Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टारसह बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘इंदिरा पर्व’ अत्यंत महत्त्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच त्यांनी बलिदान दिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांनी केले आहे. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित स्व. इंदिरा व सरदार पटेल यांना अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सौ. ललिताताई सबनीस, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, कार्यकारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. या मध्यस्थीनंतर आमदार राणा यांनी आपला आरोप मागे घेतला तर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामुळे बच्चू कडू यांची वेगळीच भूमिका समोर आली असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या घटक पक्षांमधील दोघा आमदारांमधील वाद ५० खोक्यांच्या आरोपावरून विकोपाला गेला होता. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत पोहोचणाऱ्या या वादात ऐनवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उडी घेत मध्यस्थी केली. राणा आणि कडू या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलाविले होते.…
विद्याचंद्र सातपुते महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पिढीजात फुलशेती करत असले तरी सध्या वाढती मागणी आणि बदलते तंत्रज्ञानामुळे पारंपरिक फुलांसह नानाविध फुले शेतात बहरु लागली आहेत. पारनेर तालुक्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी अशाच शेवंती फुलांची लागवड करुन फुलशेतीत वेगळी वाट शोधली आहे. शेवंती फुलशेतीतून साठे यांना अवघ्या पाच महिन्यात खर्च वजा जाता तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेती हंगामी व पावसावर अवलंबून असून, बहुतेक क्षेत्र कोरडवाहू आहे. तालुक्यातील हंगा हे गाव भौगोलिक दृष्ट्या आकाराने व क्षेत्रफळाने मोठे आहे. याच गावात पारंपरिक शेती करताना नितीन साठे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नूतनीकरण करत पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेला गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील केबल सस्पेन्शन ब्रिज कोसळल्याने आतापर्यंत साठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी पुलावरून ये-जा करणारे सुमारे चारशे लोक नदीपात्रात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतामध्ये दहाहून अधिक बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर जवळपास शंभरहून अधिक लोकांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गुजरात सरकारमधील मंत्री ब्रजेश मेरजा घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल देखील घटनास्थळी भेट देण्यास निघाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून बंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क टाटा एअरबससह चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. त्या पाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प देखील हैदराबादला गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात मोठा प्रकल्प येईल असा लॉलीपॉप दाखविला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी सुळे बोलत होत्या. पुढच्या वेळी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल, असा लॉलीपॉप दाखविला जात आहे. मी तर म्हणते की, सगळेच प्रकल्प राज्यात यायला हवेत. मात्र राज्यात ईडी सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे प्रकल्प येथून राज्याबाहेर जात आहे. हे सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाचे खापर महाविकास…
आमच्या सुरक्षिततेची काळजी जनतेला, जनता आमचे रक्षण करेल : काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेत्यांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढली, काही हरकत नाही. आमच्या सुरक्षिततेची काळजी जनतेला आहे. जनता आमचे रक्षण करेल, असे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पुढील महिन्यात खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ राज्यात प्रवेश करत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेगावमध्ये आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकारणाच्या घसरत्या पातळी बद्दल खंत बोलून दाखवत राज्य सरकारवर हल्ला चढविला. राज्य सरकारने बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आदी राज्यातील पंधरा बड्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली यावर त्यांना छेडले असता त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ५० खोक्यांच्या आरोपावरून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा या सत्ताधारी घटक पक्षातील दोन नेत्यांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार आहेत. त्यासाठी त्यांनी या दोन्ही आमदारांना मुंबईत दुपारी तीन वाजता बोलावून घेतले आहे. मुख्यमंत्री शिंदे या दोन नेत्यांमधील वादात नेमका काय तोडगा काढतात याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील मोठ्या बंडखोरी नंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये होते. यावेळी आमदार फोडाफोडीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा राज्यात सर्वत्र असताना भाजपाशी सलगी असलेले आमदार रवी राणा यांनी देखील बच्चू…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमच्या पक्षाचे राजकुमार पटेल हे सर्वप्रथम गुवाहाटीला गेले होते. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो. तेथे मी शिंदे गटासोबत आहे एवढे त्यांच्याशी बोलून परत यायचं होतं, असे ठरले होते. खरंतर मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. राजकारणात ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. आमदार कडू एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कडू यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील, उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर जितके मजबूत आणि शोभून दिसायचे तितके…
रविवार विशेष : प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत.) “ राज्याच्या राजकारणात कटुता आल्याची जाहीर कबुली देत राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च आत्मपरीक्षणाची जागा निर्माण केली आहे. त्यांनी स्वत:च हे जाहीरपणे मान्य केलं हे बरं झालं. कारण राज्यात राजकीय कटूता निर्माण करण्यात त्यांचाच हात होता, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. संसदीय राजकारणात देशात प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या टोकाचा कडवटपणा आजवर कोणी पाहिला नाही. दाद मागण्याच्या व्यासपीठावर एकमेकांवर टीका करणारे त्या व्यासपीठावरून खाली आले की मागचं सारं विसरून जायचे. कारण त्यांच्या टीकाटिपण्णीत स्वार्थ आणि मतलबीपणा नसायचा. केवळ राज्याचं भलं चिंतण्याचीच त्यामागे तळमळ असायची.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वाळू तस्करी करणारा डंपर पकडल्यानंतर त्याची माहिती मिळूनदेखील कारवाई न करता उलट तस्करांबरोबर संधान साधणाऱ्या धांदरफळचे तलाठी मुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनसेवा समता युवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव वलवे यांनी करताच प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने वलवे यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार अमोल निकम यांना तलाठी मुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना यासंदर्भात वलवे यांनी शुक्रवारी एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले की, वलवे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गावी जात होते. यावेळी ६ वाजून ४० मिनीटांनी त्यांना भोकनळ वस्तीपासून धांदरफळकडे वाळू तस्करी करणारा एक डंपर जातांना दिसला. त्यांनी याची माहिती प्रांताधिकारी डॉ.…
