Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा १० वी, १२ वी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी गौरव हा त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आपल्या पुढील भविष्यासाठी गौरव रूपी ऊर्जा घेवुन हे पुरस्कारार्थी तालुक्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे होते. साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. जालिंदर भोर, तहसीलदार सतिष थेटे, गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, अमृतसागर दुध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बुलढाणा – महत्त्वकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला. रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झालेल्या बसणे अचानक पेट घेतला. यात २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. चालक, वाहकासह ८ प्रवासी खिडक्या तोडून सुखरूप बाहेर पडले. उर्वरित २५ प्रवाशांचा मात्र होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगर परिषदेतील वादग्रस्त अभियंता राजेंद्र सुतावणे यांनी महिलेशी अरेरावी करत उद्धट वागणूक देण्याचा प्रकार समोर आला आहे. आशा उद्धटखोर अधिकाऱ्यावर कारवाईसाठी तसेच संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूल पडण्यासदेखील संबंधित अधिकारीच जबाबदार असून यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तीन माजी नगरसेवकांसह नागरिकांनी साकडे घातले आहे. बदली होऊन देखील संगमनेर नगरपालिकेतील पदभार न सोडणाऱ्या या अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका अल्पना तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश थोरात आदींसह नागरिकांनी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. आधीच पोलीस ठाण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि गत दोन वर्षात पुन्हा गुन्हेगारी करणाऱ्या 33 व्यक्तींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे प्रस्ताव संगमनेर उपविभागाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रस्ताव पाठविण्याची संगमनेर उपविभागातील ही पहिलीच वेळ आहे. संगमनेर उपविभागात संगमनेर शहर संगमनेर तालुका आश्वी घारगाव अकोले आणि राजुर या सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सहा पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे हे प्रस्ताव पाठविले आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांची जंत्री उपअधीक्षक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज “बंटी, काय करतोयेस” आईनं विचारलं. “गेम खेळतोय” मोबाइलवरची नजर न हटवता बंटीनं उत्तर दिलं. राजला फोन कर कोण राज??? तुझा मावसभाऊ, सुमा मावशीचा मुलगा, मी कशाला फोन करू अरे, त्याचे वडील गेले मग! अशी घटना घडली की भेटायचं असतं. तू काही जाणार नाहीस निदान फोन तरी कर. तुम्ही एकाच वयाचे आहात. त्याचा काय संबंध, मी सांगते म्हणून फोन कर फोर्स करू नकोस. काही फोन बिन करणार नाही. तसंही आमचं रिलेशन फक्त नावलाच आहे दोन मिनिटं तर बोलायचयं. मित्रांशी कसा तासनतास बोलतोस उगीच मित्रांना मध्ये आणू नकोस, बंटी चिडला. मग फोन कर आता तर मुद्दाम करणार नाही बंटी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुरुवारी (ता. 29 जून) आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बोटा आणि कुरकुटवाडी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या शाखांची स्थापना करण्यात आली. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातही आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा नारा घुमणार आहे. विहिंप बजरंग दलाच्या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी जय श्रीराम…! जय कारा वीर बजरंगी, हर हर महादेव..! छत्रपती शिवाजी महाराज की जय…!च्या घोषणा देवून फटाके वाजवण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद म्हणून खिचडी व केळी वाटप करण्यात आले. बजरंग दल संगमनेर प्रखंड संयोजक कुलदिप ठाकूर यांनी ध्वज पूजन करून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सेवा, संस्कार व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चौघांचे सेवा जेष्ठतेनुसार भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेरच्या विकास पानसरे यांच्यासह गोरक्ष गाडीलकर गुलाबराव खरात व सतीश खडके यांचा समावेश आहे. या चौघा अधिकाऱ्यांना लवकरच प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद असलेले जिल्हाधिकारी पद भुषविण्याचा मान मिळणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेले चौघेही आयएएस अधिकारी कृषी पदवीधर असतील. जिल्ह्यातील चौघांना एकाच वेळी हा सन्मान मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्याची मान प्रशासकीय सेवेत उंचावली आहे. सध्या अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष असलेले विकास पानसरे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी बारा वर्षांपूर्वी अहमदनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पंढरपूर – गेल्या 35 वर्षांपासून देवगड येथील भास्करगिरी महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल यांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील महापूजेचा बहुमान मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते ही महापूजा झाली. त्यामुळे यावर्षी नगर जिल्ह्यातील नेवासा येथील वडाळा बहिरोबा या दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आज (ता. 29 जून) आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा झाली. या महापूजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दांपत्यासमवेत काळे दाम्पत्य सहभागी झाले होते. महापूजेचा मान मिळाल्यानंतर या गणपतीला एक वर्षाचा मोफत एसटी पास एस टी महामंडळाकडून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज चोराला कोण आपलं म्हणेल, कोण त्याची पूजा करेल; पण महाराष्ट्र धर्मात चोरही वंदनीय आहे आणि त्या चोराचे नाव आहे विठ्ठल. ह्या विठ्ठलाला अनेक प्रतिभावान कवींनी, संतांनी आपल्या शब्दात “धरले”. गच्चं बांधून ठेवले. कसे ते सांगत आहेत निरेन आपटे! ग. दि. माडगूळकरांनी ह्याला वेडाही म्हटलं, त्यांनी लिहिलं आहे: “घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार! विठ्ठला, तू वेडा कुंभार!” प्रत्येक माणूस निराळा घडवून, प्रत्येकाचे दैव निराळे घडवणारा हा विठ्ठल कुणा मुखी लोणी टाकतो तर कुणा मुखी अंगार टाकतो, म्हणून हा वेडा कुंभार वाटतो. विठुरायाचं वर्णन “कानडा राजा पंढरीचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज उत्तर प्रदेशातील सहानपूर येथे भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यातून ते बचावले असून जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते. आझाद त्यांच्या फॉर्च्यूनर कारमधून देवबंद दौऱ्यावर होते. ते देवबंदजवळ पोहोचले असताना काही अद्याप लोकांनी त्यांच्या कारवर अचानकपणे गोळीबार केला. त्यांच्या कारवार अनेक गोळ्यांचे ठसे दिसत असून कारच्या सगळ्या काचा फुटल्या आहेत. तसेच अज्ञातांनी झाडलेल्या गोळ्यांमधील एक गोळी आझाद यांच्या बरगडीला चाटून गेली आहे. त्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. हल्लेखोर नेमके…

Read More