Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहे. अशावेळी राज्य सरकार महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आणून मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचे सांगत आहे. तुम्ही भरती करणार असाल तर किती प्रकल्प राज्यात येणार आहे. आणि किती भरती करणार आहात. याची माहिती राज्याला द्या, असे जाहीर आव्हान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या शिबिराला शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात शिर्डीमध्ये प्रारंभ झाला. तत्पूर्वी पवार माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, “आम्ही पण बरीच वर्षे सरकारमध्ये काम करत आहोत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना आम्ही…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर नजीकच्या हिवरगांव पावसा येथील टोल प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामूळे आत्तापर्यत अनेक अपघात झाले. यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांचा मृत्यू झाला तरी टोल प्रशासन आपल्या कारभारात सुधारणा करावयास तयार नाही. टोल वसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोल प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली आरपारच्या लढाईच्या इशारा देत शुक्रवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.टोल प्रशासनाच्या विरोधात आत्तापर्यत सर्वच पक्षांनी आंदोलने केली, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याशिवाय ठोस अशी कोणतीही कृती टोल प्रशासनाने केलेली नाही. स्थानिक नागरिकांनादेखील टोल…

Read More

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील घटना महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आईवडीलांच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याला त्यांच्या कुशीतून ओढत त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. चिमुरड्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्यामुळे जाग्या झालेल्या आईवडीलांनी बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली असली तरी या घटनेत चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्याला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. विरु अजय पवार असे या चिमुरड्याचे नांव आहे. सध्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु आहे. यासाठी संगमनेर तालुक्यात काही ऊसतोडणी कामगार आले आहेत. थोरात कारखान्याच्या ऊसतोडणीशी संबधीत असलेले २० मजुरांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रमध्ये प्रवेश करणार असून लोकशाहीच्या विचारांना ताकद देणाऱ्या या यात्रेचे देगलूरमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. महाराष्ट्रात या यात्रेचा प्रवास 381 किलोमीटरचा राहणार असून या दरम्यान दोन भव्य सभा देखील होणार आहेत. याबद्दलची उपरेषा माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. नांदेड ते बुलढाणा दरम्यान 14 ठिकाणी या यात्रेचा मुक्काम राहणार असून 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पहिल्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीतील एका अधिवेशननंतर सरकार पडले होते आता आमच्या अधिवेशनानंतर देखील शिंदे फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे असे आम्ही स्नेही खासदार सुजय विखे पाटील यांना शिर्डीत जाऊन सांगणार आहोत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व पाच नोव्हेंबर रोजी ‘राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा’ हे शिबिर होत आहे. या राज्यव्यापी शिबिरासाठी आजी-माजी आमदार खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पत्र वाघ यांना दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणे, महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे यामुळे त्या भाजपच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी निवड करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविल्याचे मानले जाते. याआधी महिला प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे काम पाहत होत्या मात्र त्या विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर या जागेवर आता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले असून याद्वारे भविष्यात राज्यात अगणित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या अंतर्गत ७५ हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. यावेळी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. काही प्रकल्प लवकरच सुरू होतील. महाराष्ट्रात केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ हजार कोटी आणि रस्त्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली आणि पंतप्रधानांचे होमपीच असलेली गुजरातची निवडणूक अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. १८२ जागांसाठी दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबरला निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल हिमाचल प्रदेश सोबत म्हणजेच ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दिल्लीत एका पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या तारखा आज दुपारी जाहीर केल्या आहेत. एक आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होत असून हिमाचल आणि गुजरातची मतमोजणी एकाच दिवशी ८ डिसेंबरला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संस्थेच्या इमारतीच्या वॉटर प्रूफिंग आणि कोबा करण्याच्या नियोजित कामात ठेकेदाराकडून तीस हजार रुपयांचे लाच घेताना आयटीआयच्या प्राचार्याला नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलगदपणे सापळ्यात पकडले आहे. नासिकरोड पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेला निलेश बबन ठाकूर हा सिन्नरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) प्राचार्य आणि सचिव आहे. एसीबीच्या माहितीनुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग आणि कोबा करण्याचे काम नियोजित होते. ११ लाख ५१ हजार रुपयांना या कामाचा ठेका एका कंत्राटदाराला देण्यात आला होता. या कंत्राटदाराकडे प्राचार्य ठाकूर याने तीन टक्के रक्कम लाच म्हणून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकारास, “भारत माता ही विधवा नाही त्यामुळे तू आधी कुंकू लाव मगच मी तुझ्याशी बोलतो”, अशा शब्दात महिला पत्रकाराशी वादग्रस्त विधान करत संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करत चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा महिला पत्रकाराशी बोलताना केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांच्या या विधानामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात आले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटी संदर्भात संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी बोलण्याकरता एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी…

Read More