Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील 17000 शाळा बंद होण्याची चिन्हे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून या विरोधात छात्र भारतीने राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी संगमनेरमध्ये शंभर एसटी बसेसला सरकारच्या निषेधाचे पोस्टर चिटकविण्यात आले आहे.दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने सरकारी शाळांना प्राधान्य देत या शाळांचा लौकिक जगभरात पोहोचविला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने सरकारी शाळांना टाळे लावण्याचे धोरण अवलंबिले आहे. एकाच देशातील शिक्षणाचे हे चित्र विदारक आहे. कमी पट संख्येच्या राज्यभरातील जवळपास 17000 मराठी शाळांवर सरकारच्या या निर्णयामुळे गंडांतर येणार आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : नासिकच्या औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका परिसरात मिरची चौकामध्ये शनिवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस यवतमाळहुन मुंबईकडे चालली होती. मात्र शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही बस नांदूर नाक्याजवळ मिरची चौकात आल्यानंतर चौफुलीवर एका टँकरला धडकली आणि अपघातानंतर लगेचच चिंतामणी ट्रॅव्हल्स या बसने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे तीन-चार वाहने तसेच चार-पाच रुग्णवाहिका झाल्या होत्या. पेटलेली अपघातग्रस्त बस विजविण्याचा अर्धा तासाहून अधिक वेळ प्रयत्न सुरू होता. आग एवढी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील दोघा व अकोले तालुक्यातील एका सराईत गुन्हेगारांस प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी एक वर्षाकरिता हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली आहे. रमेश संतू पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकण (रा. धांदरफळ खुर्द, संगमनेर) आणि ऋतिक किसन बांडे (रा. खडकी ता. अकोले) अशी या हद्दपार केलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत. अकोले आणि संगमनेर तालुका पोलिसांकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे या आरोपी विरोधातील हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते. मंगरूळ यांनी तीनही गुन्हेगारांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे धरण आणि कालव्यासाठी अविश्रांत श्रम केल्यानेच ही कामे आज मार्गी लागली आहेत. ती आता कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो, मात्र या कामात तुमचे योगदान काय, समन्यायी पाणी वाटपावर होतात आम्ही संघर्ष करत असताना तुम्ही गप्प का होतात, असा थेट सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्र्यांना नाव न घेता केला आहे. तालुक्यातील तळेगाव दिघे येथे विविध विकास कामांची उद्घाटने माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. संगमनेरच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अन्न औषध प्रशासनाने नाशिकरोड भागात केलेल्या तब्बल १८ लाख रुपयांचा मिक्स गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने ज्या गोडावूनवर छापा टाकला तेथून अनेक पानटपऱ्यासह दुकानांमध्ये गुटखा पोहचविला जात असल्याचा अंदाज आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिक रोडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोडावूनवर छापा टाकला असता त्यांना तेथे ३ लाख ६१ हजार ५७० रुपयांचा वैधानिक इशारा नसलेला सिगारेटचा साठा आढळून आला. हा माल ताब्यात घेत गोडावून सील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयात वाद विवाद सुरु असतांना दसरा मेळाव्यासाठीही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतांना बीकेसीत शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी चालविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीची ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. लोंढे म्हणाले, शिंदे गट राज्याच्या विविध भागातून एसटी व खासगी बसेसमधून कार्यकर्ते आणत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे दहा कोटी रुपये भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले, असे वृत्त माध्यमातुन समजले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटना आक्रमक झाली आहे. मराठी शाळा ह्या गोरगरीब जनतेच्या आहेत, त्या कोणाच्या बापाच्या नाहीत असे ठणकावत छात्रभारतीने या निर्णयाचे पत्रक फाडून टाकत आणि संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला आहे. कमी पटसंस्थेच्या राज्यातील सतरा हजारापेक्षा अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह आहे, शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून १७३४ जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी दिली. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राबविण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतून मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. असे प्रतिपादन दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. हेमलता राठोड आदी उपस्थित…
