Author: अनंत पांगारकर
रविवार, दि. २६ मे | अनंत पांगारकर खचल्यानंतर तब्बल दीड वर्ष नव्या निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजत गाजत केलेल्या भूमिपूजनानंतरही दीर्घकाळ रेंगाळलेला म्हाळुंगी नदीवरील पूल पाडण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारपासून खचलेला पूल पूर्णतः नामशेष करण्यास सुरुवात झाली. यामुळे दीर्घकाळ गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या संगमनेरकरांना नव्या पुलाच्या निर्मितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान खचलेला हा पूल गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता. पुलाचा विषय राजकीय श्रेयवादात अडकल्याने संगमनेरकर यातून भेटीला धरले गेले होते. यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटलेल्या संगमनेरकरांना अखेर न्याय मिळाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीमुळे केवळ हाच पूल…
संडे स्पेशल! पुण्यात झालेल्या ‘हिट अँड रन’ केसमध्ये एका बिल्डर व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने नशेत दीड ते दोन कोटी रुपयांच्या अतिशय महागड्या परदेशी बनावटीच्या कारने दोघांना चिरडले. त्यांचा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने अंत झाला. घटनेतील दोषीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोप असलेल्या बालगुन्हेगाराला (विधी संघर्षित बालक) ताब्यात घेऊन पोलिसांनी जुव्हेनाईल जस्टीस बोर्डासमोर हजर केले. त्याला बोर्डाच्या सदस्यांनी तात्काळ जामीन पुढील अटीवर दिला, अट ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची, १५ दिवस वाहतुकीचे धडे गिरवण्याची शिक्षा देऊन जामिनावर मोकळे केले. आरोपीला पोलिसांनी तसेच स्थानिक आमदारांनी मदत केली, असे आरोप करण्यात आले. ज्याने दोघांना चिरडलं, दोन कुटुंब उद्ध्वस्त केली, अशा प्रवृत्तीला ताब्यात घेतल्यावर…
ईडीच्या अधिकार्यांनी देशभर मांडलेल्या उच्छादाला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने चांगलंच उताणं पाडलंय. सत्ताधार्यांची मर्जी राखण्यासाठी लोकशाहीची उघड थट्टा उडवणार्या या विभागातल्या अधिकार्यांना आणि सत्तेसाठी निरपराधांवर खोटे गुन्हे लादणार्या सत्ताधार्यांच्या मस्तीला जमिनीवर आणणार्या सर्वोच्च न्यायालयाचे मानावेत तितके आभार कमी आहेत. असे निवाडे देताना संबंधितांच्या कृतीची चिकित्सा करण्याचं फर्मान न्यायालय काढतं. मात्र यावेळी ते निघाले नाहीत. ते निघाले असते तर गब्बर झालेल्या ईडी अधिकार्यांच्या लुटीचे सारे फेरे बाहेर आले असते. या विभागात आल्यापासून कोण किती श्रीमंत झाला ते जगापुढे आलं असतं. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याला धरून आला असल्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार्यांनी किती कमाई केली, याचा लेखाजोखा बाहेर आणला…
शनिवार, दि. २५ मे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रात्री यश आले असून उर्वरित दोघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. पथकाने पकडलेले चौघे आणि पळून गेलेले दोघे सराईत गुन्हेगार आहे. ओसवाल इंपिरियअल चव्हाण (वय २८ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), डेग विठ्ठल भोसले (वय २९ वर्षे, रा. आनंद चिखली, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), तुषार उर्फ नुटल्या इंपिरिअल भोसले (वय ३३ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), व नागेश रेजा काळे (वय २५ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता.…
१० हजार रुपयांची लाच भोवली; न्यायालयाने लाचखोर महिला अधिकाऱ्याला दिली ५ वर्षाची शिक्षा आणि केला दंड!
शनिवार, दि. २५ मे पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची घेणाऱ्या ग्रामसेवक महिलेला अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. लाचेचे हे प्रकरण २०१७ मध्ये बारामतीच्या पंचायत समिती कार्यालयात घडले होते. पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर करून देण्यासाठी सोनवडी-सुपेच्या (बारामती जि. पुणे) लोकसेवक ग्रामसेविका श्रीमती दिपाली जगन्नाथ कुतवळ (वय ३७ वर्ष) यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. लाच लुचपतच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी तपास करत बारामती न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. बारामतीच्या…
शनिवार, दि. २५ मे नगर शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी बडी मज्जित मुकुंद नगर परिसरात एक संशयित आल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयिताला पकडण्यासाठी या परिसरात लावलेल्या सापळ्यामध्ये दोघेजण पावणे दोन लाखाच्या मुद्देमालासह अलगद अडकले. त्यांच्या चौकशीत त्यांनी नगरच्या सावेडी, तारकपूर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख (वय ५४) व जिशान सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख वय २१, दोघे रा. नवीन विडी वसाहत, कुंभारी, जि. सोलापुर मुळ रा. कासीम बऱ्ही दर्गा, पढेगांव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. यातील सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख…
शुक्रवार, दि. २४ मे बुधवार-गुरुवारी दोन दिवसात अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्यांची संख्या सहावर गेली असताना संगमनेरमध्ये प्रवरा नदीपात्रात दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे. प्रवरा नदीचे या वेळचे आवर्तन अनेकांच्या जीवावर बेतले आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत असताना नदीपात्रात आंघोळीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र नदीपात्रात वाळू तस्करांनी केलेल्या मोठमोठ्या खोल खड्ड्यामुळे पाण्याचा पोहणाऱ्यांना अंदाज येत नदीपात्रात वाळू तस्करांनी खोदलेले हे खड्डे नागरिकांसाठी मात्र जीव घेणे ठरत आहे. वाळू तस्करी थांबविण्यात अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत कोणालाही यश आले नसल्याने तालुक्यातील सर्वच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरूच आहे. सुगावमधील शोध कार्य…
शुक्रवार, दि. २४ मे दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याला आज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आता या घोटाळ्याच्या अनुषंगाने काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. दूधगंगा पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रमुख आरोपी असलेला कुटे पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व…
शुक्रवार, दि. २४ मे लोकसभा निवडणुकीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या आणि नंतर पुढे ढकलण्यात आलेल्या दोन शिक्षक व दोन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून आता या निवडणुका २६ जूनला होणार आहे तर १ जुलैला मतमोजणी होईल. विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदारांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या जागांसाठी निवडणूक होत आहे. यापूर्वी या जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती मात्र शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीचे कारण देत तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. असा आहे…
गुरुवार, दि. २३ मे अकोले तालुक्यातील सुगावमध्ये पाण्यात बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळ्याहून बोलवण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहीद झालेल्या या तिन्ही जवानांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ अशी अशी बचाव कार्यावेळी पाण्यात बुडून शहीद झालेल्या व पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार असे बचावलेल्या एसडीआरएफच्या जवानांची नावे आहे. संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ…
