Author: अनंत पांगारकर
संगमनेर | प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि महिला व युवतींच्या सक्षमीकरणाचा वारसा पुढे चालवत, संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत ७ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत टेनिस बॉल क्रिकेट, रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहेत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर मध्ये या स्पर्धा होत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धांचे हे सलग पाचवे वर्ष असून, अल्पावधीतच या उपक्रमाने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय विद्यार्थिनींपासून…
दैनिक राशीभविष्य: २४ फेब्रुवारी २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचा ठसा उमटेल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. आर्थिक आघाडीवर काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मात्र, घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ आज तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे नियोजित बजेटनुसार चालावे. व्यवसायात मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. संवादातील गोडव्यामुळे कौटुंबिक वाद मिटण्यास मदत होईल. आरोग्यासाठी योगासने आणि संतुलित आहार आवश्यक आहे. मिथुन तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान…
संगमनेर | अनंत पांगारकर सध्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अधिष्ठानाची नितांत गरज आहे. या महापुरुषांचे विचार पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रयत्न हे लोकशाहीसाठी घातक असून, त्यांना नाकारणे म्हणजे आधुनिक भारताच्या अस्तित्वालाच नाकारण्यासारखे आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले. संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘सत्यशोधक व्याख्यानमाले’तील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. “गांधी, नेहरू का नकोत?” या विषयावर रविवारी व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या व्याख्यानासाठी जनसमुदायाची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय थोरात होते, तर व्यासपीठावर…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषदेच्या विशेष अर्थसंकल्पीय बैठकीत सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या करवाढीला शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी तीव्र विरोध दर्शवला. पालिकेच्या या बैठकीत जनसामान्यांवर लादल्या जाणाऱ्या संभाव्य दरवाढीवरून जोरदार चर्चा झाली, यामध्ये सूर्यवंशी यांनी आक्रमक भूमिका घेत सर्वसामान्यांची बाजू लावून धरत या दरवाढीला तीव्र विरोध दाखविला. यासंदर्भात त्यांनी, नगराध्यक्ष, पीठासन अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे आपला लेखी विरोध सादर केला. या अर्थसंकल्पीय बैठकीपूर्वीच शहरात मोठ्या प्रमाणावर करवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. संगमनेर नगरपालिकेतील एकमेव विरोधी नगरसेविका सूर्यवंशी यांच्यासह व्यापाऱ्यांनी या दरवाढीबाबत आधीच चिंता व्यक्त करत आपला विरोध नोंदवला होता. वाढत्या लोकभावनेची दखल घेत आमदार सत्यजित तांबे यांनी संबंधितांची बैठक…
संगमनेर, प्रतिनिधी – सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य आणि आदर्श संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा सांगता समारंभ बुधवारी (२५ फेब्रुवारी) होणार आहे. सकाळी ९ वाजता आयोजित या सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत या कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने दिलासा दिला आहे. यंदाच्या हंगामातही कमी पर्जन्यमान आणि ऊस टंचाईचे आव्हान असताना, कारखान्याने यशस्वीरित्या गाळप पूर्ण…
संगमनेर, प्रतिनिधी – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात एकीकडे पोलीस कडेकोट बंदोबस्त आणि रूटमार्च काढून आपण सज्ज असल्याचे मिरवत असताना, दुसरीकडे गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात नशेबाजांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून किरकोळ कारणावरून इंदिरानगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील रहिवासी आणि रुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रोहित वाळके याच्यावर अज्ञात इसमाने कोयत्याने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की रोहित वाळके यामध्ये गंभीर जखमी झाले असून…
संगमनेर, प्रतिनिधी – रोटरी क्लब संगमनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाने रविवारी संगमनेर शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. रोटरी इंटरनॅशनलच्या १२१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. या सोहळ्याला संगमनेरकरांनी आबालवृद्धांसह मोठी गर्दी करत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रो. दिलीप मालपाणी यांनी दहा वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये रुजवलेली ही संकल्पना आता जनचळवळ बनली आहे. यावर्षीच्या उपक्रमात सांस्कृतिक आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नगरपरिषदेचा महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा वेळेत करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिली तांबे यांनी केले आहे. विशेषतः ज्या मालमत्ता धारकांकडे अनेक वर्षांपासून कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्यासाठी नगरपरिषदेने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीनुसार, थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या करावर दरमहा दोन टक्के या दराने शास्ती (दंड) आकारली जाते. मात्र, अभय योजनेअंतर्गत या शास्तीच्या रकमेत ५०…
दैनिक राशीभविष्य: २३ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र बोलताना संयम बाळगणे हिताचे ठरेल. नवीन व्यवसायाची संधी चालून येईल. मिथुन: तुमच्या बौद्धिक क्षमतेचा कस लागेल अशा काही घटना आज घडू शकतात. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, पण तुम्ही त्या समर्थपणे पेलू शकाल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल आणि एखादा सुखद प्रवास घडण्याची…
संगमनेर, प्रतिनिधी – पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २,५०० ते ५,००० लोकसंख्या गटात खांडगावने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल गावाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये या विशेष गौरव सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते खांडगावच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमान स्वीकारला. खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या…
