Author: अनंत पांगारकर
वाचन प्रेरणा दिन विशेष प्रशासकीय कामांच्या रहाटगाड्यात अनेक अधिकारी वेळात वेळ काढून आपला वाचन छंद जोपासत आहेत. “शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. मनाला स्थिर, सजग ठेवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासणंही गरजेचं आहे. वाचनाने जीवनाप्रती सजगता येऊन कामात सकारात्मकता येते. दैंनदिन कामात ऊर्जा येते. निर्णय प्रक्रियेत गतिमानता येते”, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आजपर्यंत केलेले वाचन, सध्या वाचन असलेले पुस्तक व एकूण वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याचा शिर्डी माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी…
रविवार विशेष :- २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांची देशासह जगाकरिता अतिशय अडचणीचे वर्ष म्हणून इतिहास नोंद घेईल, नव्हे तर या शतकातील सर्वात अडचणीचे वर्ष म्हणून संबोधले जाईल चर्चा होती. केवळ ‘करोना’ या गंभीर आजाराच्या साथीबाबत एका बाजूला असे चित्र निर्माण झाले की जणू काही आता जगाचे विकासाचे चाक थांबणार मात्र हेच वर्ष संगमनेर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. या काळात करोनाची तीव्र लाट असतानाही पुणे-नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वेची घोषणा करीत त्यासाठी लागणाऱ्या निधीची महाराष्ट्र सरकारने तरतूद केली. हा प्रकल्प सुमारे सोळा हजार कोटींचा असून तो २२० किलोमीटर लांबीचा असून हा रेल्वेचा मार्ग पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून जात आहे यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज पठार भागातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथील मृत झालेल्या चार भावडांच्या कुटूंबियांचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत या कुटूंबियांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्यावतीने त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे विजेचा धक्का बसून चार भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात येताच बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जि. प. सभापती मीरा शेटे, जि. प. सदस्य अजय फटांगरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्वामी समर्थ मंदीर ते साई मंदिरादरम्यान म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाची कॉग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पुल दुरुस्त करण्यासंदर्भात संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भोजापुर धरण भरल्यानंतर म्हाळूंगी नदीला सातत्याने पाणी आहे. साईनगर, घोडेकरमळा या दोन भागांना जोडणारे म्हाळुंगी नदीवरील दोन्ही रस्ते बंद झाल्याने या भागातील नागरिकांना दुरच्या रस्त्याचा शहरात येण्यासाठी वापर करावा लागत आहे. म्हाळुंगीला असलेल्या पाण्यामुळे दोन दिवसांपूर्वी हा पूल खचला. पुलावर असणाऱ्या आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनदेखील तुटल्याने नगरपरिषदेने त्याची दुरुस्ती तातडीने केली. मात्र खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीला वेळ लागणार असल्याने हा पुल पादचाऱ्यांसह सर्वच…
महाराष्ट्र संवाद न्यूज “भुजबळ साहेबांना शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता. आता एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपचे पाप ?. जंतराव….निदान न कळणारी लबाडी तरी करा” अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटद्वारे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात सत्ताबदल झाला पण त्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधी यांची एकमेकांवर टोलेबाजी सुरूच आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे–फडणवीस यांचे सरकार आले एवढ्या मोठया सत्ता बदलानंतर आता अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही, या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप…
महाराष्ट्र संवाद न्यूज बहुचर्चित ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे तातडीने डिसेंबर अखेर पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत निळवंडे कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीसाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज सहकाराला दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी १६ ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते होत आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, तर अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेला हा कारखाना आज राज्यात आणि देशभरात सहकारी चळवळीचा मापदंड ठरला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण केली आहे. दिवंगत भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले असले तरी संगमनेरात गेल्या काही महिन्यात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या संगमनेर तालुक्यातील जनसेवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत ३४४ प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांमध्ये लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणारी ५०२ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३४४ प्रकरणे तहसीलदारांनी मंजूर केली. उर्वरित प्रकरणांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या. त्यामुळे या त्रुटी दूर करून ही प्रकरणी पुन्हा नव्याने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक दुचाकी चोऱ्या आणि प्रवाशांना लुटण्याचे प्रकार संगमनेरमध्ये सर्रासपणे घडत आहेत. येथील बस स्थानकामधून आरोपींना कुठेही तातडीने निघून जाता येते, त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी बसस्थानकामधील पोलीस चौकी पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातून भर रस्त्यावर तसेच बस स्थानक परिसरात लावलेल्या दुचाकींच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकींचा चोऱ्या करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले असल्याचे दिसते. बस स्थानकाचा परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व जास्त प्रमाणात मुलींना शहरी भागातील टपोरी मुले नाहक त्रास देण्याचे काम करत असतात. मग ती मुलींची छेडछाड…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज एकीकडे चेंबूर पोट निवडणुकीचा विषय राज्यभर चर्चिला जात आहे. तर दुसरीकडे येत्या १७ ऑक्टोबरला होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात या निवडणुकीसाठी सतरा मतदार पात्र असून त्यापैकी सर्वाधिक पाच मतदार संगमनेरमधील आहे. तब्बल २२ वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात चुरशीची लढत होत असून या निवडणुकीपासून गांधी परिवार प्रथमतः दूर राहिला आहे. अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अचानकपणे निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने खर्गे आणि थरूर यांच्यात सरळ लढत होत आहे. यामुळे यावेळी काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा…
