Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड गदारोळात आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा ठपका ठेवला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना महायुती सरकारवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही फसवणूक केली आहे, असे थोरात म्हणाले. थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.…

Read More

अहिल्यानगर, दि. २५ जुलै:  शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलले आहे. त्यांनी शालेय बस आणि इतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि चंद्रकांत खेमनर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शालेय बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनामध्ये सीसीटीव्ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्य नगर मधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या घरावर मंगळवारी पहाटे काही ओळखीच्या लोकांसह १०-१२ लोकांनी सशस्त्र हल्ला करत वैष्णव मूर्तडक याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हल्ले पोरांनी घराच्या पॅसेजमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले.  या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना अर्थसाहाय्य यासह विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी (२४ जुलै) होणाऱ्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देताना, थोरात यांनी महायुती सरकारवर विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना १५०० रुपयेही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासनही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  अहिल्यानगर:  या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तब्बल दीड कोटीचा ऑनलाईन लाच प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचे पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याच्या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच आहेर यांची देखील आता तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आहेर यांच्या बदलीमागे देखील याच प्रकरणाचा वास असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. दरम्यान आहेर यांच्या जागी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  १४० वर्षांपासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संगमनेर येथील सर डी.एम. पेटीट विद्यालयाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. उद्योजक आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) कैलास सोमाणी यांनी या प्रयत्नांचे नेतृत्व करत, माजी विद्यार्थ्यांकडून यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या एकोप्याने पेटिट विद्यालयाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात, सर डी.एम. पेटीट विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तूंचे वाटप माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्राचार्य चौधरी, माजी प्राचार्य रामनाथ जगताप, श्रीकांत अरगडे, वनम सर, राधेश्याम राठी आदी मान्यवर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहाता: कर्जमाफी, सातबारा कोरा, पीक विमा आणि वीजबिल माफीसारख्या अनेक समस्यांनी त्रस्त झालेले राहाता तालुक्यातील शेतकरी आता शासनाच्या उदासीन धोरणांविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. गुरुवारी (२४ जुलै) सकाळी १० वाजता राहाता येथे भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे करणार असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा विरभद्र मंदिर, राहाता येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, राहाता येथे पोहोचेल. तेथे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर विविध नेत्यांची भाषणे होणार आहेत आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अकोले:  अकोले तालुक्यातील तिरडे येथील एका आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक, त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि एका शिपायाविरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहत असताना, हा प्रकार घडला. जेव्हा ती आठवीत होती, तेव्हापासूनच धुपेकर नावाचा शिक्षक (पूर्ण नाव उपलब्ध नाही) तासिका संपल्यानंतर वर्गात येऊन तिच्या आणि तिच्या मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे. एका जेवणाच्या सुट्टीत धुपेकर वर्गात आले आणि पीडित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  राज्यभरात महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ (तुकडेजोड तुकडेबंदी कायदा) या कायद्याचा सर्रास भंग होत असताना, एकट्या संगमनेर तालुक्यात ११ तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने महसूल विभागात तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात बेकायदेशीर तुकड्यांचे नियमितीकरण करून शासनाला २ कोटींहून अधिक महसूल मिळवून दिला असताना, कौतुकाऐवजी निलंबनाची शिक्षा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिलेल्या उत्तराने या प्रकरणाला अधिक धार दिली आहे. त्यांनी मान्य केले की, सर्वच मतदारसंघात शेतजमिनीच्या तुकड्यांचा प्रश्न गंभीर आहे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमध्ये सातत्याने वैद्यकीय व्यवसायाला गालबोट लावणाऱ्या घटना समोर येत आहेत. कोणी विनयभंगाच्या, तर कोणी बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी चर्चेत असतानाच पुन्हा एकदा डॉक्टरांकडून विनयभंगाचा प्रकार समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (22 जुलै) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कुरण येथील डॉ. इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये घडली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला मागील दोन दिवसांपासून टॉन्सिल्सच्या त्रासाने त्रस्त होती. उपचारासाठी ती आपल्या मुलासोबत डॉ. राहुल इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी महिलेचा मुलगा क्लिनिकच्या बाहेर…

Read More