात सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस-पवार सरकार जर सत्तेतून खाली खेचायचे असेल तर आपल्याला महाविकास आघाडी भक्कम ठेवावी लागणार आहे, पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विरोधी पक्ष नेत्याचे नाव घोषित केले जाईल. काँग्रेस सभागृहातील 45 आमदार असलेल्या सर्वात मोठा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथीचे सत्र सुरूच आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना (ठाकरे) प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणून गोऱ्हे यांच्याकडे बघितले जात होते. त्यामुळे गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश आश्चर्यकारक मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यावेळी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या गोऱ्हे यांच्याकडे महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून बघितले जात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनच्यावतीने येत्या १५ व १६ जुलैला संगमनेरमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींच्या सहा गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या चार प्रकारात राज्य पातळीवर जाण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली आहे. स्पर्धेत सहभागासाठी ऑनलाईन पद्धतीने १३ जुलै पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसारासाठी तालुका स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत योगासन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया व नॅशनल गेम्स या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील योगासनांचा समावेश करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राने सुवर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल. तसेच अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवत जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल या दृष्टीने आवश्यक ती कृती तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी गुरुवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या वर्षभरात लाचखोरीने कळस घातल्याचे दिसून येत असून लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अनेक छोटे-मोठे लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकत असताना पोलीस उपनिरीक्षकाला 15 हजाराची लाच घेताना पकडण्यात आले आहे. लाचखोरी करणाऱ्या या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव गणपत महादू काकड असे असून ते नाशिक रोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एसीबीने गुरुवारी दुपारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात ही कारवाई केली. दररोज लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक काकड याने तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजार रुपये ठरली. तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपये स्वीकारत असताना…

Read More