Author: अनंत पांगारकर

गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी २६ जूनला मतदान होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या मतदान केंद्रातून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात वीस मतदान केंद्र निर्माण करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे. सर्वाधिक प्रत्येकी तीन-तीन मतदान केंद्र संगमनेर आणि अहमदनगरमध्ये आहेत. या मतदान केंद्रात सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान पार पाडणार आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजपाचे विवेक कोल्हे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांचे अर्ज कायम राहिल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे बघावयास मिळाले. कोल्हे…

Read More

गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार व नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या भावजय सुनेत्रा पवार यांची शुक्रवारी राज्यसभेवर अजित पवार गटाकडून बिनविरोध निवड झाली. यामुळे आता बारामतीच्या नणंद-भावजयीची जोडी एकाच वेळी राजकारणात दिसणार आहे. नणंद सुप्रिया सुळे लोकसभेत तर भावजय सुनेत्रा पवार राज्यसभेत दिसणार आहे. महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून अजित पवार गटाचा सुनेत्रा पवार यांनी आज दुपारी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. परंतु, ३ वाजेपर्यंत सुनेत्रा पवारांशिवाय कोणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध झाली. सुमित्रा पवार…

Read More

गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शनिवारपासून उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतल आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यांनी केली मध्यस्थी… महायुती सरकारमधील मंत्री शंभूराजे देसाई, राणा जगजीतसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी गुरुवारी जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषणार्थ जरांगे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती…

Read More

गुरुवार दिनांक १३ जून २०२४ नाशिक शिक्षक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर झाली आहे. नाशिकच्या जागेसाठी तब्बल २१ उमेदवार मैदानात उतरले आहे. त्यातच महायुतीत अजित पवार गटाकडून बंडखोरी झाल्याने आता ही निवडणूक चौरंगी बनली आहे. महायुती सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माघारीच्या अंतिम दिवशी नाशिकमध्ये येऊन विनंती केल्यानंतर त्यांचे बंधू प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. याच दरम्यान काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजप इच्छुक धनराज विसपुते यांनीही माघार घेतली. मात्र अजीत पवार गटाचे महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीत बंडखोरीचे वारे कायम आहे. असे असले तरी नाशिकमध्ये शिंदे सेनेचे किशोर दराडे,…

Read More

गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ संगमनेरच्या उपनगरातील मालदाड रोडवरील रहिवासी असलेला तरुण महेश अरुण पडघलमल (वय ३४ वर्षे) हा गाडीवर क्लीनर म्हणून गुजरातमध्ये गेला. तो अंकलेश्वर येथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्या कुटुंबीयांनी अंकलेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. सात दिवसांचा कालावधी उलटून देखील अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. महेश पडघलमल हा मालवाहतूक गाडीवर क्लीनर म्हणून काम करत असून सोमनाथ माधव सातपुते याच्याबरोबर तो ३ जूनला गुजरातच्या अंकलेश्वर येथे गेला होता. मात्र पाच तारखेला तो बेपत्ता झाल्याची माहिती सोमनाथ सातपुते यांनी महेश पडघलमल याच्या घरी दूरध्वनी करून कळविली होती. त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने अंकलेश्वर येथे जात…

Read More

गुरुवार दिनांक १३ जून २०२४ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली इर्टिका कार सोडून देण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कैलास विश्वनाथ ठाकूर (वय ५६ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लाच लुचपत विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी, तक्रारदाराविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराची इर्टिका कार जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली कार सोडून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ठाकूर याने प्रथमत: पंधरा…

Read More

गुरुवार दिनांक १३ जून २०२४ वेतनश्रेणीच्या फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिकेला नगरच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. श्रीमती संगीता नंदलाल पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव आहे. नगरच्या श्रीरामपूरमध्ये लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हेडमास्तरला शेजारच्या बीड जिल्ह्यात पकडले होते त्या पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील मुख्याध्यापिकेवर लाचेची कारवाई झाली आहे. तक्रारदाराची पत्नी श्रीरामपूरच्या सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदरची शाळा अनुदानित असून तक्रारदाराच्या पत्नीला २०१५ ते २०२२ या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम…

Read More

गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ अहमदनगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे मात्र बियाण्यांची खताची साठेबाजी, लिंकिंग होत असेल तर शेतकऱ्यांनी १८००२३३४००० या मोफत टोल फ्री क्रमांकावर किंवा ९८२२४४६६५५ या मोबाईल क्रमांकावर नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करत तक्रार करण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बुधवारी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आशिष नवले यांच्यासह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निविष्ठांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग करत शेतकऱ्यांना अडचण…

Read More

बुधवार दिनांक १२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे चित्र अस्पष्ट झाले असून निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या मैदानात २१ उमेदवार राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. निवडणूक घडविण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरलेल्या डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना संधी देण्यात आली असून ॲड. संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. याशिवाय भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे अपक्ष…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई काश्मीर आणि मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्यानं घेणार माहिती नाही. आता तरी ते मणिपूरला जाणार का? मागील आठ दिवसात तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केलाय. याला जबाबदार कोण? जरी केंद्रात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असलं तरी काश्मीरमधील हल्ले काही थांबत नाहीत? काश्मीरमध्ये ३७० कलम काढल्यानंतरसुद्धा लोकांचे जीव जात आहेत. याकडे केंद्र सरकार गांभीर्यानं का बघत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मणिपूर मुद्यावर एक वर्षानंतर सरसंघचालक मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. एक वर्षानंतरही मणिपूर अजून धुमसतंय. परंतु केंद्राकडून यावर कोणताच तोडगा काढला जात नाही. मात्र…

Read More