Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज टपाल विभागाच्या दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेत राज्य पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे निवडले गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेर मधील विविध शाळांचे आहेत, अशी माहिती श्रीरामपूर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर व संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नक्ष चंद्रकांत खामकर (इयत्ता सहावी), स्वामिनी संदीप चव्हाण (इयत्ता सातवी), प्रज्योत प्रदीप शेळके (इयत्ता नववी), मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयातील श्रद्धा विलास ताजने (इयत्ता आठवी), सुमित महेश देशमुख (इयत्ता आठवी), तनिष्क संतोष दिवे (इयत्ता नववी), अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमधून समरजीत विश्वास वाघ (इयत्ता सातवी), दिव्याल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यभरात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंचपदासह सदस्य निवडीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार वेबसाईट मध्ये खंडितपणा येत असल्याची दखल आयोगाने घेतली असून पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षक, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने (दि. ०९/११/२०२२) च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलेला असून या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज हळूहळू सगळेच राज्य समान नागरी कायदा लागू करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील यासाठी योग्य वेळी विचार करू, असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, उत्तराखंडमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हिमाचल आणि गुजरात देखील करणार आहे. मला वाटतं हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. मात्र आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो, असेदेखील ते म्हणाले. संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी रायतेवाडीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना आढळून आला होता. राज्यात प्रतिबंधित असलेली दारू नामांकित कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे वितरण केले जात असल्याचे समोर आल्यानंतर संगमनेर आणि अकोल्यातील परमिट रूमवर कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सील केलेले हे परमिट रूम पुन्हा चालू झाल्याने दारूबंदी समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. रायतेवाडी येथील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून एका घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेले गोवा आणि दमण येथील दारू आढळून आली होती. घरगुती पद्धतीने नामांकित कंपन्यांच्या बॉटलमध्ये या दारूचे रिफिलिंग केले जात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नगर जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 13 डिसेंबर पर्यंत हे जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेत हे आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या-लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रस्त्यातील खड्ड्यांपाठोपाठ आता भाजपने क्रीडा संकुलाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाचे नांव बदलून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ असे केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी दिली. जहागिरदार म्हणाले, संगमनेर नगरपालिकेत ३० वर्षांपासून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखाली कॉग्रेसची सत्ता आहे. त्यावेळी मोठा गाजावाजा करत नगरपालिकेने सुमारे पाच एकर परिसरामध्ये क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. संगमनेर नगरपालिकेचे क्रीडा संकुल ही शासकीय मालमत्ता आहे.…

Read More

अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे प्रकल्प हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हितकारक असलेल्या या प्रकल्पाच्या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही त्यामुळे हे काम निर्धारित वेळेत व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात निळवंडे प्रकल्प कामकाज आणि गौण खनिज या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अधीक्षक अभियंता अरुण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतात सध्या महापुरुषांचे विभाजन सुरू आहे. संबंध मानव जातीसाठी जात, धर्म, प्रांताच्या पुढे जाऊन ज्या महामानवांनी काम केलं त्यांना एका चौकटीत बसवू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अर्शद शेख यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सभागृहात भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अब्दुल्ला हसन चौधरी, सुखदेव इल्हे, श्रीनिवास पगडाल, कारभारी देव्हारे, माजी नगरसेवक डॉ. दानिश खान, जावेद युनूस शेख, मुजाहिद पठाण, जाविद शब्बीर शेख, माजी गटविकास अधिकारी बी. डी. पारखे आदी उपस्थित होते. शेख म्हणाले, जोपर्यंत शिक्षण माणसाला माणूस बनवत…

Read More

अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या २७ शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपकरणाने यश मिळविले आहे. या उपकरणाची विभागीय पातळीवर होणाऱ्या तंत्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती अकोले आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचे उद्योजक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कृषी, पारंपारिक ऊर्जा, पाणीबचत, फॅशन, खाद्यपदार्थ, यांत्रिक मॉडेल्स यावर आधारित जवळपास ७०…

Read More

मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात दुसऱ्या महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडल्या प्रकरणी एका 38 वर्षीय महिला आरोपीला मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरविले आहे. त्याशिवाय विनयभंग प्रकरणी एखादी महिलाही दोषी ठरू शकते असे स्पष्ट करत त्या महिलेला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एक वर्ष कारवासाच्या शिक्षेसह या महिलेला सहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. आरोपी आणि तक्रारदार महिला दोघीही एकमेका शेजारी राहत असून या महिलांच्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये अनेक वर्षांपासून वादविवाद आणि भांडण होत असे. दोन वर्षांपूर्वी आपसात झालेल्या भांडणांमध्ये आरोपी महिलेने तक्रारदार महिलेवर आधी चप्पल फेकली. त्यानंतर चप्पलने तिला मारहाण केली.…

Read More