Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या रिक्त जागी सिदराम सालीमठ यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आयएएस भोसले यांच्यासह राज्यातील अन्य काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून निधी चौधरी यांचाही समावेश आहे.राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या रिक्त जागी सिदराम सालीमठ यांची, सिडको ओरंगाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी तर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बीडचे जिल्हाधिकारी असलेल्या राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून याशिवाय मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी असलेल्या श्रीमती निधी चौधरी यांची मुंबईत सेल टॅक्सच्या ज्वाईन्ट कमिशनरपदी बदली…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी एक नवे ट्विट करत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात केली आहे. एकीकडे आपण कॉग्रेस सोडली नसल्याचे सांगणाऱ्या सत्यजीत तांबे यांना या ट्विटमधून नेमके काय साध्य करायचे याची चर्चा पून्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तांबे मामांचा हात सोडणार की भाऊसाहेब थोरात यांच्या विचारावर वाटचाल करण्याचे सुचित करत मामांचा हात घट्ट पकडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तांबे या ट्विटने भाजपच्या गोटात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉग्रेसचे बंडखोर नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी निवडून आल्यानंतर आपण अपक्षच राहणार…
“काँग्रेसचा विचार हाच आपला विचार” सांगत पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर काँग्रेसचा विचार हाच सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा व आपला विचार असून हा विचार पुढे न्यायचा आहे. असे म्हणत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांनी निर्माण केलेल्या पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. जिल्ह्यात विकास कामांना खीळ घालून जे दहशतीचे राजकारण शेजारच्या मंत्र्यांकडून सुरू आहे ते जिल्हा कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता दिला. खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर संगमनेरमध्ये आलेल्या काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमधील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केले. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खेळण्यासाठी मोबाईल देतो असे सांगत आठ वर्षाच्या चिमुरडीला स्वतःच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त व विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने (पोक्सो न्यायालय) दोषी ठरवत वीस वर्ष सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रशीद सरदार बेग (वय २० वर्ष, राहणार खोसपुरी, ता. जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून अहमदनगरच्या अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, तिसरं इयत्तेमध्ये शिकणारी आठ वर्षे वयाची चिमुरडी २४ नोव्हेंबर २०२० रोजी घरासमोरील ओट्यावर खेळत असताना तेथे आलेल्या आरोपीने चल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्राच्या उभारणीत ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच सामर्थ्य संपन्न राष्ट्र निर्मिती करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्याचे इनरव्हीलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखरपाटील यांनी केले. येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरतर्फे जिल्ह्यातील ४२ शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने व पाच शाळांना पर्यावरण पूरक, उपक्रमशिल व आनंदी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी शेखर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ च्या प्रेसिडेंट रचना मालपाणी, ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा गावातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक सलोखा जपत हरिनाम सप्ताहामध्ये उभारण्यात आलेल्या मंडप खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याची वीण घट्ट असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात रविवार दि. १२ ते रविवार दि.१९ फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रोज सायंकाळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ७०२ विद्यार्थ्यांना खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते मोफत टॅबचे रविवारी वितरण करण्यात आले. यावेळी इतर मागासवर्ग बहूजन कल्याण विभागाचे नाशिक विभाग उपसंचालक डॉ. भगवान वीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाज्योती या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास-प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जीईई, नीट, एमएचटी-सीईटी, एमपीएससी, युपीएससी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर स्वर्गीय उद्योगपती माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सफायर मॅरेथॉन स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील पाच गटांतील विजेतेपदे अनुक्रमे अजय राठोड, आर्या अंत्रे, खुशी हासे, सचिन भारद्वाज आणि संदीप चौधरी यांनी पटकावले. मालपाणी उद्योग समूहाचे स्व. उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ मागील १० वर्षांपासून लायन्स क्लब संगमनेर सफायरद्वारे सहा किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालपाणी लॉन्सपासून स्पर्धेला शुभारंभ झाला. लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे यांच्या हस्ते स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कोठावदे यांच्यासह मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे चेअरमन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई महापुरुषांवरील सातत्याने केलेली टीका आणि विरोधकांच्या कायमच निशाण्यावर राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून महाराष्ट्राला आता रमेश बैस यांच्या रूपाने नवे राज्यपाल लाभले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करताना बैस यांच्यासह देशभरात तेरा राज्यात राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम बघितले आहे. ते महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल असतील. राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून…
लेखक दैनिक आपलं महानगर चे माजी निवासी संपादक आहेत रविवार विशेष | प्रवीण पुरो गौतम अदानींच्या संपत्तीचा मामला आता प्रत्येकाचं घर घेरणारा ठरू लागला आहे. मी बुडेन पण तुम्हाला घेऊनच, या तयारीने अदानींच्या साम्राज्याला हादरे बसू लागले आहेत. जितक्या जलद वर जावं तितक्याच जलद गतीने खाली येण्याची क्रिया ही नैसर्गिक आहे. म्हणूनच अशियात श्रीमंती गाठण्यासाठी धिरुभाई अंबानींना 60 वर्षांचा काळ कामी घालावा लागला. 2014 मध्ये ज्या व्यक्तीची श्रीमंती जगात 120 क्रमांकावर होती ते मोदी सत्तेच्या आठ वर्षात दुसर्या क्रमांकावर पोहोचत असेल तर संशयाला बाधा उत्पन्न होणारच. अदानींच्या या श्रीमंतीचं राज काय, असा प्रश्न कोणी विचारला आणि पंतप्रधान तोंडाचा चंबू करून…
