Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : पुण्याच्या कसबा पेठ व पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणुकांचे निकाल बघता जनतेने सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची झालेली युती जनतेला मान्य नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत असून सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटत आहे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करत पवार म्हणाले राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज परदेशात मुलींना फसवून नेले जाते. राज्यात अत्याचाराचे प्रकार वाढले आहे. श्रीरामपूरची घटना देखील ताजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागतंच. पण आपण एकत्र लढलो तर निश्चितचं त्यांचा पराभव करु. कसबापेठ मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपचा उमेदवार निवडून येत होता. आता जनता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात नाकारत आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र होऊनच निवडणुका जिंकायच्या आहेत. तरीदेखील कसबा जिंकलो म्हणून हुरळून जाऊ नका. आपल्याला जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम करायच आहे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला. जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मंगळवारी अहमदनगरमध्ये आले होते. तत्पूर्वी त्यांनी पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, कोणी ताम्रपत्र घेऊन जन्माला येत नाही. आम्ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज महिला दिनाचे औचित्य साधीत सामाजिक बांधिलकीतून स्त्रियांच्या आजारासाठी मोफत तपासणी व उपचार शिबिराचे बुधवारी ८ मार्चला संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. स्त्रीरोगतज्ञ वैद्य स्मिता अतुल देशमुख यांनी यासंबंधी माहिती दिली. संगमनेरमधील श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिन महिलांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन स्मिता देशमुख व अतुल देशमुख यांनी केले आहे. शिबिरामध्ये महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावरून जास्त जाणे, कमी जाणे, पाळी वेळेवर न येणे, लवकर येणे, पाळी दरम्यान ओटी, छाती, कंबर, पाय दुखणे. स्त्री बीजाची वाढ न होणे. गर्भ पिशवीला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे : राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे, ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झालेले असल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देत दिलासा दिला आहे. ते म्हणाले,” सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निर्देशही दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आपल्या कुटुंबीयांसह धुळवड साजरी करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत करा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळीच मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून अवकाळी पाऊस आणि गारपिटी संदर्भात परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट केल्याप्रकरणी ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष प्रवीण देशमुख याला नागपूर सायबर सेल पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. कसबा निवडणुकीनंतर देशमुख याने नितीन गडकरी यांच्या नावाने फेक मॅसेज व्हायरल केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे फेक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी हा ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष असून प्रविण देशमुख असे त्याचे नाव आहे. आरोपी प्रवीण देशमुख नागपूर सायबर सेलच्या ताब्यात होता. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने प्रवीण देशमुखची चार तास…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : अवकाळी पावसाने अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगलीसह काही भागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. होळीचा सण राज्यभर साजरा होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने राज्याच्या बहुतांश भागात थैमान घातले आहे. त्यामुळे अवकाळीच्या नुकसानीची आकडेवारी समोर आल्यानंतर मदत केली जाईल असा आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्ष, हरभरा, मूग अधिक शेती पिकांचे प्रचंड नुकसान होऊन पिके भूईसपाट झाले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने अवकाळी पावसाचं शेतकऱ्यांवर संकट आले आहे, अशी भावना विखे पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारची भूमिका…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या दहा वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधारमध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही, अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी गरजेचे असल्याने नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सद्यस्थितीतील अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात 17 लाख 49 हजार 888 आधार धारकांचे आधार माहिती अद्यावत करणे बाकी आहे या आधारधारकांनी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नागरिकांना जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आधार माहितीचे अद्यावतीकरण करावे लागणार आहे. अथवा नागरिकांना स्वतः my Aadhaar…
महाराष्ट्र संवाद न्यूज शहादा (जि. नंदुरबार) मी अपक्ष आमदार आहे आणि अपक्षच राहणार असून कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही आहे. मला खात्री आहे या संदर्भात राज्य सरकार आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यातून चांगला मार्ग काढतील. या योजनेसाठी राज्य सरकारवर आपण दबाव आणण्याचे काम करणार आहोत, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशन आदरणीय दोन दिवसाच्या सुट्टीत तांबे मतदारांचे आभार मानण्यासाठी मतदार संघात आले होते. यावेळी शहादा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आपण आग्रही राहणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत पहिल्या चर्चेत आपण हा मुद्दा देखील मांडला असल्याचे आठवण त्यांनी पत्रकारांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण आणि पर्यटक, गिर्यारोकांचे साहस केंद्र असलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात १३० प्रजातीचे पक्षी आढळून आले आहेत. कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यात पहिलेच पक्षी सर्वेक्षण २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. हे सर्वेक्षण कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य, वन्यजीव विभाग नाशिक आणि आऊल कन्सर्वेशन फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आले. यामधे महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील १६ पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते. अभयारण्याच्या दोन वनपरिक्षेत्रामध्ये प्रत्येकी ४ असे अभयारण्य मिळून ८ मार्ग आखण्यात आले होते. हे मार्ग उंच-सखल जंगला नुसार कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ किलोमीटर असे आखण्यात आले होते. सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी वनरक्षक आणि वनमजूर यांच्या सहकार्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र व गोवा या राज्यातील महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने ‘खेलो इंडिया – दस का दम’ या नावाने योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या 12 मार्च रोजी पुण्यातील सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारच्या या स्पर्धा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. वय वर्ष 9 ते 18 आणि 19 ते 55 अशा दोन गटात होणार्या या योगासन स्पर्धेत पारंपरिक व कलात्मक या दोन क्रीडा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात महाराष्ट्र आणि गोव्यातील कोणत्याही महिला स्पर्धकाला सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी तयार केला गेलेला अभ्यासक्रम नॅशनल योगासन…
