Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई आपल्या पहिल्याच भाषणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बोट ठेवले. चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना त्यांनी काही त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्याची सरकारला विनंती केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना तांबे म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ७५ हजार पदांसाठीच्या नोकरभरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र ती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याबद्दल कुठेही उल्लेख नव्हता. ‘शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होताना दिसत नाही. २ लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहे. मात्र ७५ हजार जागांच्या भरतीने किती युवकांना न्याय मिळणार आहे? सरकारला विनंती आहे की कोविड काळात विद्यार्थी परीक्षा देऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापूस, भाजीपाला उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. ज्या-ज्या वेळेस शेतकरी अडचणी आला त्या-त्या वेळेस सरकारने मदत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीबाबतचे स्पष्ट धोरण सरकारने त्वरित जाहीर करावे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना आमदार थोरात म्हणाले, भाजीपाला, कापूस, सोयाबीनसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. नाशिकसह इतर तालुक्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कांदा पिकासाठी उत्पादनासाठी खर्च ही मोठा आहे. यामुळे सध्या मातीमोल परिस्थिती निर्माण झाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्रामध्ये पुण्यात कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने एक जागा गमावली असताना दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पक्षाने महाराष्ट्राबाहेर नागालँडमध्ये भरारी घेतली आहे. आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन उमेदवार नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्रात एकही आमदार नाही. तरी देखील राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेल्या आठवले यांनी आपल्या पक्षाचे नागालँडमध्ये खाते खोलले आहे. आठवले गटाचे थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आठवले यांची पुन्हा एकदा सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असताना चिंचवडमध्ये मात्र महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला मोठे यश मिळविता आले. चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तब्बल ३६०९१ मतांनी विजयी झाल्या आहेत. कसबा पेठ मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील उमेदवार न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. याचा मोठा फटका भाजपला बसला असताना चिंचवड मध्ये मात्र भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड मधून निवडणूक लढविण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाची प्रभावी अंमलबजावणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाली असून संगमनेर तालुक्यातील आश्वी मधील ३१ गावामधील नोंदणीकृत ५ हजार ९१६ बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. असंघटीत कामगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ३२ विविध योजनांची सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इमारत व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना महत्वपूर्ण मानली जाते. ग्रामीण भागातील इमारत व बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली असून शिर्डी मतदार संघाने यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 प्रमाणे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार हे पाथरे बुद्रुक ता. सिन्नर जि. नाशिक येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत वसुली विभागात काम करतात. थकीत कर्जदारांवर संस्थेमार्फत कलम 101 प्रमाणे कारवाई करण्यासाठी सहकार विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. सिन्नरच्या सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एकनाथ प्रताप पाटील यांनी या प्रमाणपत्रासाठी एका नोटीस करिता प्रत्येकी दीड हजार रुपयांची मागणी केली होती. सतरा नोटीस करिता पाटील यांनी पंचवीस हजार पाचशे…
महाराष्ट्र संवाद न्यूज जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यासमोर आज अनेक अडचणी उभ्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी उद्योजक धार्जिन्या सरकारने पुढाकार घ्यावा. वीज जोडण्या तोडू नये, कांद्याला भाव वाढ मिळावी, महागाई कमी करावी आदी मागण्यासाठी शनिवारी (४ मार्च) काँग्रेसच्यावतीने बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे व तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी दिली. शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे म्हणाले, शनिवारी सकाळी नऊ वाजता हे आंदोलन होणार आहे. देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी असून सरकारकडून शेतकऱ्यांना काहीही दिले जात नाही. उलट उद्योजकांना कोट्यावधी रुपयांची माफी दिली जाते. उन्हाळ्याचे दिवस…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. धंगेकर यांच्या रूपाने काँग्रेसने १९९२ नंतर म्हणजेच तब्बल २८ वर्षानंतर भाजपकडून ही जागा पुन्हा ताब्यात मिळविली आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११,०४० मतांनी पराभव केला आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. मतमोजणीत मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीत पहिल्या फेरीपासून आपली आघाडी कायम ठेवली होती. धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसत आहे. कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लागली. निवडणुकीत टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी लोकसभा निवडणुकीत यावेळी निवडून येणारा खासदार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच असेल, अशी ग्वाही शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शिवगर्जना अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातदेखील शिवगर्जना अभियानास सुरुवात करण्यात आली. संगमनेरमध्ये व्यापारी असोसिएशनच्या सभागृहात बुधवारी झालेल्या शिवगर्जना अभियानावेळी घोलप बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विनोद कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, युवा सेनेचे साईनाथ दुर्गे आदी पदाधिकाऱ्यांसह संगमनेर-अकोलेतील शिवसैनिक, गटप्रमुख,…
महाराष्ट्र संवाद न्यूज आई आणि तिच्या दोन तरुण मुलींनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील मन्याळे येथे समोर आला आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे अकोले तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. सुनिता अनिल जाधव (वय 48 वर्ष), प्राजक्ता अनिल जाधव (वय 22 वर्ष) आणि शितल अनिल जाधव (वय 19 वर्ष) अशी दुर्दैवी माय लेकींची नावे आहे. सुनिता जाधव यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मुली प्राजक्ता आणि शितल या दोघी बहिणींनी गावातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिघी मायलेकींनी आत्महत्या कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेव्हा विच्छेदनानंतर तसेच पोलीस तपासात ही माहिती पुढे…
