Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीला सध्या घाणीच्या साम्राज्याने ग्रासले असून, नदीपात्रातील साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी आक्रमक पवित्रा घेत संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १५ दिवसांत नदीची स्वच्छता न झाल्यास प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. शहरातील पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर पाण्याचा निचरा करणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याला दुर्गंधी सुटली आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला…
संगमनेर, प्रतिनिधी – शांतताप्रिय संगमनेर शहराला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या नशेच्या सौदागरांच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. राजापूरच्या गुंजाळवाडी रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागात व कुरणमध्ये छुप्या पद्धतीने चालणाऱ्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ९९७ ग्रॅम सुका गांजा जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे नशेच्या छुप्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. मुन्ना अब्बास शेख (वय २६) आणि संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची…
संगमनेर, प्रतिनिधी – शाळेसारख्या पवित्र ठिकाणी सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग करून तिला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकाला संगमनेर न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. संगमनेर येथील श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयातील ही धक्कादायक घटना असून, आरोपी शिक्षक दत्तु किसन कौटे याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांनी दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये पीडित शिक्षिकेने आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त मिळालेला पुष्पगुच्छ शाळेत आणला होता, तो विद्यार्थ्यांनी दहावीच्या निरोप समारंभात मुख्याध्यापकांना भेट म्हणून दिला. या साध्या कारणावरून आरोपी दत्तु कौटे याने पीडितेशी वाद उकरून काढला होता. १३…
संगमनेर, प्रतिनिधी – महसूल विभागातील भ्रष्टाचार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यासह दोन खासगी इसमांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कुणबी जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) काढून देण्यासाठी या आरोपींनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (वय ५७) हा आश्वी बुद्रुक येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासोबत लाचेची रक्कम स्वीकारण्यात मदत करणारे हितेश सोमनाथ घोडेकर (वय २८, रा. गजापूर रोड, ढोलेवाडी) आणि प्रतीक विजयकुमार कातोरे (वय २६, रा. सांगवी) या दोन खासगी व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.…
दैनिक राशीभविष्य: १८ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा असेल. मानसिक शांततेसाठी तुम्ही अध्यात्माकडे वळाल. व्यवसायात गुंतवणुकीचे विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे, परंतु कागदपत्रांची पडताळणी नीट करा. जोडीदारासोबत काही कारणावरून छोटेखानी वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम…
अहिल्यानगर – जिल्ह्यात सन २०२६ मधील सण व उत्सवांच्या काळात एकूण १५ दिवस सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे आदेश व सुधारित ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०१७ नुसार ही सूट जाहीर करण्यात आली असून, श्रोतृगृहे, सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी ही सवलत लागू राहील. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या या १५ दिवसांमध्ये १९ फेब्रुवारी रोजीची शासकीय शिवजयंती, १४ एप्रिल रोजीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे रोजीचा महाराष्ट्र दिन व २६ ऑगस्ट रोजीच्या ईद-ए-मिलादचा समावेश आहे.…
संगमनेर, प्रतिनिधी – शिर्डीच्या गोल्डन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर रंगलेल्या पहिल्या राज्यस्तरीय 50 बॉल क्रिकेट स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा संघ चॅम्पियन ठरला. राज्यातून आलेल्या विविध शालेय संघांचा समावेश असलेल्या या अतितटीच्या स्पर्धेत ध्रुवच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना 11 सुवर्ण पदकांसह पाच चषकांची कमाई केली. शाळेच्या तेज जैनला ‘प्लेअर ऑफ द चॅम्पियन’ तर, प्रणव काकडेला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. याशिवाय शाळेच्या खेळाडूंनी अन्य व्यक्तिगत पुरस्कार पटकावताना या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेवर आपला ठसा उमटवला. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पंधरा वर्षांखालील मुलांच्या संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी 50 चेंडूचे सामने खेळवण्यात आले. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ध्रुवच्या संघाने पुणेसंघाचा…
संगमनेर, प्रतिनिधी – संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून, ४० कलावंतांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य शिवभक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि उपनगराध्यक्ष…
आजचे राशीभविष्य: १७ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जावान ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला दाद मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत काही नवीन योजना आखण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. जोडीदारासोबतचा वेळ आनंदाचा जाईल आणि आरोग्य उत्तम राहील. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूरचे सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे याला न्यायालयाने दोषी ठरवत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. घटनेची पार्श्वभूमी अशी की, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वसुली पथक श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. २, सुभेदार वस्ती भागात थकीत वीज बिल वसुलीसाठी आणि कनेक्शन तोडण्यासाठी गेले होते. ग्राहक रूपचंद गांगुर्डे यांच्या घरी पथक पोहोचले असता, ग्राहक, त्यांचा मुलगा गणेश गांगुर्डे आणि पत्नी बबीता गांगुर्डे यांनी वीज बिल…
